शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

नामांतर होऊनही योजनेला मुडदूस--आपले सरकार सेवा केंद्रांचाचा परकेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:40 IST

ढेबेवाडी : एकविसाव्या शतकात आधुनिक महाराष्ट्रातील ‘मिनी मंत्रालय’ तथा ग्रामपंचायतींचा कारभार जलद आणि सुलभ व्हावा, या उद्देशाने ‘संग्राम’ योजना जन्माला आली. या योजनेचे नामांतर

रवींद्र माने।ढेबेवाडी : एकविसाव्या शतकात आधुनिक महाराष्ट्रातील ‘मिनी मंत्रालय’ तथा ग्रामपंचायतींचा कारभार जलद आणि सुलभ व्हावा, या उद्देशाने ‘संग्राम’ योजना जन्माला आली. या योजनेचे नामांतर करून उदयास आलेले ‘आपले सेवा सरकार’ योजनेलाच ‘मुडदूस’ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.तत्कालीन आघाडी शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळावी व माहिती तंत्रज्ञानाने समृद्ध बनवितावे यावे म्हणून निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाचा गळा घोटून स्वत:ची तुंबडी भरण्याचे काम संबंधीत ठेकेदार कंपनीने केले. याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.स्थानिक जनतेला आपल्या ग्रामपंचायतींमधूनच उतारे, दाखले आणि अन्य बँंकिंग सुविधा व सेवेचा लाभ मिळावा, या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रभर या योजनेचा डंका पिटला गेला. करोडो रुपयांचा निधीही खर्च करण्यात आला. मात्र, हे आपले सेवा सरकार खरंच जनतेची सेवा करतंय का? याचा शोध घेण्यात संबंधित यंत्रणा अपयशी ठरलीय हे निश्चित. या योजनेची व्याप्ती मोठी असली तरी या माध्यमातून सेवेऐवजी लुटच जास्त होत असल्याचे स्पष्ट होते.आपले सरकार सेवा केंद्र्रातील संगणक परिचारकास मोठी ग्रामपंचायत दरमहा सहा हजार रुपये मानधन तर सहा हजार रुपये स्टेशनरी व इतर खर्चासाठी ग्रामपंचायतीच्या माथी मारले जातात. ही रक्कम जिल्हा परिषद ग्रामपंचायतीकडून चौदाव्या वित्त आयोगाच्या रक्कमेतून जबरदस्तीने वर्ग करून घेते. जर ही रक्कम जिल्हा परिषद घेत असेल तर संबंधित कंपनी शासनाशी झालेल्या करारानुसार सेवा सुविधा ग्रामपंचायतींंना देते का? याचीही जिल्हा परिषदेने चौकशी करायला हवी.राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतीमधून कोट्यवधी रुपयांचा ‘मलिदा’ सर्वांच्या साक्षीने हडप केला जात आहे. असे असताना शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षनेते एवढेच काय पण ज्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाते.अशात ग्रामपंचायतींंचे पदाधिकारीदेखील मूग गिळून गप्प का? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित कंपनीचे चालक मालक शासनापेक्षाही मोठे आहेत की शासनच ते चालवत आहेत. असाच आरोप यामध्ये होरपळलेल्यासंगणक परिचारक, ग्रामसेवकतसेच सरपंचांकडून होऊ लागला आहे.शासनाकडून दखल घेण्याची गरज‘डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्र’ निर्मितीसाठी सर्वच ग्रामपंचायतींना पेपरलेस कामकाज पध्दतीचा अवलंब करावा लागत आहे. हे करण्यासाठी वरिष्ठांकडून संबंधित ग्रामपंचायतींमधील पारिचारिकांवर दबाव टाकला जात आहे.पेपरलेसच्या कामाची जबाबदारी ज्या कंपनीवर देण्यात आली आहे. त्या कंपनीने कोण कोणत्या ग्रामपंचायतीत किती संगणक परिचारक नेमले आहेत? त्याठिकाणी अपेक्षित स्टेशनरी दिली आहे का? या बाबींची शासनाकडून का दखल घेतली जात नाही? हा संशोधनाचा विषय बनला आहे.

परिचारक नेमणूकीचे अधिकार ग्रामपंचायतींना द्याआपले सेवा सरकार केंद्रांचा देखभालीसाठी ग्रामपंचायतींकडून पैसे उकळले जात आहेत. ग्रामपंचायतीच्या पैशावर खासगी कंपनी पोसण्याची गरजच काय? जर या केंद्रांचा कारभार सुरळीत करायचा असेल तर या केंद्राचे नियंत्रण ग्रामपंचायतींंना द्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे.