शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

पाण्याच्या थेंबासाठी फिरावं लागतंय वणवण

By admin | Updated: March 21, 2017 16:43 IST

बामणवाडी परिसरातील ग्रामस्थांचे हाल : पाणी टंचाईमुक्तीसाठी टँकर सुरू करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतकुसूर (सातारा) : कऱ्हाड तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात डोंगर पायथ्याला वसलेल्या बामणवाडीसह परिसरातील वाड्या-वस्त्यांमध्ये गत एक महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आठ दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी सोडले जात असल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष घालून या भागातील गावांना तत्काळ टँकर सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.बामणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बामणवाडी, चाळकेवाडी, खड्याचीवाडी एक, शिबेवाडी-कारंडेवाडी एक आणि पवारवाडीसाठी एक अशा तीन गाव विहिरीद्वारे या सहा वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मात्र, या वाड्या डोंगर पायथ्यालगत वसल्या असल्याने व पूर्णत: डोंगरी विभाग असल्याने कायमस्वरूपी या विहिरींना जिवंत पाणी स्त्रोत नाहीत. प्रत्येकवर्षी फेबु्रवारी, मार्चअखेर विहिरींचा जलसाठा कमी होऊन पाणीटंचाई निर्माण होत आहे.गत महिन्यापासून पवारवाडी आणि शिबेवाडी, कारंडेवाडी या वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्हीही विहिरींचा पाणीसाठा संपुष्टात आल्याने दहा ते बारा दिवसांतून एकदा पाणी सोडण्यात येत आहे. तर बामणवाडी, चाळकेवाडी आणि खड्याचीवाडी या वाड्यांना पाच ते सहा दिवसांतून एकदा पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, हे पाणी फक्त पिण्यासाठी दोन दिवस ही पुरत नसल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे.पिण्याच्या पाण्यासह जनावरांना, खचार्ला लागणारे पाणी मिळविण्यासाठी लोकांना बोअरवेल, आडावरती तासन्तास घागरभर पाण्यासाठी थांबावे लागत आहे. बोअरवेल व आडांमध्येही अल्प पाणीसाठा असल्याने पाणी साठेपर्यंत थांबावे लागत आहे. परिणामी रात्रंदिवस पाण्यासाठी रांगा लावल्या जात असून, नंबरावरून अनेकदा भांडणे लागल्याचे प्रकार घडत आहेत.बामणवाडी परिसर हा पूर्णत: भौगोलिकदृष्ट्या तिन्ही बाजूंनी वेढलेल्या डोंगर पायथ्याशी वसलेला आहे. परिणामी या परिसरात कायमस्वरूपी पाणी उपलब्धतेसाठी नदी किंवा पाझर तलाव नसल्याने विहिरींची पाणी पातळी फेब्रुवारीअखेरच संपुष्टात आली आहे.बामणवाडी आणि कारंडेवाडी येथे तलाव बांधण्यात आले आहेत. मात्र, या दोन्हीही तलावांना सुरुवातीपासूनच मोठी गळती असल्याने सप्टेंबर, आॅक्टोंबरअखेर तलावातील संपूर्ण पाणी संपुष्टात येते. परिणामी असून अडचण अन् नसून खोळंबा अशी अवस्था निर्माण झाली आहे.बामणवाडी परिसरात गत अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पाणीटंचाई परिस्थिती निर्माण होत असल्याने अनेक लोकांनी पाण्यासाठी बोअरवेल मारून पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक बोअरवेल तीनशे फूट खोल जाऊनही नुकताच धुरळा उडाला तर काही बोअरवेलला गतवर्षी पाणी आले होते. (वार्ताहर)