शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात अद्याप चलन कल्लोळ सुरूच !

By admin | Updated: January 5, 2017 23:57 IST

पै-पै ला महाग : सामान्यांचं जिणं झालं मुश्कील

विठ्ठल नलवडे ल्ल कातरखटावनोटा चलनातून रद्द होऊन दीड महिना झाला तरी सामान्य माणसांची आर्थिक परवड अजून काही संपेनाशी झालं आहे. नोटाबंदीमुळं ग्रामीण भागात चलन कल्लोळ माजला आहे. जिल्हा बँकेतील खात्यात स्वत:चे पैसे असूनही शेतकरी, सामान्य माणूस पै-पै ला महाग झाला आहे.नोटाबंदीचं सर्वच स्तरावर स्वागत झालं असलं तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील दळणवळण बिघडल्यामुळे जनसामान्याची परवड नाकीनऊ झाली आहे. कुणाला दवाखान्यांची अडचण तर कुणाच्या ‘शुभमंगल सावधान’चा कार्यक्रम, निराधाराला ६०० रुपयांचा आधार, तो म्हणतोय माझी पेंशन जमा झाली का? कोण म्हणतोय, साहेब पैसे आले का? आठ दिवस झाले हेलपाटे मारतोय दोन हजार तरी द्या. या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेत सध्या खातेदार पै-पै ला महाग झाले आहेत.अनेक दिवस शेतकरी, खातेदार, निराधार, पेंशनधारक, हेलपाटे मारत आहेत; पण पैसे काय मिळत नाहीत. साहेब म्हणतात, ‘बसा. थांबा. कुणाचा भरणा आला तर बघू, कुणाचा भरणा काही येत नाही. बँकेला कुणी भरणाधारक काही भेटत नाही. खातेदाराला पैसे काय मिळत नाहीत. ज्येष्ठ नागरिक दिवसभर बसून कंटाळून निघून जातात, दुसरीकडे पैसे न मिळाल्यामुळे काहींचे चेहरे बघण्याजोगे होतात. जनसामान्यांना दु:खानं लपवता व दाखवताही येईना, अशी परिस्थिती झाली आहे. पैसे बँकेतून निघनात मी काय करू ?हल्ली वरबाप अनेक समस्यांतून आपल्या मुला-मुलीचं लग्न पार पाडत आहेत. त्यावेळी घोडे, वाजंत्री, फोटो, मंडपवाल्यांना चिरीमिरी देऊन बुकींग केलेले असतंय. वरबाप आपल्या लाडक्या मुला-मुलींचं ‘शुभमंगल, सगळ्यांना सावधान करीत असतात. नंतर मात्र ‘आत्ता तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा केले जातील,’ असे म्हणून मोकळे होतात. ‘पैसेच बँकेतून निघनात काय करू तेच कळना,’ त्यामुळे या सामान्य व्यावसायिकांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आत्ता हे व्यावसायिक सावध राहून व्यवसाय करीत आहेत.अबब..! एका महिन्यात ७०० खाती...नोटाबंदीच्या या चलन कल्लोळामुळे जिल्हा बँक, पतसंस्था कोमात गेल्या असून, अन्य राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवहार जोमात चालू आहेत. ग्रामीण भागात ज्या बँकेकडे जेमतेम व्यवहार चालू होते, त्या बँकेत जुन्या नोटा नवीन करून मिळतात म्हटल्यानंतर खाते खोलण्यासाठी रांगा लागू लागल्या, अशामुळे या बँकेने ६०० ते ७०० खाती खोलण्याचा टप्पा पार केला.