शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

अनुभवातूनच माणूस समृध्द

By admin | Updated: December 14, 2015 00:16 IST

आ. ह. साळुंखे : रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य संमेलनात प्रतिपादन

रहिमतपूर : कोणताही साहित्यिक सभोवतालच्या परिस्थितीतून घडत असतो. त्यामुळे त्याचे नाते समाजाशी असले पाहिजे. समाजाच्या सुख-दु:खाशी त्यांना समरस होता आले पाहिजे. साहित्यिकांसाठी अनुभव, चिंंतन व अभिव्यक्ती या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. माणूस अनुभवातूनच श्रीमंत व समृध्द होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत व रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आ.ह. साळुंखे यांनी केले.रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे रसिक साहित्य परिवार व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा रहिमतपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंचक्रोशी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी ज्येष्ठ विवेकवादी विचारवंत डॉ. शरद अभ्यंकर, स्वातंत्र्यसैनिक सोपानराव घोरपडे, स्वागताध्यक्ष मधुकर माने, प्रा. हिंंदुराव पवार, चंद्रहार माने, शंकरराव कणसे, केतन जाधव यासह विविध मान्यवर उपस्थित होते. साळुंखे म्हणाले की, बुध्दी ही माणसाला लाभलेली अनमोल देणगी आहे. विचार करण्याची शक्ती फक्त माणसाकडेच आहे. हे विचार एकमेकांना देता येतात. त्यामुळे संस्कृतीचा, भाषेचा विकास झाला आहे. असे सांगून ते पुढे म्हणाले की, निसर्गाने आपणाला केवढे वैभव दिले आहे. त्याचाही स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. पशु-पक्ष्यांकडूनही आपण बरेच काही शिकू शकतो, पण त्यासाठी दृष्टी हवी. प्रारंभी ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत साहित्यिक, विद्यार्थी, नागरिक, रसिक सहभागी झाले होते. डॉ. शरद अभ्यंकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचे दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले.स्वागताध्यक्ष मधुकर माने यांनी प्रास्ताविक केले. प्रा. हिंंदुराव पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. केशवराव माने यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी माधवराव माने, प्रा. प्रकाश बोधे, अरुण माने, धैर्यशील माने, अनंतराव माने, भरत शहा, सर्जेराव जाधव, सीताराम माने, रामदास निकम, शिवाजी शिंदे, संजय लोहार यासह कवी, साहित्यिक, नागरिक विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)वाचनाबरोबर लिखाणही करावेडॉ. शरद अभ्यंकर म्हणाले की, वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी घरोघरी उत्कृष्ट ग्रंथसंपदा असली पाहिजे. या आवडीतूनच काय वाचावे, याचे निश्चित असे भान येईल. वाचनाबरोबर थोडे लिखाणही करता आले पाहिजे. यातूनच उद्याचे कवी, साहित्यिक निर्माण होण्यास मदत होईल. अलिकडे वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत आहे अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.