शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘एस’ वळणाने घेतला आणखी एक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 23:17 IST

खंडाळा : पुणे-बंगलोर महामार्गावरील खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर असणाऱ्या धोकादायक ‘एस’ वळणावर कंटेनर व ट्रॅक्टरच्या अपघातात एकजण ठार, तर तीनजण ...

खंडाळा : पुणे-बंगलोर महामार्गावरील खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर असणाऱ्या धोकादायक ‘एस’ वळणावर कंटेनर व ट्रॅक्टरच्या अपघातात एकजण ठार, तर तीनजण जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. अशोक शामराव जाधव (वय ३९, रा. बोपेगाव, ता. वाई) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे.खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीहून मुंबईकडे साखरेची पोती घेऊन निघालेला कंटेनर (एमएच १५ इजी ९६१२) हा खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर भरधाव एस वळणावरून निघाला होता. त्यावेळी पुढे धान्य कोठी घेऊन चाललेल्या ट्रॅक्टरला (एमएच ११ बीए ७७१९) त्याने जोराने धडक दिली. धडकेनंतर सुमारे शंभर फूट ट्रॅक्टरला पुढे रेटत पुलाच्या कठड्याला धडकून कंटेनर उलटला, तर ट्रॅक्टरचा चुराडा झाला.या अपघातात ट्रॅक्टरचालक अशोक शामराव जाधव हे ठार झाले, तर बाळासाहेब जाधव (४२, पांडे, ता. वाई), कंटेनर चालक संदीप सुभाष निर्भवणे (२७), अमोल काशिनाथ वाघ (२४, दोघेही रा. शिवरे, ता. निफाड, जि. नाशिक) हे तिघेजण जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी पोहोचून अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतून खंडाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू झाला. कंटेनर चालकावर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.कंटेनर अन् कठड्यामध्ये ट्रॅक्टरचा चुराडामहामार्गावरील या अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, कंटेनरमधील साखरेची पोती रस्त्यावर पसरली होती. कंटेनर आणि पुलाचा कठडा यामध्ये ट्रॅक्टरचा चुराडा झाला. यात अशोक जाधव पूर्णपणे चेपले गेले. छाती, पोट व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघातास कंटेनरचा भरधाव वेग व चालकाचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याची तक्रार नातेवाइकांनी पोलिसांत दिली आहे.