शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

सातारा-पुणे महामार्गावरील ‘एस’ वळण होणार इतिहासजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:28 IST

सातारा : वाहनचालकांना जीवघेणे ठरणारे खंबाटकी घाटातील ‘एस’ वळण आणि खंबाटकी घाटाचा घाटरस्ता हे नजिकच्याच काळात इतिहासजमा होणार आहेत. ...

सातारा : वाहनचालकांना जीवघेणे ठरणारे खंबाटकी घाटातील ‘एस’ वळण आणि खंबाटकी घाटाचा घाटरस्ता हे नजिकच्याच काळात इतिहासजमा होणार आहेत. येथील बोगद्यामुळे पुण्याहून साताऱ्याकडे येण्यासाठी एकूण आठ किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. या मार्गावरील बोगदा व रस्त्याचे काम लॉकडाऊनच्या काळातही पूर्ण क्षमतेने सुरू आहे.

काही वर्षात पुण्याकडे जाणाऱ्या दिशेतील खंबाटकी घाटातील धोकादायक इंग्रजी ‘एस’ आकाराच्या तीव्र उताराच्या वळणावर व घाटरस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले होते. या घटनेचे गांभीर्य पाहता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हे धोकादायक वळण काढण्यासाठी येथे दोन बोगद्यांसह ६.४६ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला २८ फेब्रुवारी २०१९ला मंजुरी देण्यात आली. या कामाचे ४९३ कोटींचे बजेट आहे. हे काम सलग तीन वर्षे सुरू राहणार असून, २७ फेब्रुवारी २०२२ला बोगदा व रस्त्याचे काम संपविण्याची मुदत आहे. जून २०२२ला हे सर्व काम संपून हा रस्ता रहदारीसाठी खुला होणार आहे.

हा एकूण ६.४६ किलोमीटरचा रस्ता आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूकडे १.२ किलोमीटरचा बोगदा असून, पुण्याकडे जाताना बोगदा संपल्यानंतर कॅनॉलपर्यंत दरी पुलाप्रमाणे उड्डाणपूल असणार आहे, तर कॅनॉलपासून पारगाव-खंडाळा येथील सर्व्हिस रोडपर्यंत भराव रस्ता होणार आहे.

हे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या वापरात असलेला साताऱ्याहून पुण्याकडे जाताना सध्या वाहतूक सुरू असलेला बोगदा रस्ता हा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे धोकादायक ‘एस’ आकाराचे वळणही इतिहासजमा होणार आहे. पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी सध्या सुरू असलेला व घाट चढून जाणारा खंबाटकी घाटरस्ता हा आपत्त्कालिन परिस्थितीवेळी सुरू राहील. सातारा बाजूकडे या बोगद्याला सुशोभित करण्यात येणार असून, विविध झाडे, फुलझाडे व गोल डिझाईन बनविण्यात येणार आहे, तर पुणे बाजूकडे उड्डाणपूल बनविण्यात येणार आहे. तेथेही सुशोभिकरण करण्यात येणार आहे. सध्या, कोरोना काळातही नियम पाळून बोगद्याचे काम गायत्र प्रोजेक्टकडून सुरू असून, एकूण १५ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.

वाहनधारकांना दिलासा...

खंबाटकी येथील एस वळणावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत होते. आता हे वळण निघणार असल्याने लोकांचे जीवदेखील वाचतील, त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.