शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आंबेघरची पुनरावृत्ती साताऱ्याला सतावतेय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:32 IST

सातारा : भूस्खलन होऊन माळीण झालं आता आंबेघर झालं, आता आणखीन भविष्यात काय वाढून ठेवलंय, याची चिंता तर आहेच. ...

सातारा : भूस्खलन होऊन माळीण झालं आता आंबेघर झालं, आता आणखीन भविष्यात काय वाढून ठेवलंय, याची चिंता तर आहेच. पण आंबेघरसारखी पुनरावृत्ती होणार तर नाही ना, या विचाराने अजिंक्यताराच्या पायथ्याला असलेल्या रहिवाशांना सतावलंय. जवळपास ३६३ घरे असलेल्या या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मनात पावसाळा आला की अक्षरश: धस्स होतं. पण काळाची वाट पाहत दिवस पुढे ढकलण्याशिवाय या रहिवाशांच्या हातातही काहीच नाही.

भूस्खलनाच्या घटना गेल्या चार-पाच वर्षांपासून सगळीकडेच वाढलेल्या पाहायला मिळताहेत. शहरे दाटीवाटीने तुडुंब भरू लागलीत. फ्लॅट, जागेच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यात. त्यामुळे मिळेल त्याठिकाणी झाेपडी उभारून लोक वास्तव करू लागले आहेत. जिथं अडगळ आहे, डोंगर पायथा आहे, अशी जागा हेरून लोक रहिवास शोधू लागलेत. आताच नव्हे तर फार पूर्वीपासूनच साताऱ्यातील अजिंक्यताऱ्याच्या पायथ्यालाही अनेक कुटुंब स्थायिक झाली आहेत. या रहिवाशांच्या उशाला भला मोठा कड्या कपाऱ्यांचा अजिंक्यतारा आहे. घरातून बाहेर येऊन नुसत डोंगराकडे पाहिलं तरी काळीज चर्रर होऊन जातंय. इतक मन या रहिवाशांचं विचलित झालंय. त्याचे कारण म्हणजे पाटण तालुक्यातील आंबेघर आणि रायगडमधील तळीये याठिकाणी उद्भवलेली परिस्थिती या रहिवाशांच्या कान आणि डोळ्यांपर्यंत पोहाेचलीय. कोणी सकाळी-सकाळी घराच्या वर असलेल्या डोंगरावर जाऊन जमिनीला भेगा तर पडल्या नाहीत ना, याची खात्री करतंय तर कोणी मोठे दगड निसटण्याच्या मार्गावर तर नाहीत ना, याची चाचपणी करतंय. एकंदरीत सारेच जण हबकलेत. पण मनातील यातना सांगायच्या कोणाला, जर प्रशासनाला यातना सांगितल्या तर इथून कायमचा उठाव होईल, ही सगळ्यात मोठी त्यांना धास्ती. त्यामुळे काळाची वाट पाहात बसण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नसल्याचे काही रहिवाशांचे म्हणणे आहे. काही रहिवाशांची मालकी हक्काची जागा आहे. पण काहीजणांनी बेकायदा झोपड्याही इथे उभारल्यात. त्यामुळे अधिकृतपणे या रहिवाशांकडून प्रशासनाकडे कोणतीही मागणी केली जाणार नाही, हेच दिसते. पण काळ कधीही येऊन धडकेल, याची जाणीव मात्र या रहिवाशांना एखादी घटना घडल्यानंतर अधिक तीव्रतेने होतेय. आंबेघरच्या घटनेनंतर तर अधिक होऊ लागलीय. पावसाळ्याचे तीन महिने म्हणजे या रहिवाशांना एक वर्षासारखे वाटताहेत. जीव मुठीत घेऊन हे रहिवासी येणारा दिवस सुस्कारा सोडत पुढे ढकलताहेत. इतकी मनाची घालमेल या रहिवाशांची होतेय.

चाैकट : ही वेळ बोध घेण्याची...

अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याला चारभिंतीपासून ते बोगद्यापर्यंत सरसकट वसाहती आहेत. डोंगराला अगदी खेटून अनेकांनी घरे बांधलीत. बोगदा परिसरात तर डोंगरावरच चक्क घरे बांधली गेली आहेत. अजूनपर्यंत तरी या रहिवाशांवर कसलीही आपत्ती ओढावलेली नाही. त्यामुळे ना जिल्हा प्रशासन आढावा घेतंय ना पालिका प्रशासन. एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतरच मग एखाद्याला जबाबदार धरून घटनेची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न होतो. पण ज्यांचे नाहक जीव जातात त्यांचे काय, हा प्रश्न कायम राहतो. इतर जिल्ह्यांत सध्या घडलेल्या घटनांतून सातारा जिल्हा प्रशासनाने तरी बोध घायला हवा, इतकीच सातारकरांची अपेक्षा आहे.

फोटो : जावेद खान