शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-पुणे महामार्गावरील ‘एस’ वळण होणार इतिहासजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:28 IST

सातारा : वाहनचालकांना जीवघेणे ठरणारे खंबाटकी घाटातील ‘एस’ वळण आणि खंबाटकी घाटाचा घाटरस्ता हे नजिकच्याच काळात इतिहासजमा होणार आहेत. ...

सातारा : वाहनचालकांना जीवघेणे ठरणारे खंबाटकी घाटातील ‘एस’ वळण आणि खंबाटकी घाटाचा घाटरस्ता हे नजिकच्याच काळात इतिहासजमा होणार आहेत. येथील बोगद्यामुळे पुण्याहून साताऱ्याकडे येण्यासाठी एकूण आठ किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. या मार्गावरील बोगदा व रस्त्याचे काम लॉकडाऊनच्या काळातही पूर्ण क्षमतेने सुरू आहे.

काही वर्षात पुण्याकडे जाणाऱ्या दिशेतील खंबाटकी घाटातील धोकादायक इंग्रजी ‘एस’ आकाराच्या तीव्र उताराच्या वळणावर व घाटरस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले होते. या घटनेचे गांभीर्य पाहता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हे धोकादायक वळण काढण्यासाठी येथे दोन बोगद्यांसह ६.४६ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला २८ फेब्रुवारी २०१९ला मंजुरी देण्यात आली. या कामाचे ४९३ कोटींचे बजेट आहे. हे काम सलग तीन वर्षे सुरू राहणार असून, २७ फेब्रुवारी २०२२ला बोगदा व रस्त्याचे काम संपविण्याची मुदत आहे. जून २०२२ला हे सर्व काम संपून हा रस्ता रहदारीसाठी खुला होणार आहे.

हा एकूण ६.४६ किलोमीटरचा रस्ता आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूकडे १.२ किलोमीटरचा बोगदा असून, पुण्याकडे जाताना बोगदा संपल्यानंतर कॅनॉलपर्यंत दरी पुलाप्रमाणे उड्डाणपूल असणार आहे, तर कॅनॉलपासून पारगाव-खंडाळा येथील सर्व्हिस रोडपर्यंत भराव रस्ता होणार आहे.

हे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या वापरात असलेला साताऱ्याहून पुण्याकडे जाताना सध्या वाहतूक सुरू असलेला बोगदा रस्ता हा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे धोकादायक ‘एस’ आकाराचे वळणही इतिहासजमा होणार आहे. पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी सध्या सुरू असलेला व घाट चढून जाणारा खंबाटकी घाटरस्ता हा आपत्त्कालिन परिस्थितीवेळी सुरू राहील. सातारा बाजूकडे या बोगद्याला सुशोभित करण्यात येणार असून, विविध झाडे, फुलझाडे व गोल डिझाईन बनविण्यात येणार आहे, तर पुणे बाजूकडे उड्डाणपूल बनविण्यात येणार आहे. तेथेही सुशोभिकरण करण्यात येणार आहे. सध्या, कोरोना काळातही नियम पाळून बोगद्याचे काम गायत्र प्रोजेक्टकडून सुरू असून, एकूण १५ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.

वाहनधारकांना दिलासा...

खंबाटकी येथील एस वळणावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत होते. आता हे वळण निघणार असल्याने लोकांचे जीवदेखील वाचतील, त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.