शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
2
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
3
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
4
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
5
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
6
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
7
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
8
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
9
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
10
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
11
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
12
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
13
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण
14
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
15
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
16
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
19
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
20
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला

साहेब कार्यालयात भेटेनात; फोनही घेईनात!

By admin | Updated: March 19, 2015 23:52 IST

दादा मागायची कुणाकडं ? : तारळेतील वीज ग्राहकांसमोर यक्षप्रश्न; उंब्रजच्या मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांबाबत संतप्त प्रतिक्रिया

तारळे : वीजग्राहकांना तक्रार करण्यासाठी, शंका निरसन करण्यासाठी अथवा अधिक माहिती घेण्यासाठी उंब्रज येथील वीजवितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना मोबाईलवर फोन करावा लागतो. मात्र, संबंधित अधिकारी फोनच घेत नाहीत. कार्यालयाच्या दूरध्वनीवर फोन केला असता, साहेब बाहेर गेल्याची उत्तरे मिळतात. त्यामुळे दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न ग्राहकांमधून उपस्थित केला जात आहे.उंब्रज येथे वीजवितरण कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. तारळे येथे शाखा आहे. तारळे विभागात हजारो घरगुती व कृषिपंंपांचे ग्राहक आहेत. त्यामुळे ग्राहकांना वारंवार उंब्रज कार्यालयाशी संपर्क करावा लागतो; पण सध्याचे अधिकारी ग्राहकांचे फोन घेत नसल्याचे समोर येत आहे. यापूर्वी अनेक अधिकारी आले आणि गेले; पण कुणीही ग्राहकांचे फोन घेण्यास टाळाटाळ केली नाही. सर्वसामान्य ग्राहकांबरोबरच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचे सुध्दा फोन सध्या उचलले जात नाहीत. तारळे-उंब्रज सुमारे पंचवीस किलोमीटरचे अंतर आहे. ग्राहक पदरमोड करून गेले तरी अधिकारी जागेवर सापडतीलच, याची खात्री नसल्याने ग्राहकांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे एखाद्या शंकेचे निरसन, माहिती घ्यायची झाल्यास ग्राहकांची ससेहोलपट होत आहे. मुळात अधिकारी बदलले तरी ग्राहकांच्या सोयीसाठी तोच नंबर नवीन अधिकाऱ्यांकडे देण्यात येतो; पण सध्या उलट परिस्थिती असून, अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक कामांसाठी ग्राहकांना उंब्रज कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे जावे लागते. त्यांच्याकडून दिलेल्या माहितीवरच समाधान मानावे लागते. आमच्याकडे तक्रारदार आल्यास त्याबाबत अधिकाऱ्यांना वेळ मागून घेण्यासाठी मोबाईलवर फोन केला असता उचलला जात नाही. यापूर्वी अशा प्रकारे फोन न उचलण्याचे प्रकार घडत नव्हते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे यांनी केली आहे. वीज वितरणात अनियमितता, दुरुस्ती असल्यास विलंब, अवाजवी बिले अशा तक्रारी असताना हे नवेच दुखणे ग्राहकांमागे लागले आहे. (वार्ताहर)ग्राहकांच्या शंकांचे निरसन होण्यासाठी अधिकाऱ्यांनी फोन उचलणे गरजेचे आहे. उंब्रजचे उपकार्यकारी अभियंता फोन का घेत नाहीत, याची मी माहिती घेतो. त्यांना योग्य ती समज दिली जाईल. यापुढे असे होणार नाही.- राजेश थूल,कार्यकारी अभियंता, ओगलेवाडीसाहेब प्रतिसाद देत नाहीत म्हणे !उपकार्यकारी अभियंत्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क केला; पण सलग तीन दिवस वारंवार फोन करूनही त्यांनी फोन घेतलाच नाही. ‘तुम्ही ज्या क्रमांकाशी संपर्क साधू इच्छिता, तो क्रमांक सध्या कोणतेही कॉल स्वीकारत नाहीये,’ अशी टेपच वारंवार ऐकावी लागत होती. साहेब, प्रतिसादच देत नसल्याने आता दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न सध्या वीज ग्राहकांना सतावतोय.