शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

पुणे-सातारा प्रवास ७०० रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी संपाचे शस्त्र उगारले. संपामुळे हजारो सातारकर पुणे, मुंबईसह जिल्ह्याबाहेर अडकून राहिले आहेत. आपल्या माणसांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी धडपडणाºयांची खासगी प्रवासी वाहतुकदारांकडून लूट चालली आहे. सातारा-पुणे प्रवासासाठी तब्बल सातशे रुपये आकारले जात आहेत.परराज्यातून रातराणीने धावत असलेल्या गाड्या मध्यरात्री बारानंतर जवळच्या बसस्थानकात ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी संपाचे शस्त्र उगारले. संपामुळे हजारो सातारकर पुणे, मुंबईसह जिल्ह्याबाहेर अडकून राहिले आहेत. आपल्या माणसांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी धडपडणाºयांची खासगी प्रवासी वाहतुकदारांकडून लूट चालली आहे. सातारा-पुणे प्रवासासाठी तब्बल सातशे रुपये आकारले जात आहेत.परराज्यातून रातराणीने धावत असलेल्या गाड्या मध्यरात्री बारानंतर जवळच्या बसस्थानकात आणून लावण्यात आल्या. तेथेच प्रवाशांना उतरविण्यात आले. त्यानंतर मिळेल त्या वाहनांनी एसटीचे प्रवासी पुढील प्रवासाला लागले.पहिल्या दिवशी अडीच हजार फेºया थांबल्याया संपात जिल्ह्यातील ३ हजार ७०० कर्मचारी सहभागी झाले असून, मध्यरात्री बारा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत सुमारे २ हजार ५४६ फेºया रद्द झाल्या.हवा सोडली अन् प्रवेशद्वारात एसटीलांब पल्ल्याचे चालक-वाहक मध्यरात्री प्रवासी व त्यांचे साताºयात हाल होऊ नये म्हणून पुढील प्रवासाला जाण्यास तयार होते. परंतु सातारा जिल्ह्यातील काही संघटनांच्या पदाधिकाºयांनी त्याला विरोध केला. गाड्या पुढे जाऊ नयेत म्हणून चाकातील हवा सोडून दिली. तर काहींनी चक्क बाहेर पडण्याच्या मार्गात एसटी आडवी लावली.आगाऊ आरक्षणची रक्कम परतदिवाळीत बहुतांश मंडळी प्रत्यक्ष किंवा आॅनलाईन पद्धतीने आगाऊ आरक्षण करतात. या संपामुळे त्यांचेही हाल झाले. अशा प्रवाशांची तिकिटाची रक्कम त्यांच्या खात्यावर किंवा जेथून आरक्षण नोंद केली आहे. तेथून परत दिली जाणार आहे, अशी माहिती साताºयाचे विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मध्यरात्री एसटीचे अधिकारी महामार्गावरकर्मचाºयांचा संप मध्यरात्री बारा वाजता सुरू झाला. त्यामुळे बारानंतर सर्व गाड्या जवळच्या आगारात जमा केल्या जात होत्या. लांब पल्ल्याच्या प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून सर्व अधिकारी रात्री उशिरापर्यंत बसस्थानकात तळ ठोकून होते. सर्व गाड्या मुक्कामाच्या ठिकाणी नेऊन संपात सामील होण्याचे आवाहन केले जात होते. तसेच मार्गस्थ करण्यास सांगितले जात होते. ज्या चालक-वाहकांनी पुढे जाण्यास नकार दिला. त्या गाड्यांमधील प्रवाशांना वाढे फाटा येथे नेऊन सोडले जात होते.