शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लोकनेत्याच्या निधनाने सातार्‍यात दुखवटा

By admin | Updated: June 4, 2014 23:59 IST

उत्स्फूर्त बंद : सातारा शहरात सर्वपक्षीय शोकसभेला मान्यवरांची उपस्थिती

सातारा : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे सातार्‍यात दुखवटा पाळण्यात आला. मंगळवारी दिवसभर व्यापारी पेठ बंद ठेवण्यात आली. तसेच विविध ठिकाणी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहण्यात आली. यांनी आधारस्तंभ हरपला असल्याची भावना विविध राजकीय कार्यकर्त्यांनी सातार्‍यात व्यक्त केली. मुंडे यांना सातारा शहरात जागोजागी श्रध्दांजली वाहण्यात आली. येथील मोती चौकात आयोजित शोकसभेत शिवसेनेचे नरेंद्र पाटील म्हणाले, ‘कासचे पाणी बंदिस्त जलवाहिनीद्वारे सातार्‍यात आणण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांचे सहकार्य आणि मार्गदर्शनामुळे पूर्ण झाले. खासदार उदयनराजे भोसले यांची राजकीय वाटचाल गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच फलरुप होऊ शकली.’ पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शहरातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांशीही मुंडे यांचे ऋणानुबंध होते, असे त्यांनी सांगितले. भाजपाच्या शहराध्यक्षा सुवर्णा पाटील म्हणाल्या, ‘मुंडेच्या रुपाने महाराष्ट्रातील मोठा आधारस्तंभ गळून पडला आहे.’ जावळी विकास आघाडीचे दीपक पवार यांनी गोपीनाथ मुडे यांच्या जाण्याने पक्षात एक राजकीय पोकळी निर्माण झाल्याचे तसेच त्यांच्या सारखा जनसामान्यात वावरणारा नेता परत होऊ शकत नाही, अशी भावना व्यक्त केली. सर्व जाती जमातीतील तरुणांना आकर्षित करणारा त्याचबरोबर राजकीय मतभेद विसरुन सर्वांना मदत आणि मार्गदर्शन करणारा जनसामान्यांचा नेता आता आपल्यातून दूर गेला आहे, अशी खंत भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील काळेकर यांनी व्यक्त केली. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सोपानराव गवळी, अजय परदेशी, म्हसवडचे डॉ. महादेव कापसे, चंद्रकांत घोरपडे, पूर्वाश्रमीचे भाजपाचे नगरसेवक विजय नाफड, व्यापारी संघटनेचे गोपाळशेठ गुजर, सुजाता कोल्हटकर, जयदीप ठुसे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र सावरणे महाकठीण : तपासे ‘मुंडे यांच्या जाण्याने देशातील बहुजन चळवळीचे नुकसान झालेच पण महाराष्ट्रातील महायुतीच्या साखळीची कडी निखळून पडली आहे. यातून सावरणे महाकठीण आहे,’ अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाच्यावतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशोर तपासे यांनी श्रध्दांजली वाहिली. पालिकेतर्फे मुंडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक, उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, मुख्याधिकारी अभिजित बापट, लेखापाल हेमंत जाधव, नगरसेवक अ‍ॅड. दत्ता बनकर, अविनाश कदम, अ‍ॅड. बाळासाहेब बाबर, विजय बडेकर, संदीप साखरे, भाग्यवंत कुंभार, नगरसेविका सुवर्णा पाटील, मनिषा भणगे, हेमांगी जोशी, हेमा तपासे, श्रीकांत आंबेकर, राम हादगे उपस्थित हाते. सातारा जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्यावतीने श्रध्दांजली बैठकीत ते बोलत होते. रिपाइंच्या भटक्या विमुक्त जाती जमातीचे अध्यक्ष नवनाथ शिंदे, अल्पसंख्यांक आघाडीचे फारुखभाई पटणी, आण्णा उबाळे, महेंद्र गायकवाड, अजित जगताप, मिलिंद कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)