शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

वहागाव प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित प्रश्न तातडीने सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:14 IST

सातारा : कुडाळी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत येणाऱ्या महू धरणातील पूर्ण बाधित वहागाव प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी काल शासकीय कार्यालयात आक्रोश ...

सातारा : कुडाळी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत येणाऱ्या महू धरणातील पूर्ण बाधित वहागाव प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी काल शासकीय कार्यालयात आक्रोश केला. पंधरा दिवसांत उर्वरित प्रश्न सोडवले नाहीत तर आम्ही धरणाचे काम बंद करू, अशा इशाऱ्याचे निवेदन कार्यकारी अभियंता सातारा यांना दिले आहे. त्यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा करून आपले गाऱ्हाणे मांडले.

कार्यकारी अभियंता धोम कालवे विभाग क्रमांक २, कृष्णानगर, सातारा यांना सर्व ग्रामस्थांनी जाऊन प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे, २० वर्षे झाली, आमच्या जमिनी संपादित केल्या असून, अजूनही काही प्रकल्पग्रस्तांना त्याचा मोबदला मिळाला नाही, हे आमचे दुर्दैव म्हणावे लागेल. शासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. अनेकांचे प्रश्न प्रलंबित असताना पाणी अडवले, यामुळे आमची २३ घरे पाण्याखाली गेली. सदर घरात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. कृष्णा खोरे वगळता शासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी अद्याप कुठल्याही प्रकारची मदत तर केली नाहीच, तर साधी चौकशी देखील करू शकले नाहीत. ज्यांना शेतजमीन मिळाली आहे ती व्यवस्थित मोजमाप नाही. त्यात अनेक त्रुटी आहेत. घराच्या भूखंडात अनेक अडचणी आहेत. काही सुधारणा करून जमीन मिळणे बाकी आहे. काहींना खडकाळ जमिनी मिळाल्याने त्यांनी बदली प्रस्ताव सादर केला आहे. त्यांना जमीन पसंत करून मिळाल्या नाहीत. या सर्व प्रश्नांचे घोंगडे भिजत ठेवले आहे. ज्यांना पर्यायी निवारा शेड दिले आहे, त्यामध्ये पाणी आहे. त्यात राहणे शक्य नाही. ज्या कुटुंबाच्या घराची वीज खंडित केली आहे, त्यांना रात्रीचे घरात राहणे अवघड झाले आहे. याबाबत सर्व खात्यांना आमच्या प्रश्नांची माहिती असूनही पाणी अडवून प्रकल्पग्रस्तांचे जगणे अवघड केले आहे.

जर हे प्रश्न सोडवले नाहीत तर आम्ही धरणग्रस्त धरणाचे काम बंद पाडणार असल्याचे शेवटी म्हटले आहे.

यावेळी वहागावचे उपसरपंच अरुण रांजणे, सदस्य मुक्ता चिकणे, विनोद कांबळे, संतोष शिराळे, तसेच लक्ष्मण रांजणे, ज्ञानेश्वर रांजणे, मोतीराम गुरव, रमेश रांजणे, शिवराम रांजणे, संतोष रांजणे, बबन रांजणे, नारायण रांजणे, सीताराम गुरव, अजित गुरव व धरणग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट :

या सर्व मागण्यांसंदर्भात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत याबाबत ठराव घेतला असून, जर लवकरात लवकर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर सर्व ग्रामस्थ धरणावर ठिय्या देऊन धरणाचे काम बंद पाडतील, असा ठराव केला आहे.

मागण्या.....

* प्रकल्पग्रस्त कोट्यातून प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे.

* पुनर्वसित ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतील खास बाब म्हणून घरे बांधून मिळावित.

* खातेदारांना खडकाळ व नापीक जमिनींचे बदली प्रस्ताव विचार करून तातडीने पिकाऊ जमिनी देण्यात याव्यात.

* धरणग्रस्त दाखला सुलभतेने मिळावा.

* संकलन दुरुस्तीच्या कामांना होत असलेला विलंब थांबवावा व संकलन दुरुस्ती त्वरित करावी.

* खातेदारांना शेतजमीन, घरांसाठी भूखंड भेटला नाही त्यांना त्वरित भूखंड मिळावा.

* ज्यांना शेतजमीन मिळाली आहे परंतु कब्जे पट्टीवर हद्द नसल्यामुळे ताबा नाही, त्यांना फेरमोजणी करून मिळावी.

* ज्यांना शेतजमिनीवर जाण्यास अडचण आहे त्यांना रस्ता मिळावा.

* काहींना जमिनी मिळाल्या; परंतु मूळ मालक दमदाटी करून ताबा देत नाहीत, त्यांना त्या मिळाव्यात.