शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

यवतेश्वर घाटातील भेगाळलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:25 IST

पेट्री : सातारा - कास मार्गावरील यवतेश्वर घाटात सांबरवाडी फाट्यापासून काही अंतरावर साताऱ्याकडे येताना बुधवारी सायंकाळी रस्त्याची डावी बाजू ...

पेट्री : सातारा - कास मार्गावरील यवतेश्वर घाटात सांबरवाडी फाट्यापासून काही अंतरावर साताऱ्याकडे येताना बुधवारी सायंकाळी रस्त्याची डावी बाजू साधारण पाच-सहा मीटरपर्यंत भेगाळल्याने संबंधित विभागाकडून वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी धोक्याची पट्टी बांधण्यात आली होती. गुरुवारी ‘यवतेश्वर घाटातील रस्ता भेगाळला’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच या वृत्ताची दखल घेऊन बांधकाम विभागाकडून शनिवारपासून याठिकाणी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केल्याने ग्रामस्थ, पर्यटक, वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

यवतेश्वर घाटात सांबरवाडीहून साताऱ्याकडे येताना बुधवारी सायंकाळी रस्त्याची डावी बाजू साधारणत: पाच-सहा मीटर लांबीपर्यंत भेगाळल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. पावसाचे दिवस असले तरी सध्या थोडीफार पावसाने उघडीप दिली असली तरी काही दिवसात पाऊस सुरू होऊन आणखी रस्ता खचण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. परिसरात काही दिवसांपूर्वी झालेला मुसळधार पाऊस, त्यात जड मालाची सतत वाहतूक यामुळे रस्ता भेगाळल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने मार्गावरील वाहतूक रामभरोसे झाली होती.

शहराच्या पश्चिमेला नागरिक, पर्यटक, वाहनचालकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असल्याने एखादी विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ, पर्यटक, वाहनचालकांतून होत होती. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने याठिकाणी बाजूने धोक्याची पट्टी लावण्यात आली असली तरी भविष्यात होणारा अनर्थ टाळण्यासाठी तत्काळ या ठिकाणची दुरूस्ती होऊन उपाययोजना होणे आवश्यक असल्याची मागणी होत असताना ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच बातमीची दखल घेऊन शनिवारपासून युद्धपातळीवर काम सुरू झाले.

बुधवारी रस्ता भेगाळून नजीकची जुनी संरक्षक भिंत फुगल्याने पावसामुळे रस्ता खचून भिंत कोसळण्याची शक्यता होती. यामुळे सध्या ही जुनी संरक्षक भिंत जेसीबीने हटवून साधारण वीस मीटर लांब व चार मीटर उंच संरक्षक भिंत नव्याने बांधण्याचे काम सुरू आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

(चौकट)

दुसऱ्या बाजूला कठड्यांची दुरवस्था...

रस्त्याच्या एका बाजूला पावसाळ्यात कोसळणारी दरड तर दुसऱ्या बाजूला संरक्षक कठड्यांची दुरवस्था त्यात रस्त्याच्या भेगेचे संकट, यामुळे घाट धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये यवतेश्वर घाटातील रस्ता खचून वाहतूक ठप्प होऊन काहीकाळ एकेरी वाहतूक सुरू होती.

०३पेट्री

यवतेश्वर घाटात बांधकाम विभागाकडून शनिवारपासून रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केल्याने पर्यटक, वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे. (छाया : सागर चव्हाण)