शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

वाहतूक कोंडीत अडकला ‘प्रतापगड’चा रस्ता

By admin | Updated: January 4, 2017 22:23 IST

पर्यटकांची वाट बिकट : रस्त्याची अवस्थाही दयनीय; तीन-चार किलोमीटर पर्यंत लागतायत वाहनांच्या रांगा

महाबळेश्वर : मराठा साम्राज्याच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देत उभा असलेला प्रतापगड किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. महाबळेश्वरात दाखल होणारे हजारो पर्यटक दररोज प्रतापगडावर हजेरी लावतात. मात्र, या किल्ल्याकडे जाणारी वाट बिकट झाली असून, पर्यटकांचा याचा मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे, तर किल्ल्याच्या पायथ्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागत असून, वाहतूक कोंडीने अनेकांची दमछाक उडत आहे.महाबळेश्वर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची नेहमीच रेलचेल सुरू असते. शहरापासून २४ किलोमीटर अंतरावर असलेला प्रतापगड किल्लाही पर्यटकांना नेहमीच आकर्षिक करीत असतो. यामुळे महाबळेश्वरला भेट देणारे हजारो पर्यटक प्रतापगड किल्ला पाहिल्याशिवाय परतीच्या प्रवासाचा निघत नाहीत.पर्यटकांचा हंगाम असो अथवा नसो प्रतापगडावर मात्र पर्यटकांची सतत वर्दळ असते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागता आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी पुरेशी जागा नसल्याने अनेक वाहनधारक रस्त्याकडेला वाहने पार्क करीत आहेत. परिणामी ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहनधारकांची दमछाक होतेय शिवाय वेळही वाया जातो. वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या झाली असून, पर्यटकांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे. (प्रतिनिधी)...तर पायवाटेने प्रवासवाहतूक कोंडी झाल्यानंतर पर्यटकांना वाहतूक पूर्ववत होईपर्यंत तासन्तास वाट पाहत बसावे लागत आहे. त्यामुळे अनेक पर्यटक जिथे जागा मिळेल तिथे गाडी पार्क करून प्रतापगडाकडे चालतच कूच करीत आहेत. गडाकडे जाण्यासाठी जंगलातून एक पायवाट आहे. या वाटेद्वारेही पर्यटक गडावर येत आहे. केवळ वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना अनेक समस्या उद्भवत असून, याबाबत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना आखणे गरजेचे आहे. अन्यथा याचा पर्यटनावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.रस्त्याकडेला दगडांचे ढीग...वाडा-कुंभरोशी ते प्रतापगड या चार किलोमीटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, सर्वत्र खड्डेच-खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संबंधित विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. मात्र, एक वर्षापासून हे काम संथ गतीने सुरू आहे. संरक्षक कठडे बांधण्यासाठी लागणाऱ्या दगडी रस्त्याकडेला टाकण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या दगडी रस्त्याकडेला ‘जैसे थे’ असून, वाहतुकीस याचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्याचे काम कधी मार्गी लागणार याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही.