शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी. सुरक्षित तरी मुंबईकरांची ट्रॅव्हल्सला प्रसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:40 IST

सातारा : राज्य परिवहन महामंडळाचा प्रवास सर्वात सुरक्षित मानला जातो. तरीही काहीजणांची खासगी प्रवासी बसला पसंती मिळत आहे. त्याचे ...

सातारा : राज्य परिवहन महामंडळाचा प्रवास सर्वात सुरक्षित मानला जातो. तरीही काहीजणांची खासगी प्रवासी बसला पसंती मिळत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. पाटण, खटाव तालुक्यांतील बहुतांश मंडळी माथाडी कामगार म्हणून मुंबईत राहतात. त्यांचा रोजचा संबंध येत असल्याने या गावांतून दररोज ट्रॅव्हल्स मुंबईला जाते. त्यामुळे थेट गावी पोहोचता येत असल्याने ट्रॅव्हल्सला पसंती मिळत आहे.

सातारा आणि पुणे, मुंबईचे जवळचे नाते आहे. पुणे काही अंतरावर असल्याने एस. टी.ला चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र, मुंबईहून येणाऱ्यांकडून ट्रॅव्हल्सचा वापर केला जातो. मुंबई बाजार समितीत दिवसभर काम करुन रात्री जेवण करुन हे कामगार ट्रॅव्हल्समध्ये बसतात अन् सकाळी दिवस उगवताना आपापल्या गावी घरात जातात. हे त्यांच्यासाठी सोयीचे ठरते. पण ट्रॅव्हल्सचा वापर केवळ या मंडळींकडून होतो. इतर मंडळी मात्र एस. टी.ला पसंती देतात.

राज्य परिवहन महामंडळानेही विविध आगारांतून पुणे, मुंबई, बोरिवली याठिकाणी गाड्या सोडल्या आहेत. नोकरदार, उद्योजकांना याचा फायदा होतो. मात्र, एस. टी.च्या फेऱ्या अजूनही ग्रामीण भागात जात नाहीत. त्यामुळे सातारा किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पुन्हा खासगी वाहनाने आपापल्या गावी जावे लागते. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतुकीकडे कल वाढत आहे.

चौकट

एस. टी.ला स्पीड लॉक; ट्रॅव्हल्स सुसाट

सातारा जिल्ह्यातून गेलेल्या पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे शेंद्रेपर्यंत सहापदरीकरण झाले आहे. त्यामुळे रस्ता रिकामा असतो. मात्र, तरीही एस. टी.च्या वेगावर प्रशासनाने मर्यादा घालून दिल्या आहेत. त्यामुळे चालकांनी कितीही पळविण्याचा प्रयत्न केला तरी त्या पळत नाहीत. याउलट खासगी प्रवासी वाहनांना वेगमर्यादा नसल्याने त्या सुसाट धावत आहेत. साहजिकच कमी वेळेत साताऱ्यात येतात. पण हीच बाब प्रवाशांच्या जीवावर बेतत असते.

तरुणांना सुरक्षेपेक्षा आराम महत्वाचा...!

राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी.चा प्रवास सुरक्षित आहे. हे खरं असलं तरी लांबचा प्रवास असल्यामुळे ताटून जातो. त्यापेक्षा खासगी प्रवासी बसने प्रवास करणे कधीही चांगले वाटते. छानपैकी झोपून प्रवास करता येतो.

- अजय पाटील, सातारा.

कोट

आता कोरोनानंतर अपघातांचे प्रमाण कमी झालेले असले तरी खासगी प्रवासी गाड्यांना अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे वेळ लागत असला तरी एस. टी.ने प्रवास करणे कधीही हिताचे असते. मुलांना एस. टी.नेच येण्याबाबत आम्ही सांगत असतो.

- संतोष शिवरकर, सातारा.

कोट

जखमींना तातडीची मदत

एस. टी. अपघातात किरकोळ इजा झाल्यास तातडीने एक हजाराची मदत मिळते. तसेच प्रवासादरम्यान अपघाती मृत्यू झाल्यास तिकीटावर दहा लाखांचा विमा आहे. त्यामुळे एस. टी.चा प्रवास सुरक्षित आहे.

- रेश्मा गाडेकर

आगार व्यवस्थापक, सातारा.

एस. टी.चे अपघात

२०१८

२०१९

२०२०

२०२१ (जुलैपर्यंत)