शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

एस. टी. सुरक्षित तरी मुंबईकरांची ट्रॅव्हल्सला प्रसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:40 IST

सातारा : राज्य परिवहन महामंडळाचा प्रवास सर्वात सुरक्षित मानला जातो. तरीही काहीजणांची खासगी प्रवासी बसला पसंती मिळत आहे. त्याचे ...

सातारा : राज्य परिवहन महामंडळाचा प्रवास सर्वात सुरक्षित मानला जातो. तरीही काहीजणांची खासगी प्रवासी बसला पसंती मिळत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. पाटण, खटाव तालुक्यांतील बहुतांश मंडळी माथाडी कामगार म्हणून मुंबईत राहतात. त्यांचा रोजचा संबंध येत असल्याने या गावांतून दररोज ट्रॅव्हल्स मुंबईला जाते. त्यामुळे थेट गावी पोहोचता येत असल्याने ट्रॅव्हल्सला पसंती मिळत आहे.

सातारा आणि पुणे, मुंबईचे जवळचे नाते आहे. पुणे काही अंतरावर असल्याने एस. टी.ला चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र, मुंबईहून येणाऱ्यांकडून ट्रॅव्हल्सचा वापर केला जातो. मुंबई बाजार समितीत दिवसभर काम करुन रात्री जेवण करुन हे कामगार ट्रॅव्हल्समध्ये बसतात अन् सकाळी दिवस उगवताना आपापल्या गावी घरात जातात. हे त्यांच्यासाठी सोयीचे ठरते. पण ट्रॅव्हल्सचा वापर केवळ या मंडळींकडून होतो. इतर मंडळी मात्र एस. टी.ला पसंती देतात.

राज्य परिवहन महामंडळानेही विविध आगारांतून पुणे, मुंबई, बोरिवली याठिकाणी गाड्या सोडल्या आहेत. नोकरदार, उद्योजकांना याचा फायदा होतो. मात्र, एस. टी.च्या फेऱ्या अजूनही ग्रामीण भागात जात नाहीत. त्यामुळे सातारा किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पुन्हा खासगी वाहनाने आपापल्या गावी जावे लागते. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतुकीकडे कल वाढत आहे.

चौकट

एस. टी.ला स्पीड लॉक; ट्रॅव्हल्स सुसाट

सातारा जिल्ह्यातून गेलेल्या पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे शेंद्रेपर्यंत सहापदरीकरण झाले आहे. त्यामुळे रस्ता रिकामा असतो. मात्र, तरीही एस. टी.च्या वेगावर प्रशासनाने मर्यादा घालून दिल्या आहेत. त्यामुळे चालकांनी कितीही पळविण्याचा प्रयत्न केला तरी त्या पळत नाहीत. याउलट खासगी प्रवासी वाहनांना वेगमर्यादा नसल्याने त्या सुसाट धावत आहेत. साहजिकच कमी वेळेत साताऱ्यात येतात. पण हीच बाब प्रवाशांच्या जीवावर बेतत असते.

तरुणांना सुरक्षेपेक्षा आराम महत्वाचा...!

राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी.चा प्रवास सुरक्षित आहे. हे खरं असलं तरी लांबचा प्रवास असल्यामुळे ताटून जातो. त्यापेक्षा खासगी प्रवासी बसने प्रवास करणे कधीही चांगले वाटते. छानपैकी झोपून प्रवास करता येतो.

- अजय पाटील, सातारा.

कोट

आता कोरोनानंतर अपघातांचे प्रमाण कमी झालेले असले तरी खासगी प्रवासी गाड्यांना अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे वेळ लागत असला तरी एस. टी.ने प्रवास करणे कधीही हिताचे असते. मुलांना एस. टी.नेच येण्याबाबत आम्ही सांगत असतो.

- संतोष शिवरकर, सातारा.

कोट

जखमींना तातडीची मदत

एस. टी. अपघातात किरकोळ इजा झाल्यास तातडीने एक हजाराची मदत मिळते. तसेच प्रवासादरम्यान अपघाती मृत्यू झाल्यास तिकीटावर दहा लाखांचा विमा आहे. त्यामुळे एस. टी.चा प्रवास सुरक्षित आहे.

- रेश्मा गाडेकर

आगार व्यवस्थापक, सातारा.

एस. टी.चे अपघात

२०१८

२०१९

२०२०

२०२१ (जुलैपर्यंत)