शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

साहेब कार्यालयात भेटेनात; फोनही घेईनात!

By admin | Updated: March 19, 2015 23:52 IST

दादा मागायची कुणाकडं ? : तारळेतील वीज ग्राहकांसमोर यक्षप्रश्न; उंब्रजच्या मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांबाबत संतप्त प्रतिक्रिया

तारळे : वीजग्राहकांना तक्रार करण्यासाठी, शंका निरसन करण्यासाठी अथवा अधिक माहिती घेण्यासाठी उंब्रज येथील वीजवितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना मोबाईलवर फोन करावा लागतो. मात्र, संबंधित अधिकारी फोनच घेत नाहीत. कार्यालयाच्या दूरध्वनीवर फोन केला असता, साहेब बाहेर गेल्याची उत्तरे मिळतात. त्यामुळे दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न ग्राहकांमधून उपस्थित केला जात आहे.उंब्रज येथे वीजवितरण कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. तारळे येथे शाखा आहे. तारळे विभागात हजारो घरगुती व कृषिपंंपांचे ग्राहक आहेत. त्यामुळे ग्राहकांना वारंवार उंब्रज कार्यालयाशी संपर्क करावा लागतो; पण सध्याचे अधिकारी ग्राहकांचे फोन घेत नसल्याचे समोर येत आहे. यापूर्वी अनेक अधिकारी आले आणि गेले; पण कुणीही ग्राहकांचे फोन घेण्यास टाळाटाळ केली नाही. सर्वसामान्य ग्राहकांबरोबरच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचे सुध्दा फोन सध्या उचलले जात नाहीत. तारळे-उंब्रज सुमारे पंचवीस किलोमीटरचे अंतर आहे. ग्राहक पदरमोड करून गेले तरी अधिकारी जागेवर सापडतीलच, याची खात्री नसल्याने ग्राहकांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे एखाद्या शंकेचे निरसन, माहिती घ्यायची झाल्यास ग्राहकांची ससेहोलपट होत आहे. मुळात अधिकारी बदलले तरी ग्राहकांच्या सोयीसाठी तोच नंबर नवीन अधिकाऱ्यांकडे देण्यात येतो; पण सध्या उलट परिस्थिती असून, अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक कामांसाठी ग्राहकांना उंब्रज कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे जावे लागते. त्यांच्याकडून दिलेल्या माहितीवरच समाधान मानावे लागते. आमच्याकडे तक्रारदार आल्यास त्याबाबत अधिकाऱ्यांना वेळ मागून घेण्यासाठी मोबाईलवर फोन केला असता उचलला जात नाही. यापूर्वी अशा प्रकारे फोन न उचलण्याचे प्रकार घडत नव्हते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे यांनी केली आहे. वीज वितरणात अनियमितता, दुरुस्ती असल्यास विलंब, अवाजवी बिले अशा तक्रारी असताना हे नवेच दुखणे ग्राहकांमागे लागले आहे. (वार्ताहर)ग्राहकांच्या शंकांचे निरसन होण्यासाठी अधिकाऱ्यांनी फोन उचलणे गरजेचे आहे. उंब्रजचे उपकार्यकारी अभियंता फोन का घेत नाहीत, याची मी माहिती घेतो. त्यांना योग्य ती समज दिली जाईल. यापुढे असे होणार नाही.- राजेश थूल,कार्यकारी अभियंता, ओगलेवाडीसाहेब प्रतिसाद देत नाहीत म्हणे !उपकार्यकारी अभियंत्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क केला; पण सलग तीन दिवस वारंवार फोन करूनही त्यांनी फोन घेतलाच नाही. ‘तुम्ही ज्या क्रमांकाशी संपर्क साधू इच्छिता, तो क्रमांक सध्या कोणतेही कॉल स्वीकारत नाहीये,’ अशी टेपच वारंवार ऐकावी लागत होती. साहेब, प्रतिसादच देत नसल्याने आता दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न सध्या वीज ग्राहकांना सतावतोय.