शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सातारा-पुणे महामार्गावरील ‘एस’ वळण होणार इतिहासजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:28 IST

सातारा : वाहनचालकांना जीवघेणे ठरणारे खंबाटकी घाटातील ‘एस’ वळण आणि खंबाटकी घाटाचा घाटरस्ता हे नजिकच्याच काळात इतिहासजमा होणार आहेत. ...

सातारा : वाहनचालकांना जीवघेणे ठरणारे खंबाटकी घाटातील ‘एस’ वळण आणि खंबाटकी घाटाचा घाटरस्ता हे नजिकच्याच काळात इतिहासजमा होणार आहेत. येथील बोगद्यामुळे पुण्याहून साताऱ्याकडे येण्यासाठी एकूण आठ किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. या मार्गावरील बोगदा व रस्त्याचे काम लॉकडाऊनच्या काळातही पूर्ण क्षमतेने सुरू आहे.

काही वर्षात पुण्याकडे जाणाऱ्या दिशेतील खंबाटकी घाटातील धोकादायक इंग्रजी ‘एस’ आकाराच्या तीव्र उताराच्या वळणावर व घाटरस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले होते. या घटनेचे गांभीर्य पाहता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हे धोकादायक वळण काढण्यासाठी येथे दोन बोगद्यांसह ६.४६ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला २८ फेब्रुवारी २०१९ला मंजुरी देण्यात आली. या कामाचे ४९३ कोटींचे बजेट आहे. हे काम सलग तीन वर्षे सुरू राहणार असून, २७ फेब्रुवारी २०२२ला बोगदा व रस्त्याचे काम संपविण्याची मुदत आहे. जून २०२२ला हे सर्व काम संपून हा रस्ता रहदारीसाठी खुला होणार आहे.

हा एकूण ६.४६ किलोमीटरचा रस्ता आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूकडे १.२ किलोमीटरचा बोगदा असून, पुण्याकडे जाताना बोगदा संपल्यानंतर कॅनॉलपर्यंत दरी पुलाप्रमाणे उड्डाणपूल असणार आहे, तर कॅनॉलपासून पारगाव-खंडाळा येथील सर्व्हिस रोडपर्यंत भराव रस्ता होणार आहे.

हे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या वापरात असलेला साताऱ्याहून पुण्याकडे जाताना सध्या वाहतूक सुरू असलेला बोगदा रस्ता हा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे धोकादायक ‘एस’ आकाराचे वळणही इतिहासजमा होणार आहे. पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी सध्या सुरू असलेला व घाट चढून जाणारा खंबाटकी घाटरस्ता हा आपत्त्कालिन परिस्थितीवेळी सुरू राहील. सातारा बाजूकडे या बोगद्याला सुशोभित करण्यात येणार असून, विविध झाडे, फुलझाडे व गोल डिझाईन बनविण्यात येणार आहे, तर पुणे बाजूकडे उड्डाणपूल बनविण्यात येणार आहे. तेथेही सुशोभिकरण करण्यात येणार आहे. सध्या, कोरोना काळातही नियम पाळून बोगद्याचे काम गायत्र प्रोजेक्टकडून सुरू असून, एकूण १५ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.

वाहनधारकांना दिलासा...

खंबाटकी येथील एस वळणावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत होते. आता हे वळण निघणार असल्याने लोकांचे जीवदेखील वाचतील, त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.