शहरं
Join us  
Trending Stories
1
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
2
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
3
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
4
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
5
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
6
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
7
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
8
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
9
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
10
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
11
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
12
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
13
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
14
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
15
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
16
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
17
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
18
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
19
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
20
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

नदीपात्रातील खड्डे विहिरींपेक्षाही खोल!

By admin | Updated: October 18, 2015 23:33 IST

येरळेतील कृष्णविवरे : बेसुमार वाळू उपशाचे नदीत डोंगर; अवैध वाळूउपसा रोखण्याचा अंबवडेतील युवकांचा निर्धार--आॅन दि स्पॉट...

शेखर जाधव/रशीद शेख --वडूज/औंधअंबवडे, ता. खटाव येथील येरळा नदीपात्रात बेकायदा वाळू उपशाने विहिरींपेक्षाही खोल खड्डे पडले आहेत. वाळूमाफियांनी पाडलेल्या या खड्ड्यांनी शनिवारी तीन चिमुकल्यांचा बळी घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला केला आहे. नदीपात्रात उभे असलेले वाळूचे भलेमोठे ढिगारे पाहिल्यानंतर खड्ड्यांची खोली किती असेल, याचा पुरावा मिळू शकतो.अंबवडे-गोरेगाव पूल ते येरळवाडी धरण अशा चार किलोमीटरच्या नदीपात्राची अक्षरश: चाळण झाली आहे. प्रमाणापेक्षा मोठे खड्डे काढून बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. २५ ते ३० फुटांचे खड्डे नदीपात्रात तयार झाले आहेत. येरळवाडी धरणाच्या भराव्यापर्यंत वाळूउपसा सुरू आहे. धरणाच्या आजूबाजूला सुरू असलेला वाळूउपसा असाच सुरू राहिला तर भविष्यात धरणाला भगदाड पडून अंबवडेसह परिसरातील गावांचे फार मोठे नुकसान होऊ शकते. तरीही या प्रकाराकडे प्रशासनाची डोळेझाक का? प्रशासन चिमुकल्यांचा जीव जाण्याची वाट पहात होते का, असा संतप्त सवाल अंबवडे ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.या परिसरातील विहिरींना पूर्वी जेवढे पाणी असायचे, तेवढे सध्या दिसत नाही. नदीकाठी विहीर खणली तर विहिरीला पाणी लागेल, या आशेवर शेतकरी होते; परंतु नदीपात्रात वाळू उपशाने पडलेल्या खड्ड्यांची खोली विहिरींपेक्षाही खोल असल्यामुळे विहिरींना पाणी लागत नाही. अशी स्थिती आहे. वाळू वाहतुकीची वाहनांमुळे शेतीचेही नुकसान होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी जाब विचारला असता ठेकेदारांकडून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. चोरटी वाहतूक वाळू वाहतूक करण्यांपुढे अनेकदा नमते घ्यावे लागते. परंतु यापुढे आता अंबवडे हद्दीत बेकायदा वाळू उपसा होऊ न देण्याचा निर्धार युवकांनी केला आहे.मुदत संपूनही वाळू उपसा सुरूचखड्ड्यात पडून तीन मुलांचा मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी शासकीय वाहनाची तोडफोड केली. हा संताप स्वाभाविकच होता. कारण संबंधित वाळू ठेक्याबाबत ठराव न देण्याचा ग्रामपंचायतीने ठराव करूनही लिलाव जाहीर झाला. ठेकेदाराने वाळू उपशाची मुदत संपूनही वाळूउपसा सुरू ठेवला होता. प्रशासनानेही याकडे डोळेझाक केली, असा आरोप अंबवडे ग्रामस्थांनी केला आहे.महसूल विभागाचा वरदहस्त?नदीपात्रात काही ठिकाणी वाळू लिलाव झाले आहेत. तर काही भागात महसूल विभागाच्या वरदहस्ताने खुलेआम वाळू उपसा सुरू आहे. वाळूमाफिया व प्रशासन यांची मिलीभगत असल्याने अशा दुर्घटना होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.वाकेश्वरातही खड्ड्यांनी घेतलेला जीवयापूर्वी वाकेश्वर, ता. खटाव परिसरातील नदीपात्रात वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यात एकाला जीव गमवावा लागला होता. मात्र तरीही प्रशासनाचा वाळूमाफियांवर वचक राहिलेला नव्हता. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच अंबवडेत शनिवारी पुन्हा खड्ड्यांनी तीन चिमुरड्यंचा जीव घेतला. दिवसभर रानात कष्ट करून रात्री अंग जमिनीला टेकावे म्हटले तर रात्रभर अवैध वाळू वाहतुकीची वाहने सुसाट धावत असतात. वाहनांच्या आवाजाने नागरिकांची झोप उडाली आहे. यापुढे अशी अवैध वाळू वाहतूक आम्ही रोखू.- सोमनाथ पवार, ग्रामस्थ, अंबवडेबेकायदा व अवैध वाळू वाहतुकीने अंबवडे-गोरेगाव रस्ता तसेच परिसरातील रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्ही यापुढे सर्व गावातील युवक अवैध वाहतूक रोखण्यासाठी गस्त घालणार आहोत.- वैभव पवार, अंबवडेउत्तर-दक्षिण वाहिनी वळली पश्चिमेकडे!येरळा नदी ही उत्तर-दक्षिण वाहणारी; परंतु प्रचंड अवैध वाळू उपशामुळे नदीचा मार्ग पश्चिमेकडे वळला आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतजमिनी खचू लागल्या आहेत. विहिरी वर आणि नदीपात्र खाली असे चित्र पाहायला मिळत आहे.वाळूमाफियांची दादागिरीयेरळा नदीचे पात्र मुजोर वाळूमाफियांनी ठिकठिकाणी कुरतडले असून शेतजमिनीचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी मज्जाव केल्यास त्याला दमदाटी व शिवीगाळ केली जात आहे.