शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
4
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
5
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
6
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
7
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
8
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
9
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
10
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
11
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
12
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
13
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
14
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
15
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
16
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
17
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
18
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
19
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
20
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी

एस. टी. सुरक्षित तरी मुंबईकरांची ट्रॅव्हल्सला प्रसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:40 IST

सातारा : राज्य परिवहन महामंडळाचा प्रवास सर्वात सुरक्षित मानला जातो. तरीही काहीजणांची खासगी प्रवासी बसला पसंती मिळत आहे. त्याचे ...

सातारा : राज्य परिवहन महामंडळाचा प्रवास सर्वात सुरक्षित मानला जातो. तरीही काहीजणांची खासगी प्रवासी बसला पसंती मिळत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. पाटण, खटाव तालुक्यांतील बहुतांश मंडळी माथाडी कामगार म्हणून मुंबईत राहतात. त्यांचा रोजचा संबंध येत असल्याने या गावांतून दररोज ट्रॅव्हल्स मुंबईला जाते. त्यामुळे थेट गावी पोहोचता येत असल्याने ट्रॅव्हल्सला पसंती मिळत आहे.

सातारा आणि पुणे, मुंबईचे जवळचे नाते आहे. पुणे काही अंतरावर असल्याने एस. टी.ला चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र, मुंबईहून येणाऱ्यांकडून ट्रॅव्हल्सचा वापर केला जातो. मुंबई बाजार समितीत दिवसभर काम करुन रात्री जेवण करुन हे कामगार ट्रॅव्हल्समध्ये बसतात अन् सकाळी दिवस उगवताना आपापल्या गावी घरात जातात. हे त्यांच्यासाठी सोयीचे ठरते. पण ट्रॅव्हल्सचा वापर केवळ या मंडळींकडून होतो. इतर मंडळी मात्र एस. टी.ला पसंती देतात.

राज्य परिवहन महामंडळानेही विविध आगारांतून पुणे, मुंबई, बोरिवली याठिकाणी गाड्या सोडल्या आहेत. नोकरदार, उद्योजकांना याचा फायदा होतो. मात्र, एस. टी.च्या फेऱ्या अजूनही ग्रामीण भागात जात नाहीत. त्यामुळे सातारा किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पुन्हा खासगी वाहनाने आपापल्या गावी जावे लागते. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतुकीकडे कल वाढत आहे.

चौकट

एस. टी.ला स्पीड लॉक; ट्रॅव्हल्स सुसाट

सातारा जिल्ह्यातून गेलेल्या पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे शेंद्रेपर्यंत सहापदरीकरण झाले आहे. त्यामुळे रस्ता रिकामा असतो. मात्र, तरीही एस. टी.च्या वेगावर प्रशासनाने मर्यादा घालून दिल्या आहेत. त्यामुळे चालकांनी कितीही पळविण्याचा प्रयत्न केला तरी त्या पळत नाहीत. याउलट खासगी प्रवासी वाहनांना वेगमर्यादा नसल्याने त्या सुसाट धावत आहेत. साहजिकच कमी वेळेत साताऱ्यात येतात. पण हीच बाब प्रवाशांच्या जीवावर बेतत असते.

तरुणांना सुरक्षेपेक्षा आराम महत्वाचा...!

राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी.चा प्रवास सुरक्षित आहे. हे खरं असलं तरी लांबचा प्रवास असल्यामुळे ताटून जातो. त्यापेक्षा खासगी प्रवासी बसने प्रवास करणे कधीही चांगले वाटते. छानपैकी झोपून प्रवास करता येतो.

- अजय पाटील, सातारा.

कोट

आता कोरोनानंतर अपघातांचे प्रमाण कमी झालेले असले तरी खासगी प्रवासी गाड्यांना अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे वेळ लागत असला तरी एस. टी.ने प्रवास करणे कधीही हिताचे असते. मुलांना एस. टी.नेच येण्याबाबत आम्ही सांगत असतो.

- संतोष शिवरकर, सातारा.

कोट

जखमींना तातडीची मदत

एस. टी. अपघातात किरकोळ इजा झाल्यास तातडीने एक हजाराची मदत मिळते. तसेच प्रवासादरम्यान अपघाती मृत्यू झाल्यास तिकीटावर दहा लाखांचा विमा आहे. त्यामुळे एस. टी.चा प्रवास सुरक्षित आहे.

- रेश्मा गाडेकर

आगार व्यवस्थापक, सातारा.

एस. टी.चे अपघात

२०१८

२०१९

२०२०

२०२१ (जुलैपर्यंत)