शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

शासनाकडून निधी अन् शाळांच्या त्रुटी राहिल्याने ‘आरटीई’ प्रवेश शुल्क संकटात (टेम्प्लेट)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई २००९) अंतर्गत वंचित आणि आर्थिक दुर्बल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई २००९) अंतर्गत वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. मात्र शासनाकडून शुल्काची रक्कम वेळेत न मिळणे आणि शाळांकडून प्रस्तावात त्रुटी राहणे यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांमधील ‘आरटीई’ प्रवेश संकटात सापडले आहेत.

विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्काची रक्कम संबंधित शाळांना शासन अदा करते. विद्यार्थ्यांच्यादृष्टीने शासन राबवित असलेली ‘आरटीई’ प्रवेशाची योजना चांगली आहे. पण, खासगी, विनाअनुदानित, इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा सर्व डोलारा हा शुल्कावर अवलंबून आहे. मात्र, आरटीई प्रवेशाचे शुल्क शासनाकडून वेळेत अदा होत नसल्याने शाळांवर आर्थिक ताण पडत आहे. दोन वर्षांचे पैसे अद्यापही शाळांना मिळालेले नाहीत. त्यामुळे ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रिया राबविणे शाळांना अडचणीचे ठरत आहे. शासनाने शुल्काचे पैसे वेळेत द्यावेत, अशी मागणी संस्थाचालकांकडून होत आहे.

चौकट

किती अपेक्षित होते, प्रत्यक्षात किती मिळाले...

२०१७-१८ या वर्षात किती मिळाले?

सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे तब्बल सात कोटी रुपयांचा निधी शिल्लक होता. त्यामुळे २०१७-२०१८ मध्ये त्यातील सुमारे २ कोटी ५० लाखांचा निधी नोंदणीकृत शाळांना देण्यात आला.

२०१८-१९ या वर्षात किती मिळाले?

अतिरिक्त निधीतील शेष बाकी असलेल्या रकमतून याही वर्षी पात्र शाळांना तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. ज्या शाळांनी अर्जांतील त्रुटी दूर केल्या त्या सर्वच शाळांचा निधी संपूर्णपणे अदा करण्यात आला.

२०१९-२० या वर्षात किती मिळाले?

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २०१९-२०२० मध्ये तब्बल तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच निधीसाठी अर्ज करण्यात आला. त्यानंतरही शाळांना याबाबत आवश्यक पूर्तता करण्याच्या सूचना देऊन याचे वाटप करण्यात आले.

प्रतिक्रिया...

इंग्रजी माध्यम, विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचे वेतन, अन्य शैक्षणिक खर्च हा विद्यार्थ्यांच्या शुल्कातून जमा होणाऱ्या रकमेतून केला जातो. आरटीई प्रवेशाचे शुल्क शासनाकडून वेळेत मिळत नाही. त्यामुळे संस्थेला खर्च करताना कसरत करावी लागते. ते लक्षात घेऊन शासनाने वेळेत पैसे द्यावेत.

- प्रशांत मोदी, सजग पालक ग्रुप, सातारा

शासनाकडून मिळणाऱ्या आरटीईच्या शुल्कासाठी दरवर्षी प्रतीक्षा करावी लागते. कोरोनाचा फटका संस्थांना बसला आहे. त्यामुळे थकीत असलेले आरटीईच्या शुल्काचे पैसे शासनाने ताबडतोब अदा करावेत.

- प्रथमेश वायदंडे, सातारा

यावर्षीचे आरटीई शुल्काचे पैसे अद्याप शासनाकडून प्राप्त झालेले नाहीत. त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. शासनाकडून निधी मिळाल्यानंतर शाळांना पैसे वितरित केले जातील.

- प्रभावती कोळेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी

आकडेवारी दृष्टिक्षेपात....

जिल्ह्यात आरटीई नोंदणीकृत शाळा :

आरटीईअंतर्गत झालेले प्रवेश

सन २०१७-१८ : १४२०

सन २०१८-१९ : १३४०

सन २०१९-२० : १३६२