शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
3
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
4
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
5
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
6
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
7
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
8
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
10
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
11
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
12
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
13
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
14
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
15
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
16
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
17
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
18
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
19
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
20
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका तटस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:48 IST

इस्लामपूर : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संस्थापक राजू शेट्टी यांच्या परस्पर भूमिका जाहीर ...

इस्लामपूर : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संस्थापक राजू शेट्टी यांच्या परस्पर भूमिका जाहीर केल्याने अंतर्गत वाद उफाळला आहे. शेट्टी यांनी मात्र संघटनेची भूमिका तटस्थ असल्याचे स्पष्ट केले आहे.

निवडणूक जाहीर होताच वाळवा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर केला. यातूनच संघटनेत धुसफूस सुरू झाली. काहींनी संस्थापक व रयत पॅनलला पाठिंबा दिला. यामुळे संघटनेच्या पाठीशी असलेल्या ऊस उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. संघटनेचे कार्यकर्ते तिन्ही गटांत आहेत. तेच पॅनलप्रमुखांची राजू शेट्टींशी भेट घडवून आणण्याचे राजकारण करून पत्रकबाजी करत आहेत. त्यातून पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. कऱ्हाड, वाळवा, कडेगाव तालुक्यांत एकूण सभासदांपैकी ७ ते ८ टक्के सभासद संघटनेला मानतात, असा दावा संघटनेचा आहे. शेट्टी यांनी भूमिका मांडताना समतोलपणा राखला आहे. परंतु, कार्यकर्त्यांनी सोयीप्रमाणे भूमिका मांडल्या आहेत.

संघटनेचे तालुकाध्यक्ष रविकिरण माने यांनी सभासदांचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. ज्यांचा एक टनभरही ऊस कारखान्याला जात नाही, त्यांना या निवडणुकीवर भूमिका मांडण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न उपस्थित केला आहे. माने यांनी म्हटले आहे की, संस्थापक पॅनलला ज्यांनी पाठिंबा दिला आहे, ते कारखान्याचे सभासदसुद्धा नाहीत. दुसरीकडे संस्थापक पॅनलची सत्ता असताना काहींनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केल्याचा मुद्दाही पुढे आणला जात आहे.

कोट

सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ‘कृष्णे’च्या बाबतीत तटस्थ भूमिका घेतली आहे. अशीच भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. शेतकऱ्यांना न्याय देणे हे संघटनेचे मूळ धोरण आहे. त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावर कोणालाही पाठिंबा द्यावा. संघटनेची भूमिका स्पष्ट करण्याचे अधिकार कोणालाही देण्यात आलेले नाहीत.

- राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संस्थापक राजू शेट्टी यांच्या परस्पर भूमिका जाहीर केल्याने अंतर्गत वाद उफाळला आहे. शेट्टी यांनी मात्र संघटनेची भूमिका तटस्थ असल्याचे स्पष्ट केले आहे.

निवडणूक जाहीर होताच वाळवा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर केला. यातूनच संघटनेत धुसफूस सुरू झाली. काहींनी संस्थापक व रयत पॅनलला पाठिंबा दिला. यामुळे संघटनेच्या पाठीशी असलेल्या ऊस उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. संघटनेचे कार्यकर्ते तिन्ही गटांत आहेत. तेच पॅनलप्रमुखांची राजू शेट्टींशी भेट घडवून आणण्याचे राजकारण करून पत्रकबाजी करत आहेत. त्यातून पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. कऱ्हाड, वाळवा, कडेगाव तालुक्यांत एकूण सभासदांपैकी ७ ते ८ टक्के सभासद संघटनेला मानतात, असा दावा संघटनेचा आहे. शेट्टी यांनी भूमिका मांडताना समतोलपणा राखला आहे. परंतु, कार्यकर्त्यांनी सोयीप्रमाणे भूमिका मांडल्या आहेत.

संघटनेचे तालुकाध्यक्ष रविकिरण माने यांनी सभासदांचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. ज्यांचा एक टनभरही ऊस कारखान्याला जात नाही, त्यांना या निवडणुकीवर भूमिका मांडण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न उपस्थित केला आहे. माने यांनी म्हटले आहे की, संस्थापक पॅनलला ज्यांनी पाठिंबा दिला आहे, ते कारखान्याचे सभासदसुद्धा नाहीत. दुसरीकडे संस्थापक पॅनलची सत्ता असताना काहींनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केल्याचा मुद्दाही पुढे आणला जात आहे.

कोट

सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ‘कृष्णे’च्या बाबतीत तटस्थ भूमिका घेतली आहे. अशीच भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. शेतकऱ्यांना न्याय देणे हे संघटनेचे मूळ धोरण आहे. त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावर कोणालाही पाठिंबा द्यावा. संघटनेची भूमिका स्पष्ट करण्याचे अधिकार कोणालाही देण्यात आलेले नाहीत.

- राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना