शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

ग्रामसेवकांवर दबावाने वादग्रस्त ठिकाणाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:28 IST

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील एका ग्रामसेवकावर वादग्रस्त ठिकाणाच्या ग्रामपंचायतीची अतिरिक्त जबाबदारी घेण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव टाकण्यात आला आहे. वरिष्ठांकडून होणाऱ्या ...

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील एका ग्रामसेवकावर वादग्रस्त ठिकाणाच्या ग्रामपंचायतीची अतिरिक्त जबाबदारी घेण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव टाकण्यात आला आहे. वरिष्ठांकडून होणाऱ्या कारवाईच्या भीतीमुळे जबाबदारी घेतलेला नवखा ग्रामसेवक दडपणाखाली वावरत आहे.

कोरेगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक ग्रामविकासाच्यादृष्टीने झोकून देऊन काम करत आहेत. अशा ग्रामसेवकांचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह शासनाकडून वेळोवेळी कौतुक केले गेले आहे. मात्र, कोरेगाव तालुक्यातील एका गावात दहा-बारा वर्षांपासून ग्रामसेवकच टिकत नाही. ग्रामपंचायतीची जबाबदारी घेईल त्या ग्रामसेवकावर शासनाकडून काही कालावधीतच निलंबनासह वेगवेगळ्या प्रकारची कारवाई होत आहे. काही वर्षांत संबंधित ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून काम करणाऱ्या एका ग्रामसेवकावर रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामात गैरव्यवहार, एलईडी बल्ब बसवणे कामांमध्ये गैरव्यवहार, नियम डावलून बँकेत व्यवहार करून शासकीय व आर्थिक अनियमितता आणल्याचे गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर त्या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याप्रमाणेच या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून काम करणाऱ्या इतर ग्रामसेवकांवर वेगवेगळ्या कारणांनी शासकीय कारवाई केली होती.

एखादा दुसरा ग्रामसेवक चुकीचं काम करतोय म्हणून निलंबित केला जात असेल तर काही अडचण नाही. मात्र, त्याच ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकावरच नेहमी कारवाई होत असेल तर यामध्ये नक्की भानगड काय, असा प्रश्न उपस्थित होतो. ग्रामसेवक चुकीचं काम करतोय का संबंधित गावाचा लोकप्रतिनिधी चुकीचं काम करतोय आणि त्याचा फटका ग्रामसेवकांना भोगावा लागतो याचा तपास होणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी कितीही दबाव टाकला तरी ग्रामसेवकांनी शासकीय चौकटीत राहूनच कुठल्याही कागदांवर सह्या करणे गरजेचे आहे. याबाबत दुमत असण्याचं कारणच नाही; परंतु आपली अमूक तमूक नेत्यांबरोबर ऊठबस असून ‘तुम्ही मी सांगेल तिथे डोळे झाकून सह्या करा. मी पाहून घेतो’ असे आश्वासन देऊन वेळप्रसंगी अंगाशी आले की ग्रामसेवकांना तोंडाला देणारे काही लोकप्रतिनिधी ग्रामसेवकांसाठी घातक ठरत आहेत. त्यामुळे अशा गावाच्या वादग्रस्त ग्रामसेवकपदाच्या खुर्चीवर बसण्यास कुठलाही ग्रामसेवक धजावत नाही. त्यामुळे नवख्या ग्रामसेवकाला बळीचा बकरा केला जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चौकट :

कारवाईच्या भीतीने सहा महिने रजा

एका ग्रामसेवकाने बळीचा बकरा केला जाईल, या भीतीपोटी सहा महिने रजा टाकून ग्रामपंचायतीमध्ये काम करण्यास टाळाटाळ केली होती. या संबंधित ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकाची खुर्ची जेवढी वादग्रस्त ठरली तेवढी वादग्रस्त खुर्ची तालुक्यामध्ये दुसरी कुठलीही ठरली नसेल अशी तालुक्यात चर्चा आहे.