शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

देशात हिटलरशाही वाढण्याचा धोका : वैद्य

By admin | Updated: February 18, 2015 23:48 IST

स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन : ‘दादा उंडाळकर सामाजिक’ पुरस्कार प्रकाश आमटे यांना प्रदान

उंडाळे : ‘विरोध संपविण्याची हिटलरचीच पद्धत या देशात सुरू झाली आहे. विचाराची लढाई विचाराने न होता आता विचारांच्या लढाईला गोळीने संपविले जाऊ लागले आहे. देशात हिटलरशाही वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे,’ अशी भीती ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी विचारवंत भाई वैद्य यांनी व्यक्त केली. येथील स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ३२ व्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशनात ते बोलत होते. यंदाचा ‘दादा उंडाळकर सामाजिक’ पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना प्रदान करण्यात आला. रोख ५१ हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मापत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी डॉ. मंदाकिनी आमटे, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नरसिंह चिवटे, हसनभाई देसाई, स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय देशपांडे, जयसिंंगराव पाटील, स्मारक समितीचे विश्वस्त प. ता. थोरात, किसन वीर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरविंंद चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक दादासाहेब गोडसे, वाघोजीराव पोळ, जयवंतराव केंजळे, वसंतराव मानकुमरे, माजी शिक्षण सभापती भास्करराव गुंडगे, संदीप श्रोत्री, विठ्ठलराव जाधव, राजनशेठ चिपळूणकर, रफिकशेठ बागवान, उषा खैरे उपस्थित होते. भाई वैद्य म्हणाले, ‘सर्वांच्या किमान गरजा पूर्ण होईपर्यंत आपला स्वातंत्र्यलढा संपलेला नाही. स्वातंत्र्यसैनिक संपत चालला असला तरी त्यांचे विचार उंडाळेचीस अधिवेशनाच्या माध्यमातून जोपासले जात आहेत,’ अशा शब्दांत भाई वैद्य यांनी समाधान व्यक्त केले आणि हा उपक्रम यापुढेही जोपासला जावा, अशी इच्छा व्यक्त केली.डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, ‘जिथं माणसं राहतात हेच जगाला माहीत नव्हते, तिथे जाऊन लोकांसाठी काम करावं, हा बाबा आमटे यांना झालेला साक्षात्कारच म्हणावा लागेल. ज्याठिकाणी २५० किलोमीटरचा प्रवास करून आम्ही चार-पाच दिवसांनी पोहचलो, त्याठिकाणी काम करायचं म्हणजे अनंत अडचणी होत्या. ज्या जंगलात फक्त माणसं आणि जंगली प्राणीच होते. तिथं आम्ही काम सुरू केलं. त्या माणसांचं जग बदलण्यात आम्हाला यश आलं, याचं समाधान आहे.’ यावेळी परिसरातील ग्रामस्थ व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)