शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

प्रमुख विरोधकांची माघार तरीही दुरंगी लढत

By admin | Updated: July 31, 2015 01:05 IST

१६ जागांसाठी ३३ उमेदवार : राजे गटाच्या तीन जागा बिनविरोध; फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

फलटण : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रमुख विरोधकांनी माघार घेऊनही १६ जागांसाठी ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. आता दुरंगी लढत होत आहे. सत्ताधारी राजे गटाने तीन जागा बिनविरोध जिंकत विजयी सलामी दिली आहे. माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम गटाला राजे गटाने दोन जागा सोडल्या आहेत. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी १९६ अर्ज आले होते. तर कृषीप्रक्रिया मतदारसंघातून एकच मतदान होते. तसेच तेच उमेदवार असलेले माजी सभापती शिवरूपराजे खर्डेकर बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी राजेगटाबरोबर विरोधकांचेही मोठ्या प्रमाणात अर्ज राहिल्याने निवडणूक चुरशीची होईल, असे मानले जात होते. मागील निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी प्रमुख विरोधक माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, न्यू फलटण शुगर वर्क्स लि.चे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्यात मनोमिलन पॅटर्न राबवित काही जागा बिनविरोध करताना विरोधकांना पाच जागा दिल्या होत्या. यावेळेसही मनोमिलन पॅटर्नची चर्चा सुरू होती. मात्र, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी अर्ज मागे घेण्याच्या एकदिवस आधीच निवडणुकीत आपल्याला स्वारस्य नाही. साखर कारखान्याची उभारणी व सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष देण्यासाठी बाजार समिती लढविणार नाही. सर्व कार्यकर्त्यांनी अर्ज मागे घ्यावे, असे स्पष्ट केल्याने त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी अर्ज मागे घेतले होते. तालुक्यातील दुसरे विरोधक प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्याशी राजेगटाने चर्चा सुरू ठेवल्या होत्या. मात्र, त्यांनीही कार्यकर्त्यांशी चर्चा करून मनोमिलनाला नकार देतानाच निवडणुकीतून अंग काढून घेतले. त्यामुळे त्यांचे पुत्र धनंजय साळुंखे-पाटील व पाटील समर्थकांनीही माघार घेतल्याने आता १६ जागांसाठी ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिलेले आहेत. सत्ताधारी राजेगटाने सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. शिवरूपराजे खर्डेकर कृषी प्रक्रियातून बिनविरोध निवडून आले असले तरीसुद्धा त्यांनी सोसायटी मतदारसंघातून अर्ज कायम ठेवला आहे. व्यापारी मतदारसंघातून समर जाधव, संजय कदम बिनविरोध निवडून आले आहेत. राजेगटाने माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांच्यागटाला दोन जागा सोडल्या आहेत. कदम गटाचे सोसायटी मतदार संघातून बाळकृष्ण रणवरे व सोसायटी इतर मागासप्रवर्गातून प्रकाश भोंगळे हे दोन उमेदवार उभे आहेत. भाजपा मित्र पक्ष आघाडीनेही काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. प्रमुख विरोधक निवडणूक रिंगणात नसल्याने सत्ताधारी राजेगटाला आताची ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवार प्रचारात आहेत. (प्रतिनिधी)