शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्यासाठी ठराव करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:55 IST

कऱ्हाडात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पारधी मुक्ती आंदोलनाचे प्रकाश वायदंडे, दिलीप सकटे, तालुका उपाध्यक्ष शैलेश भिंगारदेवे, ...

कऱ्हाडात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पारधी मुक्ती आंदोलनाचे प्रकाश वायदंडे, दिलीप सकटे, तालुका उपाध्यक्ष शैलेश भिंगारदेवे, शांताराम थोरात, बहुजन समता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र दाभाडे, अशोक बडेकर, राहुल वायदंडे आदी उपस्थित होते.

प्रा. मच्छिंद्र सकटे म्हणाले, नाशिक येथे मार्च महिन्यात २६, २७ व २८ तारखेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. विज्ञानवादी लेखक जयंत नारळीकर हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. या संमेलनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याचा ठराव करावा, अशी आमची मागणी आहे. अण्णाभाऊ साठेंचा विचार दलित महासंघाने प्रमाण मानला आहे. फुले, आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर चालणारी ही संघटना आहे. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि अण्णाभाऊंनी त्यांच्या लेखनातून साहित्याचे समाजशास्त्र मांडले आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळ हे मराठी भाषेचे आम्हीच प्रमुख आहोत, या आविर्भावात काम करीत आहे.

मराठी भाषेचे पहिले साहित्य संमेलन १८७२ साली झाले होते. तेव्हापासून ही साहित्य परंपरा सुरू आहे. १९९७ साली अहमदनगरला जे संमेलन झाले त्या संमेलनावर दलित महासंघाने मोर्चा काढला होता. अण्णाभाऊंचे स्मारक वाटेगावला उभारावे, अशी आमची त्यावेळी मागणी होती. १९९८ साली परळीतील संमेलनावेळीही आम्ही मोर्चाचा इशारा दिला होता. २००० साली बेळगावला संमेलन झाले होते. त्याठिकाणीही मोर्चा काढण्याचे आम्ही नियोजन केले होते. मात्र, संमेलनाध्यक्ष य. दि. फडके यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते आंदोलन आम्ही स्थगित केले होते. आम्ही सातत्याने अण्णाभाऊंच्या सन्मानासाठी लढत आहे. कऱ्हाडला २००३ साली संमेलन झाले होते. त्यामध्ये हिंदुत्वापेक्षा माणुसकी श्रेष्ठ असल्याचा ठराव करावा, यासाठी आम्ही आंदोलन केले होते. ते आंदोलन लक्षवेधी ठरले होते. यंदा नाशिकला संमेलन होणार असून अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याचा ठराव त्या संमेलनात करावा, अशी आमची मागणी असून, कुसुमाग्रजांच्या घरापासून आम्ही हा मोर्चा काढणार आहोत, असेही प्रा. मच्छिंद्र सकटे यावेळी म्हणाले.