शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

पाचवडमध्ये घुमला ‘ईट राईट इंडिया’चा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:32 IST

पाचवड : देशातील काश्मीर, पाँडिचेरी, पश्चिम बंगाल, तिरुअनंतपुरम, रांची व गोवा या सहा ठिकाणांहून स्वस्थ भारत यात्रा निघाली आहे. ...

पाचवड : देशातील काश्मीर, पाँडिचेरी, पश्चिम बंगाल, तिरुअनंतपुरम, रांची व गोवा या सहा ठिकाणांहून स्वस्थ भारत यात्रा निघाली आहे. तिरुअनंतपुरम येथून निघालेली ही यात्रा मंगळवार, दि. ४ रोजी पाचवड येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज याठिकाणी आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विद्यायातील विद्यार्थ्यांनी ‘ईट राईट इंडिया’चा नारा देत पौष्टिक आहार घेण्याची शपथ घेतली.यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस. बी. कोडगिरे, अन्न सुरक्षा प्राधिकरण मुंबईचे सहायक आयुक्त व्ही. के. पंचम, जिल्ह्याचे अन्न सुरक्षा अधिकारी विकास सोनावणे व मुख्याध्यापक भागवत कणसे उपस्थित होते.विद्यार्थी-विद्यार्थिनी व युवा पिढीने शरीर व मन स्वस्थ ठेवण्यासाठी काय खावे व काय खाऊ नये, याबाबतची सविस्तर माहिती सांगण्यात आली. आपल्या दैनंदिन आहारामधील साखर, मीठ व तेलाचे प्रमाण योग्य ठेवल्यास त्याचा शरीरावर कशाप्रकारे चांगला परिणाम होतो तसेच मानवी जीवनामधील आहाराचे महत्त्वही यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी यावेळी पौष्टिक आहार घेण्याची प्रतिज्ञा घेतली.महात्मा गांधीजींनी सुदृढ भारतची हाक दिली होती. त्या अनुषंगाने या यात्रेचे आयोजन अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आलेले आहे. सुमारे १८ हजार किलोमीटरचा प्रवास करणारी ही यात्रा खंडाळा या ठिकाणी कार्यक्रम घेत पुढे २६ जानेवारी २०१९ रोजी नवी दिल्ली येथे पोहोचणार आहे.असाही सहभाग...किसनवीर महाविद्यालय, वाईचे एनसीसी विभागातील प्रशिक्षक लेफ्टनंट समीर पवार यांच्यासह विद्यार्थी स्वस्थ भारत यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. हे सर्वजण सायकल चालवून ही यात्रा करणार आहेत. त्यामुळे देशातील जनतेला ‘ईट राईट इंडिया’चा नारा देत स्वस्थ राहण्याची प्रेरणा देण्यात किसनवीर महाविद्यालयाचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे.