शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

वाहतुकीच्या नियमांचे पालन गरजेच

By admin | Updated: January 29, 2015 00:15 IST

पृथ्वीराज चव्हाण : नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावीे

कऱ्हाड : ‘वाहतुकीचे नियम पाळले तरच अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे़ मात्र आपल्याकडे वाहतूक नियमांबाबत निष्काळजीपणा दाखविला जातो़ त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,’ असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.येथील विठामाता विद्यालयात रस्ता सुरक्षा जनजागरण अभियानांतर्गत झालेल्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते़ यावेळी आमदार आनंदराव पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील, जयंत पाटील, पोलीस उपाधीक्षक मितेश घट्टे, अशोक पाटील, रवींद्र खंदारे उपस्थित होते़ आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘रस्ता सुरक्षा अभियानात सातत्य आवश्यक आहे़ केवळ वर्षातील आठवडाभर जाहिरातबाजी व बॅनरबाजी करून काहीही उपयोग होणार नाही़ वाहनांची संख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे़ मात्र, रस्त्यांची संख्या वाढविता येत नाही़ कऱ्हाडसारख्या ठिकाणी पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे़ या समस्येसह वाहतुकीचा प्रत्येक नियम, प्रत्येक वाहन चालकाने पाळण्याची आवश्यकता आहे़ केवळ एका वाहन चालकाने नियम पाळल्याने अपघातांची संख्या कमी होत नाही़ त्यामुळेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या प्रत्येक वाहन चालकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे़ कारवाई करता पोलिसांनी, उपप्रादेशिक परिवहनविभागाने कोणताही भेदभाव करू नये़ कायदा सर्वांना समान आहे़ हे नागरिकांनीही लक्षात ठेवावे.यावेळी रवींंद्र खंदारे, सुभाष पाटील, विद्यार्थी पंकज माने यांचीही भाषणे झाली़ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारिस यांनी प्रास्ताविक केले़ सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चैैतन्य कणसे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)