शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

४५ वर्षे रखडले रस्त्याचे काम

By admin | Updated: July 25, 2016 23:43 IST

ग्रामस्थांचे होतायत हाल : वाई-कोरेगावला जोडणाऱ्या रस्त्यातील अडथळा हटता हटेना

भुर्इंज : रस्ते विकासाच्या रक्तवाहिन्या म्हणून संबोधल्या जातात. वेळेची बचत होण्यासोबतच जनतेची सोय व्हावी म्हणून अनेक जवळचे मार्ग निर्माण करण्यावर भर दिला जातो. वाई आणि कोरेगाव तालुक्याला जोडणाऱ्या अशाच एका जवळच्या मार्गाचे काम ही सुरू झाले होते. मात्र, थोडेफार अपूर्ण राहिलेले हे काम थोडेथोडके नव्हे तर तब्बल ४५ वर्षे रखडले आहे.१९७२ मध्ये पडलेल्या भयाण दुष्काळात शासनाने रोजगार हमी योजनेच्या कामाला गती दिली. त्या योजनेतूनच वाई तालुक्याच्या पूर्व भागातून लगडवाडी येथून कोरेगाव तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. दोन्ही बाजूने हे काम मोठ्या प्रमाणावर पूर्णत्वासही गेले. मात्र, लगडवाडी येथील डोंगरातील घाटातील काही काम रखडले आणि दोन्ही तालुक्यांना जवळच्या मार्गाने जोडणारा हा रस्ता रखडला तो रखडलाच!तब्बल ४५ वर्षे रखडलेल्या या कामाकडे पुन्हा कधीच कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष गेले नाही, हे विशेष. १९७२ मध्ये पडलेल्या भयानक दुष्काळात रोजगार हमी योजनेवर काम केल्यानंतर जनतेला धान्य मिळायचे. त्यामुळे ठिकठिकाणी अशा योजनेतून अनेक कामांना गती देण्यात आली. त्यातूनच वाई तालुक्याच्या पूर्व भागाला आणि कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागाला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम सुरू झाले.स्थानिक ग्रामस्थांनी अहोरात्र राबून रस्ता तयार केला. अगदी चंदन वंदनच्या डोंगरातील या मार्गाच्या घाट रस्त्याचेही काम मोठ्या प्रमाणावर झाले. मात्र, दुष्काळाचे सावट हटले आणि पुढे हे कामच थांबले. या मार्गामुळे भुर्इंजहून किकली, लगडवाडीमार्गे या घाटरस्त्याने थेट बनवडी व तेथून पुढे कोरेगावला कमी वेळात व कमी अंतर पार करून जाणे शक्य आहे. बनवडीपर्यंतचा रस्ता ठिक आहे आणि डोंगराच्या या बाजूला लागवडीपर्यंतही हा रस्ता ठिक आहे. डोंगरातील घाटरस्त्याची नव्याने डागडुजी केल्यास हा रस्ता वाहतुकीसाठी सोयीचा आणि वेळ व इंधन वाचविणारा ठरणार आहे. कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातून व वाई तालुक्यातील पूर्व भागातून या मार्गाने रहदारी वाढू शकणार आहे. त्यामुळे इच्छाशक्तीचा थोडा रेटा लावला तर वाई आणि कोरेगाव तालुक्यासाठी सुलभ ठरणारा एक नवा मार्ग अस्तित्वात येईल व नवी विकासवाट निर्माण होईल. त्यामुळे ४५ वर्षे अडलेल्या या विकासवाटेतील अडथळे दूर करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे परिसरात राहणारे आणि कायमस्वरूपी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची उत्कृष्ट सोय होणार आहे. या रस्त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर तालुक्याच्या नेत्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)