शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश!

By admin | Updated: February 23, 2016 00:40 IST

तिघांना अटक : लिफ्टच्या बहाण्याने राज्यभर धुमाकूळ; कऱ्हाड पोलिसांची कारवाई

कऱ्हाड : महामार्गासह राज्यमार्गावरून ‘लिफ्ट’ देण्याचे आमिष दाखवत जीपमध्ये प्रवासी घेऊन त्यांना लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दोन मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक पाच दिवसांपासून लातूरमध्ये तळ ठोकून आहे. या दरोडेखोरांकडून गुन्ह्यात वापरलेली एक जीपही हस्तगत करण्यात आली आहे. ईश्वर दुबळे (रा. परांडा-उस्मानाबाद), तुकाराम ऊर्फ नाना मुंढे (बीड), संतोष काशीद (पाटोदा-बीड) अशी याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. या तिघांनाही तपास पथकाने बोरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तेथील एक गुन्हा उघडकीस आला असून, अन्य गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कसून चौकशी सुरू आहे. कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावरून तीन प्रवासी जीपमध्ये घेऊन त्यांना खोडशीनजीक लुटण्यात आल्याचा प्रकार आठ दिवसांपूर्वी घडला होता. या गुन्ह्याची नोंद तळबीड पोलिसांत झाली होती. मात्र, कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या गुन्ह्याचा कसून तपास सुरू केला. उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर व वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक हणमंत काकंडकी यांचे पथक पाच दिवसांपूर्वी तपासासाठी लातूर जिल्ह्यात गेले. तेथे मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने काही ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी या गुन्ह्यातील नावे निष्पन्न झाली. काही ठिकाणी या तपास पथकाला अटकाव करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, स्थानिक पोलिसांची मदत घेत पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींचा पिच्छा पुरविला. अखेर उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा व बीड जिल्ह्यातील पाटोदा येथून तीन आरोपींना पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी काही गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात वापरलेली जीपही पोलिसांच्या हाती लागली. संबंधित जीप पोलिसांनी लातूर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. तर आरोपींना बोरगावमधील गुन्ह्याच्या तपासासाठी बोरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. टोळीतील दोन मुख्य सूत्रधार अद्याप पसार आहेत. त्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे पथक लातूरमध्येच तळ ठोकून आहे. टेपचा आवाज वाढवून मारहाण महामार्गासह राज्यमार्गांवर वाहनाची वाट पाहत थांबलेले प्रवासी हेरून पुढील मोठ्या शहराचे नाव घेत प्रवासी जीपमध्ये घ्यायचे. काही अंतरावर गेल्यानंतर जीपमधील म्युझिक सिस्टमचा आवाज वाढवायचा व प्रवाशांना मारहाण करीत त्यांच्याकडील पैसे, दागिने व रोकड काढून घेत त्यांना निर्जनस्थळी रस्त्यावर सोडून द्यायचे, अशी या टोळीची गुन्हा करण्याची पद्धत होती. टोळीने आजपर्यंत अनेकांना लुटले आहे. सात जिल्ह्यांत पंचवीसहून अधिक गुन्हे कऱ्हाडच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या या टोळीने गत काही महिन्यांपासून राज्यभर धुमाकूळ घातला होता. उस्मानाबाद, बीड, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे ग्रामीण या जिल्ह्यांमध्ये ही टोळी कार्यरत होती. या जिल्ह्यांत पंचवीसहून अधिक गुन्हे या टोळीने केले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.