शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पावसाच्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:48 IST

कऱ्हाड : शहरासह तालुक्याला मुसळधार पावसाने १९ जूनपर्यंत झोडपून काढल्यानंतर गत दोन आठवड्यांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. त्यामुळे ...

कऱ्हाड : शहरासह तालुक्याला मुसळधार पावसाने १९ जूनपर्यंत झोडपून काढल्यानंतर गत दोन आठवड्यांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. १६ जून रोजी रात्री अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भुईमूग तसेच सोयाबीनची टोकणी करण्यात आली. मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिली असून, भुईमुगासाठी पावसाची गरज आहे. गत काही दिवस शहर परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, आता दिवसभर कडक ऊन पडत असून शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचे दिसून येत आहे.

दुभाजकात झुडुपे, गवताचे साम्राज्य

कार्वे : कऱ्हाड ते कार्वेदरम्यान रस्त्यातील दुभाजकात सध्या गवत जोमाने उगवले आहे. दुभाजकातील झाडांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे दुभाजकाची स्थिती बिकट बनली आहे. शोभेची फुलझाडे होरपळून गेली आहे. तसेच ठिकठिकाणी दुभाजकाचे दगडही कोलमडून पडले आहेत. मात्र, तरीही संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे रस्त्याचे सौंदर्य नाहीसे झाले आहे. संबंधित विभागाने तातडीने नवीन शोभेची झाडे लावून दुभाजकाचीही दुरूस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

ढेबेवाडी-मुंबई बसमुळे प्रवाशांमध्ये समाधान

सणबूर : नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईशी नियमित संपर्क असलेल्या ढेबेवाडी विभागातील जनतेसाठी कऱ्हाड आगाराने ढेबेवाडी ते मुंबई ही एसटी सेवा सुरू केल्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. ढेबेवाडी विभागातील अनेकजण नोकरी तसेच व्यवसायामुळे मुंबईत वास्तव्याला आहेत. त्यामुळे या विभागातून मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. कऱ्हाड आगाराने ढेबेवाडी ते मुंबई ही बससेवा सुरू केली असून, प्रवाशांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.