शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पाण्याच्या थेंबासाठी फिरावं लागतंय वणवण

By admin | Updated: March 21, 2017 16:43 IST

बामणवाडी परिसरातील ग्रामस्थांचे हाल : पाणी टंचाईमुक्तीसाठी टँकर सुरू करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतकुसूर (सातारा) : कऱ्हाड तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात डोंगर पायथ्याला वसलेल्या बामणवाडीसह परिसरातील वाड्या-वस्त्यांमध्ये गत एक महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आठ दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी सोडले जात असल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष घालून या भागातील गावांना तत्काळ टँकर सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.बामणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बामणवाडी, चाळकेवाडी, खड्याचीवाडी एक, शिबेवाडी-कारंडेवाडी एक आणि पवारवाडीसाठी एक अशा तीन गाव विहिरीद्वारे या सहा वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मात्र, या वाड्या डोंगर पायथ्यालगत वसल्या असल्याने व पूर्णत: डोंगरी विभाग असल्याने कायमस्वरूपी या विहिरींना जिवंत पाणी स्त्रोत नाहीत. प्रत्येकवर्षी फेबु्रवारी, मार्चअखेर विहिरींचा जलसाठा कमी होऊन पाणीटंचाई निर्माण होत आहे.गत महिन्यापासून पवारवाडी आणि शिबेवाडी, कारंडेवाडी या वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्हीही विहिरींचा पाणीसाठा संपुष्टात आल्याने दहा ते बारा दिवसांतून एकदा पाणी सोडण्यात येत आहे. तर बामणवाडी, चाळकेवाडी आणि खड्याचीवाडी या वाड्यांना पाच ते सहा दिवसांतून एकदा पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, हे पाणी फक्त पिण्यासाठी दोन दिवस ही पुरत नसल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे.पिण्याच्या पाण्यासह जनावरांना, खचार्ला लागणारे पाणी मिळविण्यासाठी लोकांना बोअरवेल, आडावरती तासन्तास घागरभर पाण्यासाठी थांबावे लागत आहे. बोअरवेल व आडांमध्येही अल्प पाणीसाठा असल्याने पाणी साठेपर्यंत थांबावे लागत आहे. परिणामी रात्रंदिवस पाण्यासाठी रांगा लावल्या जात असून, नंबरावरून अनेकदा भांडणे लागल्याचे प्रकार घडत आहेत.बामणवाडी परिसर हा पूर्णत: भौगोलिकदृष्ट्या तिन्ही बाजूंनी वेढलेल्या डोंगर पायथ्याशी वसलेला आहे. परिणामी या परिसरात कायमस्वरूपी पाणी उपलब्धतेसाठी नदी किंवा पाझर तलाव नसल्याने विहिरींची पाणी पातळी फेब्रुवारीअखेरच संपुष्टात आली आहे.बामणवाडी आणि कारंडेवाडी येथे तलाव बांधण्यात आले आहेत. मात्र, या दोन्हीही तलावांना सुरुवातीपासूनच मोठी गळती असल्याने सप्टेंबर, आॅक्टोंबरअखेर तलावातील संपूर्ण पाणी संपुष्टात येते. परिणामी असून अडचण अन् नसून खोळंबा अशी अवस्था निर्माण झाली आहे.बामणवाडी परिसरात गत अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पाणीटंचाई परिस्थिती निर्माण होत असल्याने अनेक लोकांनी पाण्यासाठी बोअरवेल मारून पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक बोअरवेल तीनशे फूट खोल जाऊनही नुकताच धुरळा उडाला तर काही बोअरवेलला गतवर्षी पाणी आले होते. (वार्ताहर)