शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
4
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
5
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
6
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
7
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
8
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
9
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
10
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
11
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
12
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
13
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
14
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
15
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
16
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
17
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
18
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
19
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
20
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध

‘रोहयो’बाबत अधिकारी फैलावर

By admin | Updated: December 24, 2014 23:38 IST

उपजिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा इशारा : मिरज पंचायत समितीमध्ये बैठक

मिरज : मिरज तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांसंबंधी अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपजिल्हाधिकारी सुचेता भिकाणे यांनी झाडाझडती घेतली. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी बजावले. मिरज पंचायत समितीत सुचेता भिकाणे यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेतला.यावेळी तहसीलदार किशोर घाडगे, गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे, सहायक गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तालुक्याच्या पूर्व भागातील २९ गावांत रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विहीर, नालाबंडींग, गोठा, क्रीडांगण व बिहार पॅटर्न वृक्ष लागवडीच्या कामांची त्यांनी माहिती घेतली. जत, आटपाडी हे तालुके रोजगार हमी योजनेची कामे राबविण्यात आघाडीवर आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना रोजगाराचा लाभ मिळत आहे.मिरज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांच्या प्रस्तावांना १५ दिवसात मंजुरी देण्याची गरज असताना, सहा महिने कामांना मंजुरी दिली जात नसल्याच्या तक्रारीची दखल घेऊन भिकाणे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना विलंबाबाबत विचारणा केली. रोजगार हमी योजनेची कामे ही सामुदायिकपणे राबविण्यासाठी राज्य शासनाच्या विभागप्रमुखांनीही जबाबदारी घेण्याची गरज आहे. सध्या या कामांचा भार पंचायत समितीवर पडत असल्याचे कारण गटविकास अधिकारी वाघमोडे यांनी सांगितले. यावेळी कामात दिरंगाई करणाऱ्या या विभागातील कर्मचाऱ्यांनाही चांगलेच फैलावर घेतले. योजनेच्या कामांची वेळेत पूर्तता करुन संबंधितांना लाभ देण्यात कुचराई केल्यास गय केली जाणार नसल्याचे सुनावले. यावेळी जि. प. व पंचायत समिती सदस्यांनी सरपंच, ग्रामसेवक सहकार्य करीत नसल्याची तक्रार केली. पदाधिकारी व अधिकाऱ्यांत समन्वय असल्याशिवाय रोजगार हमी योजनेच्या कामांना गती येणार नाही. समन्वयाने काम केल्यास तालुक्यात या योजनेचा इतर तालुक्यांपेक्षा प्रभाव दिसेल, अशी सूचना सभापती दिलीप बुरसे यांनी केली. याची दखल घेऊन भिकाणे यांनी सरपंच, ग्रामसेवक यांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कामे करण्याची सूचना केली. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गाव दत्तक योजना संकल्पनाही भिकाणे यांनी मांडली. जि. प. सदस्य प्रकाश देसाई, शंकर पाटील, बाबासाहेब कांबळे, अरूण राजमाने, सतीश नीळकंठ या पंचायत समिती सदस्यांसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)गटविकास अधिकाऱ्यांना जाबमिरज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांच्या प्रस्तावांना १५ दिवसात मंजुरी देण्याची गरज असताना, सहा महिने कामांना मंजुरी दिली जात नसल्याच्या तक्रारीची दखल घेऊन भिकाणे यांनी गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे यांना विलंबाबाबत विचारणा केली. सध्या या कामांचा भार पंचायत समितीवर पडत असल्याचे कारण वाघमोडे यांनी सांगितले. कामात दिरंगाई करणाऱ्या या विभागातील कर्मचाऱ्यांनाही चांगलेच फैलावर घेतले.