शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कर्ज चक्रव्यूहातून माता-भगिनींना सोडवणार

By admin | Updated: May 24, 2017 23:13 IST

कर्ज चक्रव्यूहातून माता-भगिनींना सोडवणार

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : अव्वाच्या सव्वा व्याजाने महिलांना दिलेल्या मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या कर्जाच्या चक्रव्यूहातून पीडित माता-भगिनींना सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून यंत्रणेशी रितसर मार्गाने लढा देऊन आणि प्रसंगी कारावास भोगावा लागला तरी बेहतर मात्र संबंधित महिलांना कर्जमाफी मिळवून देणारच, असा ठाम निर्धार ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष श्री संदीप मोझर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कर्जमाफीसाठीचे अर्ज भरण्याची मोहिम संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या तडफेने सुरु असून इच्छूक महिलांनी ३० मे पूर्वी ‘मनसे’च्या पिरवाडी-सातारा येथील कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहनही मोझर यांनी केले आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अनेक मायक्रोफायनान्स कंपन्यांनी किरकोळ दराने उचललेले कर्ज २४ ते ३० टक्के व्याजदराने महिलांना वाटले असून कर्जवाटप, व्याजआकारणी, वसुली या सर्वच पातळीवर महिलांची मोठी फसवणूक होत आहे. त्यामुळे संबंधित पीडित महिलांनी एकत्रित येऊन ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला आहे. रणरागिणी एल्गार मेळावे, जाहीर मोर्चे, धरणे व ठिय्या आंदोलन, आमरण उपोषण आदी स्वरुपात हा लढा सुरु आहे. दि. ३ मे पासून संदीप मोझर यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाची दखल घेऊन रिझर्व्ह बँक व मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूट नेटवर्क या शासकीय यंत्रणेचे शिष्टमंडळ साताऱ्यात आले व निवासी जिल्हाधिकाऱ्याच्या दालनात झालेल्या बैठकीत कर्जमाफीच्या अनुषंगाने काही निर्णय झाले.यामध्ये मायक्रोफायनान्स कंपनीचे कोणीही प्रतिनिधी किंवा वसुली अधिकारी वसुलीसाठी कर्जदार महिलेच्या घरी जाऊ नये असे निश्चित करण्यात आले. तसेच आजवर फायनन्स कंपन्यांनी केलेल्या मनमानी व्याजआकारणी व वारेमाप लुटीचा मोबदला म्हणून लूटवापसी परतावा म्हणून मायक्रोफायनान्स कंपन्यांनी दिलेली सर्व कर्ज माफ करण्याच्या मागणीवर ज्या महिला अडीअडचणीमुळे कर्ज फेडू शकत नाहीत त्यांनी याबाबतचे लेखी अर्ज १ जूनपर्यंत शासकीय यंत्रणेकडे देण्याचे ठरले. त्या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेचे मायक्रोफायनान्स कंपन्याविरोधातील संपूर्ण भारतातील पहिले तक्रार निवारण केंद्र साताऱ्यात स्थापन्याचेही आश्वासन यावेळी रिझर्व्ह बँकेच्या शिष्टमंडळाने दिले. कर्जमाफीबाबतचे लेखी अर्ज भरुन घेण्याची मोहिम जिल्ह्यात ‘मनसे’तर्फे राबविण्यात येत आहे.ज्या महिलांनी अजून हे अर्ज भरले नाहीत त्यांना मनसेच्या पिरवाडी-ाातारा येथील कार्यालयात दिनांक ३० मे पूर्वी सकाळी ११ ते सायंकाळी ७ यावेळेत संपर्क साधून व प्रत्यक्ष येवून कर्जमाफी अर्ज भरावेत. सोबत आधारकार्डची झेरॉक्स, फोटो व कर्जमाफीशी सुसंगत कागदपत्रे, झेरॉक्स प्रतीमध्ये सादर करावेत. ही अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे नि:शुल्क असून इच्छूक महिलांनी कर्जमाफीबाबतचे अर्ज भरावेत, असे आवाहन संदीप मोझर यांनी केले आहे.गोरगरीब महिलांना छळणाऱ्या मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींना धडा शिकवू आणि पीडित माता-भगिनींची कर्जमाफी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा निर्धार यानिमित्ताने गावोगावी होणाऱ्या जनजागृती सभांमध्ये संदीप मोझर यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्यासमवेत या ठिकठिकाणच्या सभामध्ये दिलीप सुर्वे, मधुकर जाधव, सचिन पवार, कुमार जाधव, रामदास वाघचौरे, विक्रम लावंड, मनिषा चव्हाण, स्वाती माने, अनिता गंगावणे, भारती शेंडे, अलका दगडे, आयेशा शेख, निर्मला राठोड आदींचा सहभाग आहे.