शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

...त्या सहा गावांना महसूल विभागाचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील बारा गावांत प्रशासनाने वाळू उपशाबाबत प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. पैकी सहा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील बारा गावांत प्रशासनाने वाळू उपशाबाबत प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. पैकी सहा गावांत लवकरच लिलाव प्रक्रिया होणार आहे. मात्र सहा गावांनी ग्रामसभेतून याला नकार दिला आहे. त्यामुळे त्या सहा गावांना महसूल प्रशासनाने, वाळू चोरीला गेली तर त्याची जबाबदारी कोणाची? असे पत्र दिले आहे. आता पुढे काय होणार याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे.

गेल्या चार वर्षापासून तालुक्यात वाळूचे लिलावच झालेले नाहीत. त्यामुळे दर भडकले आहेत. शेजारच्या जिल्ह्यातून वाळू आयात करावी लागत आहे. तसेच चोरटा वाळू उपसा व वाहतुकीलाही जोर चढला आहे. त्यामुळेच की काय, महसूल प्रशासनाने तालुक्यात बारा ठिकाणी वाळू उपसा करण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. ओंड, वाठार, काले, मसूर व खालकरवाडीत दोन ठिकाणी ग्रामसभांनी वाळू उपशाला परवानगी दिली आहे .त्यामुळे येथील वाळू उपशाची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एक प्रस्ताव तालुकास्तरीय तांत्रिक उपसमितीने अयोग्य ठरविला आहे, तर येणके, तांबवे, वाठार उंडाळे व येरवळे येथील दोन ठिकाणच्या वाळू उपशाला ग्रामसभेने विरोध केला आहे. त्यामुळे येथील वाळू उपसा होणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

दरम्यान, तहसील कार्यालय कऱ्हाड यांच्याकडून नकार देणाऱ्या त्या सहा गावांना, तेथील वाळू चोरीला गेली तर त्याला जबाबदार कोण? याबाबत लेखी पत्रव्यवहार केला आहे. या पत्रांना ग्रामपंचायत, ग्रामसभा काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोट

दक्षिण मांड, उत्तर मांड व मसूर येथील ओढ्यातून वाळू उपशासाठी लिलाव करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून राबवली जात आहे. सहा गावांनी त्याला संमती दिली आहे, तर सहा ग्रामसभांनी विरोध केला आहे. विरोध करणाऱ्या गावांना वाळूचोरीस जबाबदार कोण, याबाबतचा पत्रव्यवहार केला असून त्याचे उत्तर आल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

- आनंदराव देवकर, नायब तहसीलदार, कऱ्हाड