शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
4
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
5
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
6
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
7
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
8
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
9
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
10
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
11
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
12
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
13
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
14
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
15
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
16
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
17
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
18
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
20
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

रस्ते केले पण ‘पाण्यात’ गेले!

By admin | Updated: December 26, 2014 23:56 IST

नागरिकांचे हाल : जीवन प्राधिकरण, पालिका प्रशासनाचा समन्वयाचा अभाव

सातारा : साताऱ्यात नव्याने केलेले रस्ते पुन्हा खोदायला सुरुवात झाली आहे. जीवन प्राधिकरण आणि नगरपालिका प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्याने रस्त्यांसाठी केलेला खर्च पाण्यात जाण्याची वेळ आली आहे.गेल्या वर्षी सातारकरांना संपूर्ण पावसाळ्यात चिखल आणि खड्ड्यांतून जावे लागले. रस्त्यांवर तात्पुरती मलमपट्टी करून खड्डे भरले जात होते. अनेकवेळा नागरिकांना रस्त्यांसाठी आंदोलनेही करावी लागली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरामध्ये काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू झाली. मात्र, पुन्हा आचारसंहिता लागल्याने रस्त्यांची कामे रखडली गेली; परंतु निवडणूक झाल्यानंतर रस्त्यांच्या कामांना वेग आला. शहरातील मुख्य रस्ते आणि पेठांमध्येही बऱ्यापैकी रस्ते चकाचक होत नाही तोपर्यंत प्राधिकरणाने नवे रस्ते केलेले खोदण्यात सुरुवात केली. त्यामुळे नवीन रस्ते केलेल्याचा खर्च पाण्यात जात आहे.वास्तविक, नवीन रस्ते तयार करण्यापूर्वी पाईपलाईन अथवा दूरध्वनी केबल वायरची कामे करणे क्रमप्राप्त होते. परंतु, ठेकेदारीमध्ये सर्वस्व पणाला लावलेल्या काही मूठभर अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण होत आहे. नागरिकांनी कर रूपाने दिलेले पैसे असे डोळ्यांदेखत या ना त्या कारणाने खर्च होत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी नेमके काय करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जीवन प्राधिकरण म्हणतेय पालिकेचे काम सुरू आहे. अन् पालिका म्हणतेय जीवन प्राधिकरणचे काम सुरू आहे, अशा प्रकारची एकमेकांवर टोलवाटोलवी करण्यापलीकडे अधिकाऱ्यांकडून काहीच होत नाही. वास्तविक, छोटे-मोठे लिकेज असेल, तर ते काढणे भागच आहे. परंतु, त्यासाठी नागरिकांना वेठीस कशासाठी धरले जाते. दर दोन महिन्यांने काही ना काही रस्त्यांमध्ये खोदकाम सुरूच असते. या दोन्ही विभागांना खरोखरच कामे करायची आहेत की, आलेला निधी खर्च करण्यासाठी रस्ते खोदायचे आहेत, याविषयी शंका उपस्थित करण्यासारखे आहे. सर्वसामान्य नागरिक मात्र रस्ता खोदलाय म्हणून दाद कोणाकडे मागायची, आपले काम भले आणि आपण, अशी मानसिकता ठेवून लोक रस्त्यांच्या खोदकामाकडे कानाडोळा करतायत; परंतु अधिकारी मात्र शासनाकडून आलेला मलिदा लाटण्यासाठी दिवसरात्र रस्ते खोदतायत, अशी स्थिती सध्या सातारा शहरात दिसत आहे. (प्रतिनिधी)गळती एकीकडे दुरुस्ती दुसरीकडे..दोन दिवसांपूर्वी राजवाडा परिसरामध्ये नवीन रस्ता खोदण्यात आला. पाईपची दुरुस्ती करण्यासाठी म्हणे, हा रस्ता खोदण्यात आला होता; परंतु रस्ता खोदणाऱ्या कर्मचाऱ्यांना गळती काही सापडेना. त्यामुळे त्यांनी तब्बल तीन ठिकाणी रस्ता खोदला, तरीही त्यांना गळती काही सापडले नाही.अखेर आणखी एक खड्डा खणला, त्यावेळी त्यांना ही गळती सापडली. अशा पद्धतीने जर शहरातील रस्त्यांची कामे केली गेली तर एकही रस्ता खड्ड्यांशिवाय दिसणार नाही.