शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

वाहतुकीच्या नियमांचे पालन गरजेच

By admin | Updated: January 29, 2015 00:15 IST

पृथ्वीराज चव्हाण : नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावीे

कऱ्हाड : ‘वाहतुकीचे नियम पाळले तरच अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे़ मात्र आपल्याकडे वाहतूक नियमांबाबत निष्काळजीपणा दाखविला जातो़ त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,’ असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.येथील विठामाता विद्यालयात रस्ता सुरक्षा जनजागरण अभियानांतर्गत झालेल्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते़ यावेळी आमदार आनंदराव पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील, जयंत पाटील, पोलीस उपाधीक्षक मितेश घट्टे, अशोक पाटील, रवींद्र खंदारे उपस्थित होते़ आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘रस्ता सुरक्षा अभियानात सातत्य आवश्यक आहे़ केवळ वर्षातील आठवडाभर जाहिरातबाजी व बॅनरबाजी करून काहीही उपयोग होणार नाही़ वाहनांची संख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे़ मात्र, रस्त्यांची संख्या वाढविता येत नाही़ कऱ्हाडसारख्या ठिकाणी पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे़ या समस्येसह वाहतुकीचा प्रत्येक नियम, प्रत्येक वाहन चालकाने पाळण्याची आवश्यकता आहे़ केवळ एका वाहन चालकाने नियम पाळल्याने अपघातांची संख्या कमी होत नाही़ त्यामुळेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या प्रत्येक वाहन चालकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे़ कारवाई करता पोलिसांनी, उपप्रादेशिक परिवहनविभागाने कोणताही भेदभाव करू नये़ कायदा सर्वांना समान आहे़ हे नागरिकांनीही लक्षात ठेवावे.यावेळी रवींंद्र खंदारे, सुभाष पाटील, विद्यार्थी पंकज माने यांचीही भाषणे झाली़ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारिस यांनी प्रास्ताविक केले़ सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चैैतन्य कणसे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)