शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश!

By admin | Updated: February 23, 2016 00:40 IST

तिघांना अटक : लिफ्टच्या बहाण्याने राज्यभर धुमाकूळ; कऱ्हाड पोलिसांची कारवाई

कऱ्हाड : महामार्गासह राज्यमार्गावरून ‘लिफ्ट’ देण्याचे आमिष दाखवत जीपमध्ये प्रवासी घेऊन त्यांना लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दोन मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक पाच दिवसांपासून लातूरमध्ये तळ ठोकून आहे. या दरोडेखोरांकडून गुन्ह्यात वापरलेली एक जीपही हस्तगत करण्यात आली आहे. ईश्वर दुबळे (रा. परांडा-उस्मानाबाद), तुकाराम ऊर्फ नाना मुंढे (बीड), संतोष काशीद (पाटोदा-बीड) अशी याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. या तिघांनाही तपास पथकाने बोरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तेथील एक गुन्हा उघडकीस आला असून, अन्य गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कसून चौकशी सुरू आहे. कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावरून तीन प्रवासी जीपमध्ये घेऊन त्यांना खोडशीनजीक लुटण्यात आल्याचा प्रकार आठ दिवसांपूर्वी घडला होता. या गुन्ह्याची नोंद तळबीड पोलिसांत झाली होती. मात्र, कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या गुन्ह्याचा कसून तपास सुरू केला. उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर व वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक हणमंत काकंडकी यांचे पथक पाच दिवसांपूर्वी तपासासाठी लातूर जिल्ह्यात गेले. तेथे मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने काही ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी या गुन्ह्यातील नावे निष्पन्न झाली. काही ठिकाणी या तपास पथकाला अटकाव करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, स्थानिक पोलिसांची मदत घेत पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींचा पिच्छा पुरविला. अखेर उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा व बीड जिल्ह्यातील पाटोदा येथून तीन आरोपींना पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी काही गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात वापरलेली जीपही पोलिसांच्या हाती लागली. संबंधित जीप पोलिसांनी लातूर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. तर आरोपींना बोरगावमधील गुन्ह्याच्या तपासासाठी बोरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. टोळीतील दोन मुख्य सूत्रधार अद्याप पसार आहेत. त्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे पथक लातूरमध्येच तळ ठोकून आहे. टेपचा आवाज वाढवून मारहाण महामार्गासह राज्यमार्गांवर वाहनाची वाट पाहत थांबलेले प्रवासी हेरून पुढील मोठ्या शहराचे नाव घेत प्रवासी जीपमध्ये घ्यायचे. काही अंतरावर गेल्यानंतर जीपमधील म्युझिक सिस्टमचा आवाज वाढवायचा व प्रवाशांना मारहाण करीत त्यांच्याकडील पैसे, दागिने व रोकड काढून घेत त्यांना निर्जनस्थळी रस्त्यावर सोडून द्यायचे, अशी या टोळीची गुन्हा करण्याची पद्धत होती. टोळीने आजपर्यंत अनेकांना लुटले आहे. सात जिल्ह्यांत पंचवीसहून अधिक गुन्हे कऱ्हाडच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या या टोळीने गत काही महिन्यांपासून राज्यभर धुमाकूळ घातला होता. उस्मानाबाद, बीड, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे ग्रामीण या जिल्ह्यांमध्ये ही टोळी कार्यरत होती. या जिल्ह्यांत पंचवीसहून अधिक गुन्हे या टोळीने केले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.