शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वांगी पाच रुपयात; तर टोमॅटो फुकटात !

By admin | Updated: December 27, 2016 01:00 IST

शेतकऱ्यांनीच माळव्याची बाग केली उद्ध्वस्त : भाजीपाला कवडीमोल; उत्पादन खर्चही निघेना; शेतकरी हतबल

कोपर्डे हवेली : गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून भाजीपाल्याला बाजारपेठेत दर नाही. काही दिवसांत दर वाढतील, या अपेक्षेवर शेतकरी होते. मात्र, शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे. दरात कोणतीही सुधारणा होत नसल्याने अखेर तोटा सहन करून शेतकरी माळव्याच्या पिकांची झाडे काढून टाकत आहेत. सध्या बाजारात वांगी पाच रुपये किलो एवढ्या नगण्य किमतीत तर टोमॅटो अक्षरश: फुकट वाटला जात आहे. तरीही ग्राहक मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकरी शेतात कमी अवधीत जादा पैसे मिळवून माळव्याची पिके घेत असतात; पण सध्या भाजीपाल्याची शेती दराअभावी तोट्यात जाऊ लागली आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून भाजी उत्पादक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, तोटा सहन करावा लागत आहे. नोटाबंदीचा काही अंशी दरावर परिणाम झाला असून, बाजारपेठेत अतिरिक्त भाजीपाल्याची आवक होत असल्याने शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री कवडीमोल दराने करावी लागत आहे.कोपर्डे हवेली परिसरात अनेक शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेत असतात. कोपर्डे हवेली येथील शेकरी दत्तात्रय पाटील यांची टोमॅटोची तीस गुंठे बाग होती. त्यांना कमी दराचा फटका बसला असून, एक लाखाचे नुकसान झाल्याने ऐन भरात आलेली बाग त्यांनी फळासह काढून टाकली आहे. तर वांगी उत्पादक शेतकरी भीमराव चव्हाण यांचे वांग्याचे शेत कऱ्हाड-मसूर रस्त्यालगत आहे. दर नसल्याने त्यांनी रस्त्यावर उभे राहून प्रवाशांना वांगली फुकट दिली. मात्र, तरीही कोण वांगी घेत नसल्याने त्यांनी बागच उपटून टाकली. पाच रुपये किलो वांग्याचा दर आहे. तिच परिस्थिती टोमॅटो पिकाची झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी झाडे काढून शेत रिकामे करीत असल्याचे दिसते. (वार्ताहर)सर्वच भाजीपाला कवडीमोल दरातसध्या बाजारात सर्वच भाजीपाल्याचे दर उतरले आहेत. त्यामुळे शेतकरी घायकुतीला आले आहेत. मेथीचा सध्याचा शेकड्याचा दर ३०० ते ४०० रुपये, कोथिंबीर शेकडा ५०० ते ६००, चाकवत ३०० ते ४००, पालक २०० ते ३००, टोमॅटो १ ते १.५ रुपये प्रतिकिलो, कोबी ४ ते ५ रुपये, फ्लॉवर ५ ते ६ रुपये, वांगी ५ ते ६ रुपये, गवारी ३० ते ३२ रुपये तर पावटा १८ ते २० रुपये किलोने विकला जात आहे. यातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही.