शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

शेतकºयांच्या सुरक्षेसाठी सातारा झेडपी सरसावली , सुरक्षा किट मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 18:44 IST

सातारा : राज्यात पिकांवर औषध फवारणी करताना शेतकºयांचा मृत्यू झाल्यानंतर मोठी खळबळ माजली होती.

ठळक मुद्देपाच हजार शेतकºयांना औषध फवारणीवेळी सुरक्षा किट वाटपाचा निर्णयशेतकºयांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले.

सातारा : राज्यात पिकांवर औषध फवारणी करताना शेतकºयांचा मृत्यू झाल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषद आता जिल्'ातील शेतकºयांसाठी सरसावली असून, पाच हजार शेतकºयांना औषध फवारणीवेळी वापरण्यासाठी सुरक्षा किट देणार आहे. त्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात यवतमाळ जिल्'ात व इतर ठिकाणी पिकांवर औषध फवारणी करताना अनेक शेतकºयांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. सर्व बाजूंनी राज्य शासनावर टीका करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर शेतकºयांच्या दृष्टीने काही उपाययोजना हाती घेण्यात आल्या. शासनाकडून मदतीचे आश्वासन देण्यात आले. अशा या घटनेनंतर सातारा जिल्हा परिषदही शेतकºयांच्या सुरक्षेसाठी पुढे आली आहे. जिल्हा परिषदेने जिल्'ातील पाच हजार शेतकºयांना औषध फवारणीवेळी वापरण्यासाठी सुरक्षा किट वाटपाचा निर्णय घेतला. त्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद केली आहे. कृषी समिती सभापती मनोज पवार यांनी यासाठी विशेष प्रयत्न करून शेतकºयांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले.

जिल्'ात एकूण ९३४ दुकाने ही कीटकनाशक विक्रीची आहेत. या दुकानात सुरक्षा किट उपलब्ध करून देण्यात आले आहे. तशा विक्रीच्या सूचनाही दुकानदारांना करण्यात आल्या आहेत. या किटची किंमत १५० रुपये आहे. त्यापैकी ५० रुपये हे शेतकºयांनी भरायचे असून, १०० रुपये अनुदान मिळणार आहे. ७ नोव्हेंबरला ही योजना सुरू झाली असून, आतापर्यंत जिल्'ातील सुमारे ५०० हून अधिक शेतकºयांची याचा लाभ घेतला आहे.आॅनलाईन पैसे जमा होणार...सुरक्षा किट घेणाºया शेतकºयांना १०० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. हे पैसे आॅनलाईनने जमा होणार आहे. किट घेतल्याची पावती, बँक पासबुक झेरॉक्स आणि मागणी अर्ज पंचायत समितीकडे जमा करायचा आहे. त्यानंतर हे पैसे शेतकºयांना मिळणार आहेत. 

जिल्'ातील पाच हजार शेतकºयांना सुरक्षा किट वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद जिल्हा परिषदेने केली आहे. या किटमुळे शेतकºयांना सुरक्षित राहता येणार आहे. आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त शेतकºयांनी याचा लाभ घेतला आहे.- चांगदेव बागल, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद