शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

आंबेघरची पुनरावृत्ती साताऱ्याला सतावतेय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:32 IST

सातारा : भूस्खलन होऊन माळीण झालं आता आंबेघर झालं, आता आणखीन भविष्यात काय वाढून ठेवलंय, याची चिंता तर आहेच. ...

सातारा : भूस्खलन होऊन माळीण झालं आता आंबेघर झालं, आता आणखीन भविष्यात काय वाढून ठेवलंय, याची चिंता तर आहेच. पण आंबेघरसारखी पुनरावृत्ती होणार तर नाही ना, या विचाराने अजिंक्यताराच्या पायथ्याला असलेल्या रहिवाशांना सतावलंय. जवळपास ३६३ घरे असलेल्या या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मनात पावसाळा आला की अक्षरश: धस्स होतं. पण काळाची वाट पाहत दिवस पुढे ढकलण्याशिवाय या रहिवाशांच्या हातातही काहीच नाही.

भूस्खलनाच्या घटना गेल्या चार-पाच वर्षांपासून सगळीकडेच वाढलेल्या पाहायला मिळताहेत. शहरे दाटीवाटीने तुडुंब भरू लागलीत. फ्लॅट, जागेच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यात. त्यामुळे मिळेल त्याठिकाणी झाेपडी उभारून लोक वास्तव करू लागले आहेत. जिथं अडगळ आहे, डोंगर पायथा आहे, अशी जागा हेरून लोक रहिवास शोधू लागलेत. आताच नव्हे तर फार पूर्वीपासूनच साताऱ्यातील अजिंक्यताऱ्याच्या पायथ्यालाही अनेक कुटुंब स्थायिक झाली आहेत. या रहिवाशांच्या उशाला भला मोठा कड्या कपाऱ्यांचा अजिंक्यतारा आहे. घरातून बाहेर येऊन नुसत डोंगराकडे पाहिलं तरी काळीज चर्रर होऊन जातंय. इतक मन या रहिवाशांचं विचलित झालंय. त्याचे कारण म्हणजे पाटण तालुक्यातील आंबेघर आणि रायगडमधील तळीये याठिकाणी उद्भवलेली परिस्थिती या रहिवाशांच्या कान आणि डोळ्यांपर्यंत पोहाेचलीय. कोणी सकाळी-सकाळी घराच्या वर असलेल्या डोंगरावर जाऊन जमिनीला भेगा तर पडल्या नाहीत ना, याची खात्री करतंय तर कोणी मोठे दगड निसटण्याच्या मार्गावर तर नाहीत ना, याची चाचपणी करतंय. एकंदरीत सारेच जण हबकलेत. पण मनातील यातना सांगायच्या कोणाला, जर प्रशासनाला यातना सांगितल्या तर इथून कायमचा उठाव होईल, ही सगळ्यात मोठी त्यांना धास्ती. त्यामुळे काळाची वाट पाहात बसण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नसल्याचे काही रहिवाशांचे म्हणणे आहे. काही रहिवाशांची मालकी हक्काची जागा आहे. पण काहीजणांनी बेकायदा झोपड्याही इथे उभारल्यात. त्यामुळे अधिकृतपणे या रहिवाशांकडून प्रशासनाकडे कोणतीही मागणी केली जाणार नाही, हेच दिसते. पण काळ कधीही येऊन धडकेल, याची जाणीव मात्र या रहिवाशांना एखादी घटना घडल्यानंतर अधिक तीव्रतेने होतेय. आंबेघरच्या घटनेनंतर तर अधिक होऊ लागलीय. पावसाळ्याचे तीन महिने म्हणजे या रहिवाशांना एक वर्षासारखे वाटताहेत. जीव मुठीत घेऊन हे रहिवासी येणारा दिवस सुस्कारा सोडत पुढे ढकलताहेत. इतकी मनाची घालमेल या रहिवाशांची होतेय.

चाैकट : ही वेळ बोध घेण्याची...

अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याला चारभिंतीपासून ते बोगद्यापर्यंत सरसकट वसाहती आहेत. डोंगराला अगदी खेटून अनेकांनी घरे बांधलीत. बोगदा परिसरात तर डोंगरावरच चक्क घरे बांधली गेली आहेत. अजूनपर्यंत तरी या रहिवाशांवर कसलीही आपत्ती ओढावलेली नाही. त्यामुळे ना जिल्हा प्रशासन आढावा घेतंय ना पालिका प्रशासन. एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतरच मग एखाद्याला जबाबदार धरून घटनेची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न होतो. पण ज्यांचे नाहक जीव जातात त्यांचे काय, हा प्रश्न कायम राहतो. इतर जिल्ह्यांत सध्या घडलेल्या घटनांतून सातारा जिल्हा प्रशासनाने तरी बोध घायला हवा, इतकीच सातारकरांची अपेक्षा आहे.

फोटो : जावेद खान