शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
4
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
5
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
6
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
7
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
8
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
9
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
10
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
11
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
12
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
13
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
14
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
15
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
16
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
17
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
18
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
20
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 22:48 IST

दीपक शिंदे वैयक्तिक स्वार्थापेक्षा देशसेवा महत्त्वाची, असे मनाशी पक्के ठरवत सातारा लोकसभा मतदार संघातून १९६२ मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील ...

दीपक शिंदेवैयक्तिक स्वार्थापेक्षा देशसेवा महत्त्वाची, असे मनाशी पक्के ठरवत सातारा लोकसभा मतदार संघातून १९६२ मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पराभव करून निवडून आलेले क्रांतिवीर किसन वीर यांनी आपला मतदारसंघ यशवंतराव चव्हाण यांच्यासाठी सोडला. यशवंतराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते; पण चीन आणि पाकिस्तान युद्धामुळे देशाला एका भक्कम संरक्षणमंत्र्यांची गरज होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतले. यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षणमंत्री म्हणून चांगली कामगिरी केली. हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री धावला, अशा प्रकारचे कौतुकही झाले; पण १९६७ मध्ये त्यांना पुन्हा दिल्लीला जाण्यासाठी मतदारसंघ नव्हता.राज्यात पुन्हा थांबणे योग्य नव्हते. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांनी नाशिकमधून लढण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत किसन वीर यांना कळाल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना सातारा मतदार संघातूनच उभे राहण्यासाठी विनंती केली. त्यांच्या प्रचाराची सर्व जबाबदारी किसन वीर यांनी स्वत:वर घेतली. त्यामुळे १९६७ मध्ये सातारा लोकसभा मतदार संघातून यशवंतराव चव्हाण निवडून आले. त्यावेळी कºहाडमधून आनंदराव चव्हाण हे काँग्रेसकडून निवडणूक लढत होते. त्यांना अडचण निर्माण करण्याची यशवंतराव चव्हाण यांची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी अखेर सातारा मतदार संघातूनच निवडणूक लढविली आणि सुमारे १ लाख २७ हजार ८३६ मतांनी जिंकली.यशवंतराव चव्हाण यांनी १९६७ नंतर १९७१, १९७७, १९८० असे चार वेळा सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्यामुळे देशात सातारा जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली. यशवंतराव चव्हाण यांनी केंद्रात संरक्षणमंत्री, अर्थ व नियोजन, गृहमंत्री त्याबरोबरच परराष्ट्रमंत्री अशी खाती त्यांनी सांभाळली. यशवंतराव चव्हाणांनी राजकारण आणि समाजकारण अशा दोन्ही गोष्टी अत्यंत जबाबदारीने सांभाळल्या. सहकार आणि कृषी यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले. राज्य आणि देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाने सातारा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले, ही या मतदारसंघ आणि सातारकरांच्या दृष्टीने अभिमानाचीच बाब आहे.