शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका तटस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:48 IST

इस्लामपूर : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संस्थापक राजू शेट्टी यांच्या परस्पर भूमिका जाहीर ...

इस्लामपूर : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संस्थापक राजू शेट्टी यांच्या परस्पर भूमिका जाहीर केल्याने अंतर्गत वाद उफाळला आहे. शेट्टी यांनी मात्र संघटनेची भूमिका तटस्थ असल्याचे स्पष्ट केले आहे.

निवडणूक जाहीर होताच वाळवा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर केला. यातूनच संघटनेत धुसफूस सुरू झाली. काहींनी संस्थापक व रयत पॅनलला पाठिंबा दिला. यामुळे संघटनेच्या पाठीशी असलेल्या ऊस उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. संघटनेचे कार्यकर्ते तिन्ही गटांत आहेत. तेच पॅनलप्रमुखांची राजू शेट्टींशी भेट घडवून आणण्याचे राजकारण करून पत्रकबाजी करत आहेत. त्यातून पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. कऱ्हाड, वाळवा, कडेगाव तालुक्यांत एकूण सभासदांपैकी ७ ते ८ टक्के सभासद संघटनेला मानतात, असा दावा संघटनेचा आहे. शेट्टी यांनी भूमिका मांडताना समतोलपणा राखला आहे. परंतु, कार्यकर्त्यांनी सोयीप्रमाणे भूमिका मांडल्या आहेत.

संघटनेचे तालुकाध्यक्ष रविकिरण माने यांनी सभासदांचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. ज्यांचा एक टनभरही ऊस कारखान्याला जात नाही, त्यांना या निवडणुकीवर भूमिका मांडण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न उपस्थित केला आहे. माने यांनी म्हटले आहे की, संस्थापक पॅनलला ज्यांनी पाठिंबा दिला आहे, ते कारखान्याचे सभासदसुद्धा नाहीत. दुसरीकडे संस्थापक पॅनलची सत्ता असताना काहींनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केल्याचा मुद्दाही पुढे आणला जात आहे.

कोट

सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ‘कृष्णे’च्या बाबतीत तटस्थ भूमिका घेतली आहे. अशीच भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. शेतकऱ्यांना न्याय देणे हे संघटनेचे मूळ धोरण आहे. त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावर कोणालाही पाठिंबा द्यावा. संघटनेची भूमिका स्पष्ट करण्याचे अधिकार कोणालाही देण्यात आलेले नाहीत.

- राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संस्थापक राजू शेट्टी यांच्या परस्पर भूमिका जाहीर केल्याने अंतर्गत वाद उफाळला आहे. शेट्टी यांनी मात्र संघटनेची भूमिका तटस्थ असल्याचे स्पष्ट केले आहे.

निवडणूक जाहीर होताच वाळवा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर केला. यातूनच संघटनेत धुसफूस सुरू झाली. काहींनी संस्थापक व रयत पॅनलला पाठिंबा दिला. यामुळे संघटनेच्या पाठीशी असलेल्या ऊस उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. संघटनेचे कार्यकर्ते तिन्ही गटांत आहेत. तेच पॅनलप्रमुखांची राजू शेट्टींशी भेट घडवून आणण्याचे राजकारण करून पत्रकबाजी करत आहेत. त्यातून पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. कऱ्हाड, वाळवा, कडेगाव तालुक्यांत एकूण सभासदांपैकी ७ ते ८ टक्के सभासद संघटनेला मानतात, असा दावा संघटनेचा आहे. शेट्टी यांनी भूमिका मांडताना समतोलपणा राखला आहे. परंतु, कार्यकर्त्यांनी सोयीप्रमाणे भूमिका मांडल्या आहेत.

संघटनेचे तालुकाध्यक्ष रविकिरण माने यांनी सभासदांचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. ज्यांचा एक टनभरही ऊस कारखान्याला जात नाही, त्यांना या निवडणुकीवर भूमिका मांडण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न उपस्थित केला आहे. माने यांनी म्हटले आहे की, संस्थापक पॅनलला ज्यांनी पाठिंबा दिला आहे, ते कारखान्याचे सभासदसुद्धा नाहीत. दुसरीकडे संस्थापक पॅनलची सत्ता असताना काहींनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केल्याचा मुद्दाही पुढे आणला जात आहे.

कोट

सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ‘कृष्णे’च्या बाबतीत तटस्थ भूमिका घेतली आहे. अशीच भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. शेतकऱ्यांना न्याय देणे हे संघटनेचे मूळ धोरण आहे. त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावर कोणालाही पाठिंबा द्यावा. संघटनेची भूमिका स्पष्ट करण्याचे अधिकार कोणालाही देण्यात आलेले नाहीत.

- राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना