शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साहेब कार्यालयात भेटेनात; फोनही घेईनात!

By admin | Updated: March 19, 2015 23:52 IST

दादा मागायची कुणाकडं ? : तारळेतील वीज ग्राहकांसमोर यक्षप्रश्न; उंब्रजच्या मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांबाबत संतप्त प्रतिक्रिया

तारळे : वीजग्राहकांना तक्रार करण्यासाठी, शंका निरसन करण्यासाठी अथवा अधिक माहिती घेण्यासाठी उंब्रज येथील वीजवितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना मोबाईलवर फोन करावा लागतो. मात्र, संबंधित अधिकारी फोनच घेत नाहीत. कार्यालयाच्या दूरध्वनीवर फोन केला असता, साहेब बाहेर गेल्याची उत्तरे मिळतात. त्यामुळे दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न ग्राहकांमधून उपस्थित केला जात आहे.उंब्रज येथे वीजवितरण कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. तारळे येथे शाखा आहे. तारळे विभागात हजारो घरगुती व कृषिपंंपांचे ग्राहक आहेत. त्यामुळे ग्राहकांना वारंवार उंब्रज कार्यालयाशी संपर्क करावा लागतो; पण सध्याचे अधिकारी ग्राहकांचे फोन घेत नसल्याचे समोर येत आहे. यापूर्वी अनेक अधिकारी आले आणि गेले; पण कुणीही ग्राहकांचे फोन घेण्यास टाळाटाळ केली नाही. सर्वसामान्य ग्राहकांबरोबरच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचे सुध्दा फोन सध्या उचलले जात नाहीत. तारळे-उंब्रज सुमारे पंचवीस किलोमीटरचे अंतर आहे. ग्राहक पदरमोड करून गेले तरी अधिकारी जागेवर सापडतीलच, याची खात्री नसल्याने ग्राहकांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे एखाद्या शंकेचे निरसन, माहिती घ्यायची झाल्यास ग्राहकांची ससेहोलपट होत आहे. मुळात अधिकारी बदलले तरी ग्राहकांच्या सोयीसाठी तोच नंबर नवीन अधिकाऱ्यांकडे देण्यात येतो; पण सध्या उलट परिस्थिती असून, अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक कामांसाठी ग्राहकांना उंब्रज कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे जावे लागते. त्यांच्याकडून दिलेल्या माहितीवरच समाधान मानावे लागते. आमच्याकडे तक्रारदार आल्यास त्याबाबत अधिकाऱ्यांना वेळ मागून घेण्यासाठी मोबाईलवर फोन केला असता उचलला जात नाही. यापूर्वी अशा प्रकारे फोन न उचलण्याचे प्रकार घडत नव्हते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे यांनी केली आहे. वीज वितरणात अनियमितता, दुरुस्ती असल्यास विलंब, अवाजवी बिले अशा तक्रारी असताना हे नवेच दुखणे ग्राहकांमागे लागले आहे. (वार्ताहर)ग्राहकांच्या शंकांचे निरसन होण्यासाठी अधिकाऱ्यांनी फोन उचलणे गरजेचे आहे. उंब्रजचे उपकार्यकारी अभियंता फोन का घेत नाहीत, याची मी माहिती घेतो. त्यांना योग्य ती समज दिली जाईल. यापुढे असे होणार नाही.- राजेश थूल,कार्यकारी अभियंता, ओगलेवाडीसाहेब प्रतिसाद देत नाहीत म्हणे !उपकार्यकारी अभियंत्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क केला; पण सलग तीन दिवस वारंवार फोन करूनही त्यांनी फोन घेतलाच नाही. ‘तुम्ही ज्या क्रमांकाशी संपर्क साधू इच्छिता, तो क्रमांक सध्या कोणतेही कॉल स्वीकारत नाहीये,’ अशी टेपच वारंवार ऐकावी लागत होती. साहेब, प्रतिसादच देत नसल्याने आता दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न सध्या वीज ग्राहकांना सतावतोय.