शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

४५ वर्षे रखडले रस्त्याचे काम

By admin | Updated: July 25, 2016 23:43 IST

ग्रामस्थांचे होतायत हाल : वाई-कोरेगावला जोडणाऱ्या रस्त्यातील अडथळा हटता हटेना

भुर्इंज : रस्ते विकासाच्या रक्तवाहिन्या म्हणून संबोधल्या जातात. वेळेची बचत होण्यासोबतच जनतेची सोय व्हावी म्हणून अनेक जवळचे मार्ग निर्माण करण्यावर भर दिला जातो. वाई आणि कोरेगाव तालुक्याला जोडणाऱ्या अशाच एका जवळच्या मार्गाचे काम ही सुरू झाले होते. मात्र, थोडेफार अपूर्ण राहिलेले हे काम थोडेथोडके नव्हे तर तब्बल ४५ वर्षे रखडले आहे.१९७२ मध्ये पडलेल्या भयाण दुष्काळात शासनाने रोजगार हमी योजनेच्या कामाला गती दिली. त्या योजनेतूनच वाई तालुक्याच्या पूर्व भागातून लगडवाडी येथून कोरेगाव तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. दोन्ही बाजूने हे काम मोठ्या प्रमाणावर पूर्णत्वासही गेले. मात्र, लगडवाडी येथील डोंगरातील घाटातील काही काम रखडले आणि दोन्ही तालुक्यांना जवळच्या मार्गाने जोडणारा हा रस्ता रखडला तो रखडलाच!तब्बल ४५ वर्षे रखडलेल्या या कामाकडे पुन्हा कधीच कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष गेले नाही, हे विशेष. १९७२ मध्ये पडलेल्या भयानक दुष्काळात रोजगार हमी योजनेवर काम केल्यानंतर जनतेला धान्य मिळायचे. त्यामुळे ठिकठिकाणी अशा योजनेतून अनेक कामांना गती देण्यात आली. त्यातूनच वाई तालुक्याच्या पूर्व भागाला आणि कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागाला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम सुरू झाले.स्थानिक ग्रामस्थांनी अहोरात्र राबून रस्ता तयार केला. अगदी चंदन वंदनच्या डोंगरातील या मार्गाच्या घाट रस्त्याचेही काम मोठ्या प्रमाणावर झाले. मात्र, दुष्काळाचे सावट हटले आणि पुढे हे कामच थांबले. या मार्गामुळे भुर्इंजहून किकली, लगडवाडीमार्गे या घाटरस्त्याने थेट बनवडी व तेथून पुढे कोरेगावला कमी वेळात व कमी अंतर पार करून जाणे शक्य आहे. बनवडीपर्यंतचा रस्ता ठिक आहे आणि डोंगराच्या या बाजूला लागवडीपर्यंतही हा रस्ता ठिक आहे. डोंगरातील घाटरस्त्याची नव्याने डागडुजी केल्यास हा रस्ता वाहतुकीसाठी सोयीचा आणि वेळ व इंधन वाचविणारा ठरणार आहे. कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातून व वाई तालुक्यातील पूर्व भागातून या मार्गाने रहदारी वाढू शकणार आहे. त्यामुळे इच्छाशक्तीचा थोडा रेटा लावला तर वाई आणि कोरेगाव तालुक्यासाठी सुलभ ठरणारा एक नवा मार्ग अस्तित्वात येईल व नवी विकासवाट निर्माण होईल. त्यामुळे ४५ वर्षे अडलेल्या या विकासवाटेतील अडथळे दूर करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे परिसरात राहणारे आणि कायमस्वरूपी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची उत्कृष्ट सोय होणार आहे. या रस्त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर तालुक्याच्या नेत्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)