शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

क्रांतीदिनी ६५० आंदोलक ताब्यात

By admin | Updated: August 9, 2016 23:49 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटना, कामागार संघर्ष समिती आणि अंगणवाडी सेविकांचे मोर्चे

सातारा : सातारा शहराला देशप्रेम, स्वातंत्रलढ्याची परंपरा आहे. या लढवय्या जिल्ह्यात मंगळवारी (दि. ९ आॅगस्ट) आॅगस्ट क्रांतिदिन ‘आंदोलन डे’ म्हणून साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सुधारित वेतन श्रेणीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जेलभरो आंदोलन केले. त्यानंतर पालिका कर्मचारी व अंगणवाडी सेविकांनीही मोर्चा काढला. त्यामुळे हा क्रांतीदिन ‘आंदोलन डे’ ठरल्याची चर्चा होती.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता नेहमीपेक्षा पोलिस बंदोबस्त जरा जास्तच होता. क्रांतीदिनी आंदोलन करणाऱ्या संघटनांनी तसा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिस कायदा व सुवस्था राखण्यासाठी तयारीत होते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात ४० ते ५० कर्मचाऱ्यांनी हुतात्मा स्मारकापासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.याठिकाणी वेतन श्रेणी, सेवाशर्ती लागू कराव्यात, अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी जेलभरो आंदोलन केले. ९० टक्के करवसुलीची अट कर्मचाऱ्यांवर न लादता वेतनासाठी १०० टक्के अनुदान द्यावे, केंद्रीय कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना परिमंडळ निहाय दरमहा दहा हजार व बारा हजार आणि पंधरा हजारांप्रमाणे वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्राधान्याने सेवेत घ्यावे, सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना सुरू करावी आदी मागण्यांचे निवेदन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)पोलिस मैदानावर सुटकाजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक कर्मचारी संघटनेने जेलभरो आंदोलन केले. पोलिसांनी दोन्ही संघटनेतील आंदोलनकर्त्यांना पोलिस व्हॅनमधून शहर पोलिस ठाण्यात आणले. याठिकाणी सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर सर्व आंदोलकांना पोलिस परेड मैदानावर सोडण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी आंदोलक ताब्यात घेण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असेल.अनुकंपाच्या जाचक अटी शिथिल कराकामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ सातारा जिल्हा नगरपरिषद, नगरपंचायत, कामगार संघर्ष समितीच्या वतीने सातारा पालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वाढत्या महागाईला आळा घाला. किमान वेतन कंत्राटदार, कामगारांसहीत १८ हजार द्यावे, अनुकंपाच्या जागा त्वरित भराव्यात, अनुकंपाच्या जाचक अटी शिथिल करून सेवेत सामावून घ्यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकरी अश्विन मुदगल आणि मुख्याधिकारी शंकर गोरे यांना देण्यात आले.