शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

महाराजस्व अभियानामुळे प्रश्नांची सोडवणूक

By admin | Updated: December 26, 2015 00:01 IST

शासकीय विभागाचे प्रयत्न : गावात मिळाले सर्व दाखले अन् कार्डही

अंगापूर : ‘महाराजस्व अभियानामुळे विविध शासकीय योजनांची माहिती तालुक्याला न जाता गावातल्या गावात सर्वसामान्य नागरिकांना मिळते. त्यामुळे या नागरिकांचे ज्वलंत प्रश्न सुटण्यास मदत होते. लोकांचा वेळ व खर्च कमी होऊन आर्थिक पिळवणूक होत नाही. यामुळे हे अभियान सर्वांसाठी उपयुक्त आहे. यासाठी हे अभियान शासनाच्या वतीने आयोजित केले आहे,’ असे मत तहसीलदार राजेश चव्हाण यांनी व्यक्त केले.अंगापूर, ता. सातारा येथे तासगाव मंडळाच्या अंतर्गत झालेल्या महाराजस्व अभियान २०१५ समाधान योजना शिबिरातील विविध शासकीय विभागांच्या लाभार्थींना लाभ वाटप व विविध दाखले वाटप कार्यक्रमात बोलत होते.यावेळी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे, माजी सभापती नारायण कणसे, सरपंच सुरेश कणसे (बाबा), वर्णेचे उपसरपंच रमेश पवार, अंगापूर तर्फचे उपसरपंच किरण येवले, जिहेचे उपसरपंच मच्छिंद्र फडतरे, प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगावचे डॉ. तांबोळी विविध शासकीय विभागाचे अधिकारी व विविध गावचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.हे अभियान तासगाव मंडळामध्ये असणाऱ्या १७ गावच्या नागरिकांना लाभ झाला. या अभियानामध्ये शासनाच्या विविध योजना घेऊन महसूल विभाग, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, राष्ट्रीयकृत बँक , वीजवितरण कंपनी, एसटी महामंडळ सहभागी झाले होते.यामुळे या गावातील लोकांना त्याचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या अभियानामध्ये पात्र लाभार्थींना विविध विभागांच्या वतीने लाभ देण्यात आले. तर जवळपास ८५९९ एवढ्या प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. काही लोकांना योग्य कागदपत्राची पुर्तता नसल्याने लाभ घेता आला नाही.प्राचार्य राजेंद्र इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार घाडगे यांनी मानले. या अभियानासाठी मोठ्याप्रमाणात लोक सहभागी झाले होते. त्यामुळे काहीसा गोंधळ उडाला परंतु अभियान यशस्वी पार पडले. याला ग्रामस्थांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र पहायला मिळाले. (वार्ताहर)उपप्रादेशिक परिवहन विभाग गैरहजरया अभियानामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागांच्या वतीने एक ही अधिकारी सहभागी नसल्याने वाहन परवाना काढण्यासाठी उपस्थित असणाऱ्या लोकांनी रिकाम्या हाताने परत जावे लागले. यामुळे या विभागाबद्दल उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. शासनाच्या वतीने परिपत्र दिले असताना सुद्धा ते सहभागी झाले नसलेने त्यांना विचारणार कोण असा प्रश्न उपस्थित केला.