शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

देशात हिटलरशाही वाढण्याचा धोका : वैद्य

By admin | Updated: February 18, 2015 23:48 IST

स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन : ‘दादा उंडाळकर सामाजिक’ पुरस्कार प्रकाश आमटे यांना प्रदान

उंडाळे : ‘विरोध संपविण्याची हिटलरचीच पद्धत या देशात सुरू झाली आहे. विचाराची लढाई विचाराने न होता आता विचारांच्या लढाईला गोळीने संपविले जाऊ लागले आहे. देशात हिटलरशाही वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे,’ अशी भीती ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी विचारवंत भाई वैद्य यांनी व्यक्त केली. येथील स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ३२ व्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशनात ते बोलत होते. यंदाचा ‘दादा उंडाळकर सामाजिक’ पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना प्रदान करण्यात आला. रोख ५१ हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मापत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी डॉ. मंदाकिनी आमटे, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नरसिंह चिवटे, हसनभाई देसाई, स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय देशपांडे, जयसिंंगराव पाटील, स्मारक समितीचे विश्वस्त प. ता. थोरात, किसन वीर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरविंंद चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक दादासाहेब गोडसे, वाघोजीराव पोळ, जयवंतराव केंजळे, वसंतराव मानकुमरे, माजी शिक्षण सभापती भास्करराव गुंडगे, संदीप श्रोत्री, विठ्ठलराव जाधव, राजनशेठ चिपळूणकर, रफिकशेठ बागवान, उषा खैरे उपस्थित होते. भाई वैद्य म्हणाले, ‘सर्वांच्या किमान गरजा पूर्ण होईपर्यंत आपला स्वातंत्र्यलढा संपलेला नाही. स्वातंत्र्यसैनिक संपत चालला असला तरी त्यांचे विचार उंडाळेचीस अधिवेशनाच्या माध्यमातून जोपासले जात आहेत,’ अशा शब्दांत भाई वैद्य यांनी समाधान व्यक्त केले आणि हा उपक्रम यापुढेही जोपासला जावा, अशी इच्छा व्यक्त केली.डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, ‘जिथं माणसं राहतात हेच जगाला माहीत नव्हते, तिथे जाऊन लोकांसाठी काम करावं, हा बाबा आमटे यांना झालेला साक्षात्कारच म्हणावा लागेल. ज्याठिकाणी २५० किलोमीटरचा प्रवास करून आम्ही चार-पाच दिवसांनी पोहचलो, त्याठिकाणी काम करायचं म्हणजे अनंत अडचणी होत्या. ज्या जंगलात फक्त माणसं आणि जंगली प्राणीच होते. तिथं आम्ही काम सुरू केलं. त्या माणसांचं जग बदलण्यात आम्हाला यश आलं, याचं समाधान आहे.’ यावेळी परिसरातील ग्रामस्थ व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)