शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

आंबेघरची पुनरावृत्ती साताऱ्याला सतावतेय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:32 IST

सातारा : भूस्खलन होऊन माळीण झालं आता आंबेघर झालं, आता आणखीन भविष्यात काय वाढून ठेवलंय, याची चिंता तर आहेच. ...

सातारा : भूस्खलन होऊन माळीण झालं आता आंबेघर झालं, आता आणखीन भविष्यात काय वाढून ठेवलंय, याची चिंता तर आहेच. पण आंबेघरसारखी पुनरावृत्ती होणार तर नाही ना, या विचाराने अजिंक्यताराच्या पायथ्याला असलेल्या रहिवाशांना सतावलंय. जवळपास ३६३ घरे असलेल्या या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मनात पावसाळा आला की अक्षरश: धस्स होतं. पण काळाची वाट पाहत दिवस पुढे ढकलण्याशिवाय या रहिवाशांच्या हातातही काहीच नाही.

भूस्खलनाच्या घटना गेल्या चार-पाच वर्षांपासून सगळीकडेच वाढलेल्या पाहायला मिळताहेत. शहरे दाटीवाटीने तुडुंब भरू लागलीत. फ्लॅट, जागेच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यात. त्यामुळे मिळेल त्याठिकाणी झाेपडी उभारून लोक वास्तव करू लागले आहेत. जिथं अडगळ आहे, डोंगर पायथा आहे, अशी जागा हेरून लोक रहिवास शोधू लागलेत. आताच नव्हे तर फार पूर्वीपासूनच साताऱ्यातील अजिंक्यताऱ्याच्या पायथ्यालाही अनेक कुटुंब स्थायिक झाली आहेत. या रहिवाशांच्या उशाला भला मोठा कड्या कपाऱ्यांचा अजिंक्यतारा आहे. घरातून बाहेर येऊन नुसत डोंगराकडे पाहिलं तरी काळीज चर्रर होऊन जातंय. इतक मन या रहिवाशांचं विचलित झालंय. त्याचे कारण म्हणजे पाटण तालुक्यातील आंबेघर आणि रायगडमधील तळीये याठिकाणी उद्भवलेली परिस्थिती या रहिवाशांच्या कान आणि डोळ्यांपर्यंत पोहाेचलीय. कोणी सकाळी-सकाळी घराच्या वर असलेल्या डोंगरावर जाऊन जमिनीला भेगा तर पडल्या नाहीत ना, याची खात्री करतंय तर कोणी मोठे दगड निसटण्याच्या मार्गावर तर नाहीत ना, याची चाचपणी करतंय. एकंदरीत सारेच जण हबकलेत. पण मनातील यातना सांगायच्या कोणाला, जर प्रशासनाला यातना सांगितल्या तर इथून कायमचा उठाव होईल, ही सगळ्यात मोठी त्यांना धास्ती. त्यामुळे काळाची वाट पाहात बसण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नसल्याचे काही रहिवाशांचे म्हणणे आहे. काही रहिवाशांची मालकी हक्काची जागा आहे. पण काहीजणांनी बेकायदा झोपड्याही इथे उभारल्यात. त्यामुळे अधिकृतपणे या रहिवाशांकडून प्रशासनाकडे कोणतीही मागणी केली जाणार नाही, हेच दिसते. पण काळ कधीही येऊन धडकेल, याची जाणीव मात्र या रहिवाशांना एखादी घटना घडल्यानंतर अधिक तीव्रतेने होतेय. आंबेघरच्या घटनेनंतर तर अधिक होऊ लागलीय. पावसाळ्याचे तीन महिने म्हणजे या रहिवाशांना एक वर्षासारखे वाटताहेत. जीव मुठीत घेऊन हे रहिवासी येणारा दिवस सुस्कारा सोडत पुढे ढकलताहेत. इतकी मनाची घालमेल या रहिवाशांची होतेय.

चाैकट : ही वेळ बोध घेण्याची...

अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याला चारभिंतीपासून ते बोगद्यापर्यंत सरसकट वसाहती आहेत. डोंगराला अगदी खेटून अनेकांनी घरे बांधलीत. बोगदा परिसरात तर डोंगरावरच चक्क घरे बांधली गेली आहेत. अजूनपर्यंत तरी या रहिवाशांवर कसलीही आपत्ती ओढावलेली नाही. त्यामुळे ना जिल्हा प्रशासन आढावा घेतंय ना पालिका प्रशासन. एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतरच मग एखाद्याला जबाबदार धरून घटनेची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न होतो. पण ज्यांचे नाहक जीव जातात त्यांचे काय, हा प्रश्न कायम राहतो. इतर जिल्ह्यांत सध्या घडलेल्या घटनांतून सातारा जिल्हा प्रशासनाने तरी बोध घायला हवा, इतकीच सातारकरांची अपेक्षा आहे.

फोटो : जावेद खान