शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वहागाव प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित प्रश्न तातडीने सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:14 IST

सातारा : कुडाळी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत येणाऱ्या महू धरणातील पूर्ण बाधित वहागाव प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी काल शासकीय कार्यालयात आक्रोश ...

सातारा : कुडाळी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत येणाऱ्या महू धरणातील पूर्ण बाधित वहागाव प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी काल शासकीय कार्यालयात आक्रोश केला. पंधरा दिवसांत उर्वरित प्रश्न सोडवले नाहीत तर आम्ही धरणाचे काम बंद करू, अशा इशाऱ्याचे निवेदन कार्यकारी अभियंता सातारा यांना दिले आहे. त्यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा करून आपले गाऱ्हाणे मांडले.

कार्यकारी अभियंता धोम कालवे विभाग क्रमांक २, कृष्णानगर, सातारा यांना सर्व ग्रामस्थांनी जाऊन प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे, २० वर्षे झाली, आमच्या जमिनी संपादित केल्या असून, अजूनही काही प्रकल्पग्रस्तांना त्याचा मोबदला मिळाला नाही, हे आमचे दुर्दैव म्हणावे लागेल. शासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. अनेकांचे प्रश्न प्रलंबित असताना पाणी अडवले, यामुळे आमची २३ घरे पाण्याखाली गेली. सदर घरात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. कृष्णा खोरे वगळता शासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी अद्याप कुठल्याही प्रकारची मदत तर केली नाहीच, तर साधी चौकशी देखील करू शकले नाहीत. ज्यांना शेतजमीन मिळाली आहे ती व्यवस्थित मोजमाप नाही. त्यात अनेक त्रुटी आहेत. घराच्या भूखंडात अनेक अडचणी आहेत. काही सुधारणा करून जमीन मिळणे बाकी आहे. काहींना खडकाळ जमिनी मिळाल्याने त्यांनी बदली प्रस्ताव सादर केला आहे. त्यांना जमीन पसंत करून मिळाल्या नाहीत. या सर्व प्रश्नांचे घोंगडे भिजत ठेवले आहे. ज्यांना पर्यायी निवारा शेड दिले आहे, त्यामध्ये पाणी आहे. त्यात राहणे शक्य नाही. ज्या कुटुंबाच्या घराची वीज खंडित केली आहे, त्यांना रात्रीचे घरात राहणे अवघड झाले आहे. याबाबत सर्व खात्यांना आमच्या प्रश्नांची माहिती असूनही पाणी अडवून प्रकल्पग्रस्तांचे जगणे अवघड केले आहे.

जर हे प्रश्न सोडवले नाहीत तर आम्ही धरणग्रस्त धरणाचे काम बंद पाडणार असल्याचे शेवटी म्हटले आहे.

यावेळी वहागावचे उपसरपंच अरुण रांजणे, सदस्य मुक्ता चिकणे, विनोद कांबळे, संतोष शिराळे, तसेच लक्ष्मण रांजणे, ज्ञानेश्वर रांजणे, मोतीराम गुरव, रमेश रांजणे, शिवराम रांजणे, संतोष रांजणे, बबन रांजणे, नारायण रांजणे, सीताराम गुरव, अजित गुरव व धरणग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट :

या सर्व मागण्यांसंदर्भात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत याबाबत ठराव घेतला असून, जर लवकरात लवकर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर सर्व ग्रामस्थ धरणावर ठिय्या देऊन धरणाचे काम बंद पाडतील, असा ठराव केला आहे.

मागण्या.....

* प्रकल्पग्रस्त कोट्यातून प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे.

* पुनर्वसित ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतील खास बाब म्हणून घरे बांधून मिळावित.

* खातेदारांना खडकाळ व नापीक जमिनींचे बदली प्रस्ताव विचार करून तातडीने पिकाऊ जमिनी देण्यात याव्यात.

* धरणग्रस्त दाखला सुलभतेने मिळावा.

* संकलन दुरुस्तीच्या कामांना होत असलेला विलंब थांबवावा व संकलन दुरुस्ती त्वरित करावी.

* खातेदारांना शेतजमीन, घरांसाठी भूखंड भेटला नाही त्यांना त्वरित भूखंड मिळावा.

* ज्यांना शेतजमीन मिळाली आहे परंतु कब्जे पट्टीवर हद्द नसल्यामुळे ताबा नाही, त्यांना फेरमोजणी करून मिळावी.

* ज्यांना शेतजमिनीवर जाण्यास अडचण आहे त्यांना रस्ता मिळावा.

* काहींना जमिनी मिळाल्या; परंतु मूळ मालक दमदाटी करून ताबा देत नाहीत, त्यांना त्या मिळाव्यात.