शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

जिल्हा परिषदेत चहाच्या तलफवर निर्बंध...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:15 IST

सातारा : जिल्ह्यात कोरोना स्थिती वाढत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना केल्या असतानाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ...

सातारा : जिल्ह्यात कोरोना स्थिती वाढत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना केल्या असतानाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनीही अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार कोणालाही आता चहापानासाठी बाहेर जाता येणार नाही तसेच शरीराचे तापमान तपासूनच जिल्हा परिषदेत प्रवेश करावा लागणार आहे.

जिल्ह्यात मागील ११ महिन्यांपासून कोरोनाचे सावट आहे. सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लॉकडाऊन सुरू होता. जवळपास सात महिने सर्व व्यवहार बंद होते. त्यानंतर कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने नियम व निर्बंध कमी करण्यात आले. सध्या मात्र, जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागलेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी काही सूचना केल्या आहेत. जिल्हा परिषदेंतर्गत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या सूचनांचे पालन करावे लागणार आहे.

चौकट :

अशा आहेत सूचना...

- अधिकारी, कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती; पण सामाजिक अंतर पाळणे आवश्यक

- कार्यालय व आवारातही तोंड आणि नाकावर मास्क असणे आवश्यकच

- कार्यालयात प्रवेश करताना सॅनिटायझरचा वापर व शरीराचे तापमान तपासणे महत्त्वाचे

- कोरोनामुळे चहासाठी बाहेर जाऊ नये; कार्यालयीन वेळेत दिलेली जबाबदारी पार पाडणे

- विभागप्रमुखांनी कोरोनाबाबत काही निदर्शनास आल्यास कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करणे

- आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईस पात्र राहाल, असा इशारा

..................................................