शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

देशात हिटलरशाही वाढण्याचा धोका : वैद्य

By admin | Updated: February 18, 2015 23:48 IST

स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन : ‘दादा उंडाळकर सामाजिक’ पुरस्कार प्रकाश आमटे यांना प्रदान

उंडाळे : ‘विरोध संपविण्याची हिटलरचीच पद्धत या देशात सुरू झाली आहे. विचाराची लढाई विचाराने न होता आता विचारांच्या लढाईला गोळीने संपविले जाऊ लागले आहे. देशात हिटलरशाही वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे,’ अशी भीती ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी विचारवंत भाई वैद्य यांनी व्यक्त केली. येथील स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ३२ व्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशनात ते बोलत होते. यंदाचा ‘दादा उंडाळकर सामाजिक’ पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना प्रदान करण्यात आला. रोख ५१ हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मापत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी डॉ. मंदाकिनी आमटे, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नरसिंह चिवटे, हसनभाई देसाई, स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय देशपांडे, जयसिंंगराव पाटील, स्मारक समितीचे विश्वस्त प. ता. थोरात, किसन वीर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरविंंद चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक दादासाहेब गोडसे, वाघोजीराव पोळ, जयवंतराव केंजळे, वसंतराव मानकुमरे, माजी शिक्षण सभापती भास्करराव गुंडगे, संदीप श्रोत्री, विठ्ठलराव जाधव, राजनशेठ चिपळूणकर, रफिकशेठ बागवान, उषा खैरे उपस्थित होते. भाई वैद्य म्हणाले, ‘सर्वांच्या किमान गरजा पूर्ण होईपर्यंत आपला स्वातंत्र्यलढा संपलेला नाही. स्वातंत्र्यसैनिक संपत चालला असला तरी त्यांचे विचार उंडाळेचीस अधिवेशनाच्या माध्यमातून जोपासले जात आहेत,’ अशा शब्दांत भाई वैद्य यांनी समाधान व्यक्त केले आणि हा उपक्रम यापुढेही जोपासला जावा, अशी इच्छा व्यक्त केली.डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, ‘जिथं माणसं राहतात हेच जगाला माहीत नव्हते, तिथे जाऊन लोकांसाठी काम करावं, हा बाबा आमटे यांना झालेला साक्षात्कारच म्हणावा लागेल. ज्याठिकाणी २५० किलोमीटरचा प्रवास करून आम्ही चार-पाच दिवसांनी पोहचलो, त्याठिकाणी काम करायचं म्हणजे अनंत अडचणी होत्या. ज्या जंगलात फक्त माणसं आणि जंगली प्राणीच होते. तिथं आम्ही काम सुरू केलं. त्या माणसांचं जग बदलण्यात आम्हाला यश आलं, याचं समाधान आहे.’ यावेळी परिसरातील ग्रामस्थ व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)