शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘रोहयो’बाबत अधिकारी फैलावर

By admin | Updated: December 24, 2014 23:38 IST

उपजिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा इशारा : मिरज पंचायत समितीमध्ये बैठक

मिरज : मिरज तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांसंबंधी अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपजिल्हाधिकारी सुचेता भिकाणे यांनी झाडाझडती घेतली. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी बजावले. मिरज पंचायत समितीत सुचेता भिकाणे यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेतला.यावेळी तहसीलदार किशोर घाडगे, गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे, सहायक गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तालुक्याच्या पूर्व भागातील २९ गावांत रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विहीर, नालाबंडींग, गोठा, क्रीडांगण व बिहार पॅटर्न वृक्ष लागवडीच्या कामांची त्यांनी माहिती घेतली. जत, आटपाडी हे तालुके रोजगार हमी योजनेची कामे राबविण्यात आघाडीवर आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना रोजगाराचा लाभ मिळत आहे.मिरज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांच्या प्रस्तावांना १५ दिवसात मंजुरी देण्याची गरज असताना, सहा महिने कामांना मंजुरी दिली जात नसल्याच्या तक्रारीची दखल घेऊन भिकाणे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना विलंबाबाबत विचारणा केली. रोजगार हमी योजनेची कामे ही सामुदायिकपणे राबविण्यासाठी राज्य शासनाच्या विभागप्रमुखांनीही जबाबदारी घेण्याची गरज आहे. सध्या या कामांचा भार पंचायत समितीवर पडत असल्याचे कारण गटविकास अधिकारी वाघमोडे यांनी सांगितले. यावेळी कामात दिरंगाई करणाऱ्या या विभागातील कर्मचाऱ्यांनाही चांगलेच फैलावर घेतले. योजनेच्या कामांची वेळेत पूर्तता करुन संबंधितांना लाभ देण्यात कुचराई केल्यास गय केली जाणार नसल्याचे सुनावले. यावेळी जि. प. व पंचायत समिती सदस्यांनी सरपंच, ग्रामसेवक सहकार्य करीत नसल्याची तक्रार केली. पदाधिकारी व अधिकाऱ्यांत समन्वय असल्याशिवाय रोजगार हमी योजनेच्या कामांना गती येणार नाही. समन्वयाने काम केल्यास तालुक्यात या योजनेचा इतर तालुक्यांपेक्षा प्रभाव दिसेल, अशी सूचना सभापती दिलीप बुरसे यांनी केली. याची दखल घेऊन भिकाणे यांनी सरपंच, ग्रामसेवक यांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कामे करण्याची सूचना केली. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गाव दत्तक योजना संकल्पनाही भिकाणे यांनी मांडली. जि. प. सदस्य प्रकाश देसाई, शंकर पाटील, बाबासाहेब कांबळे, अरूण राजमाने, सतीश नीळकंठ या पंचायत समिती सदस्यांसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)गटविकास अधिकाऱ्यांना जाबमिरज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांच्या प्रस्तावांना १५ दिवसात मंजुरी देण्याची गरज असताना, सहा महिने कामांना मंजुरी दिली जात नसल्याच्या तक्रारीची दखल घेऊन भिकाणे यांनी गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे यांना विलंबाबाबत विचारणा केली. सध्या या कामांचा भार पंचायत समितीवर पडत असल्याचे कारण वाघमोडे यांनी सांगितले. कामात दिरंगाई करणाऱ्या या विभागातील कर्मचाऱ्यांनाही चांगलेच फैलावर घेतले.