शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

पाण्याच्या थेंबासाठी फिरावं लागतंय वणवण

By admin | Updated: March 21, 2017 16:43 IST

बामणवाडी परिसरातील ग्रामस्थांचे हाल : पाणी टंचाईमुक्तीसाठी टँकर सुरू करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतकुसूर (सातारा) : कऱ्हाड तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात डोंगर पायथ्याला वसलेल्या बामणवाडीसह परिसरातील वाड्या-वस्त्यांमध्ये गत एक महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आठ दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी सोडले जात असल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष घालून या भागातील गावांना तत्काळ टँकर सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.बामणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बामणवाडी, चाळकेवाडी, खड्याचीवाडी एक, शिबेवाडी-कारंडेवाडी एक आणि पवारवाडीसाठी एक अशा तीन गाव विहिरीद्वारे या सहा वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मात्र, या वाड्या डोंगर पायथ्यालगत वसल्या असल्याने व पूर्णत: डोंगरी विभाग असल्याने कायमस्वरूपी या विहिरींना जिवंत पाणी स्त्रोत नाहीत. प्रत्येकवर्षी फेबु्रवारी, मार्चअखेर विहिरींचा जलसाठा कमी होऊन पाणीटंचाई निर्माण होत आहे.गत महिन्यापासून पवारवाडी आणि शिबेवाडी, कारंडेवाडी या वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्हीही विहिरींचा पाणीसाठा संपुष्टात आल्याने दहा ते बारा दिवसांतून एकदा पाणी सोडण्यात येत आहे. तर बामणवाडी, चाळकेवाडी आणि खड्याचीवाडी या वाड्यांना पाच ते सहा दिवसांतून एकदा पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, हे पाणी फक्त पिण्यासाठी दोन दिवस ही पुरत नसल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे.पिण्याच्या पाण्यासह जनावरांना, खचार्ला लागणारे पाणी मिळविण्यासाठी लोकांना बोअरवेल, आडावरती तासन्तास घागरभर पाण्यासाठी थांबावे लागत आहे. बोअरवेल व आडांमध्येही अल्प पाणीसाठा असल्याने पाणी साठेपर्यंत थांबावे लागत आहे. परिणामी रात्रंदिवस पाण्यासाठी रांगा लावल्या जात असून, नंबरावरून अनेकदा भांडणे लागल्याचे प्रकार घडत आहेत.बामणवाडी परिसर हा पूर्णत: भौगोलिकदृष्ट्या तिन्ही बाजूंनी वेढलेल्या डोंगर पायथ्याशी वसलेला आहे. परिणामी या परिसरात कायमस्वरूपी पाणी उपलब्धतेसाठी नदी किंवा पाझर तलाव नसल्याने विहिरींची पाणी पातळी फेब्रुवारीअखेरच संपुष्टात आली आहे.बामणवाडी आणि कारंडेवाडी येथे तलाव बांधण्यात आले आहेत. मात्र, या दोन्हीही तलावांना सुरुवातीपासूनच मोठी गळती असल्याने सप्टेंबर, आॅक्टोंबरअखेर तलावातील संपूर्ण पाणी संपुष्टात येते. परिणामी असून अडचण अन् नसून खोळंबा अशी अवस्था निर्माण झाली आहे.बामणवाडी परिसरात गत अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पाणीटंचाई परिस्थिती निर्माण होत असल्याने अनेक लोकांनी पाण्यासाठी बोअरवेल मारून पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक बोअरवेल तीनशे फूट खोल जाऊनही नुकताच धुरळा उडाला तर काही बोअरवेलला गतवर्षी पाणी आले होते. (वार्ताहर)