शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 22:48 IST

दीपक शिंदे वैयक्तिक स्वार्थापेक्षा देशसेवा महत्त्वाची, असे मनाशी पक्के ठरवत सातारा लोकसभा मतदार संघातून १९६२ मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील ...

दीपक शिंदेवैयक्तिक स्वार्थापेक्षा देशसेवा महत्त्वाची, असे मनाशी पक्के ठरवत सातारा लोकसभा मतदार संघातून १९६२ मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पराभव करून निवडून आलेले क्रांतिवीर किसन वीर यांनी आपला मतदारसंघ यशवंतराव चव्हाण यांच्यासाठी सोडला. यशवंतराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते; पण चीन आणि पाकिस्तान युद्धामुळे देशाला एका भक्कम संरक्षणमंत्र्यांची गरज होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतले. यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षणमंत्री म्हणून चांगली कामगिरी केली. हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री धावला, अशा प्रकारचे कौतुकही झाले; पण १९६७ मध्ये त्यांना पुन्हा दिल्लीला जाण्यासाठी मतदारसंघ नव्हता.राज्यात पुन्हा थांबणे योग्य नव्हते. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांनी नाशिकमधून लढण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत किसन वीर यांना कळाल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना सातारा मतदार संघातूनच उभे राहण्यासाठी विनंती केली. त्यांच्या प्रचाराची सर्व जबाबदारी किसन वीर यांनी स्वत:वर घेतली. त्यामुळे १९६७ मध्ये सातारा लोकसभा मतदार संघातून यशवंतराव चव्हाण निवडून आले. त्यावेळी कºहाडमधून आनंदराव चव्हाण हे काँग्रेसकडून निवडणूक लढत होते. त्यांना अडचण निर्माण करण्याची यशवंतराव चव्हाण यांची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी अखेर सातारा मतदार संघातूनच निवडणूक लढविली आणि सुमारे १ लाख २७ हजार ८३६ मतांनी जिंकली.यशवंतराव चव्हाण यांनी १९६७ नंतर १९७१, १९७७, १९८० असे चार वेळा सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्यामुळे देशात सातारा जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली. यशवंतराव चव्हाण यांनी केंद्रात संरक्षणमंत्री, अर्थ व नियोजन, गृहमंत्री त्याबरोबरच परराष्ट्रमंत्री अशी खाती त्यांनी सांभाळली. यशवंतराव चव्हाणांनी राजकारण आणि समाजकारण अशा दोन्ही गोष्टी अत्यंत जबाबदारीने सांभाळल्या. सहकार आणि कृषी यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले. राज्य आणि देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाने सातारा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले, ही या मतदारसंघ आणि सातारकरांच्या दृष्टीने अभिमानाचीच बाब आहे.