शहरं
Join us  
Trending Stories
1
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
2
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
3
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
4
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
5
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
6
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
7
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
10
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
11
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
12
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
13
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
14
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
15
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
16
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
17
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
18
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
19
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
20
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्यासाठी ठराव करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:55 IST

कऱ्हाडात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पारधी मुक्ती आंदोलनाचे प्रकाश वायदंडे, दिलीप सकटे, तालुका उपाध्यक्ष शैलेश भिंगारदेवे, ...

कऱ्हाडात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पारधी मुक्ती आंदोलनाचे प्रकाश वायदंडे, दिलीप सकटे, तालुका उपाध्यक्ष शैलेश भिंगारदेवे, शांताराम थोरात, बहुजन समता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र दाभाडे, अशोक बडेकर, राहुल वायदंडे आदी उपस्थित होते.

प्रा. मच्छिंद्र सकटे म्हणाले, नाशिक येथे मार्च महिन्यात २६, २७ व २८ तारखेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. विज्ञानवादी लेखक जयंत नारळीकर हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. या संमेलनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याचा ठराव करावा, अशी आमची मागणी आहे. अण्णाभाऊ साठेंचा विचार दलित महासंघाने प्रमाण मानला आहे. फुले, आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर चालणारी ही संघटना आहे. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि अण्णाभाऊंनी त्यांच्या लेखनातून साहित्याचे समाजशास्त्र मांडले आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळ हे मराठी भाषेचे आम्हीच प्रमुख आहोत, या आविर्भावात काम करीत आहे.

मराठी भाषेचे पहिले साहित्य संमेलन १८७२ साली झाले होते. तेव्हापासून ही साहित्य परंपरा सुरू आहे. १९९७ साली अहमदनगरला जे संमेलन झाले त्या संमेलनावर दलित महासंघाने मोर्चा काढला होता. अण्णाभाऊंचे स्मारक वाटेगावला उभारावे, अशी आमची त्यावेळी मागणी होती. १९९८ साली परळीतील संमेलनावेळीही आम्ही मोर्चाचा इशारा दिला होता. २००० साली बेळगावला संमेलन झाले होते. त्याठिकाणीही मोर्चा काढण्याचे आम्ही नियोजन केले होते. मात्र, संमेलनाध्यक्ष य. दि. फडके यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते आंदोलन आम्ही स्थगित केले होते. आम्ही सातत्याने अण्णाभाऊंच्या सन्मानासाठी लढत आहे. कऱ्हाडला २००३ साली संमेलन झाले होते. त्यामध्ये हिंदुत्वापेक्षा माणुसकी श्रेष्ठ असल्याचा ठराव करावा, यासाठी आम्ही आंदोलन केले होते. ते आंदोलन लक्षवेधी ठरले होते. यंदा नाशिकला संमेलन होणार असून अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याचा ठराव त्या संमेलनात करावा, अशी आमची मागणी असून, कुसुमाग्रजांच्या घरापासून आम्ही हा मोर्चा काढणार आहोत, असेही प्रा. मच्छिंद्र सकटे यावेळी म्हणाले.