शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

दाढोलीमार्गे पाटण रस्ता दुरुस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST

चाफळ : चाफळ व्हाया दाढोलीमार्गे पाटणकडे जाणारा घाटरस्ता गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खचून वाहून गेल्याने मोठी दुरवस्था ...

चाफळ : चाफळ व्हाया दाढोलीमार्गे पाटणकडे जाणारा घाटरस्ता गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खचून वाहून गेल्याने मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या संथगतीने सुरू असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आजही येथील वाहतूक बंद असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना बी-बियाण्याची वाहतूक डोक्यावरून करावी लागत आहे. जलदगतीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

चाफळ विभागातून दाढोलीमार्गे पाटणला जोडणारा हा एकमेव घाटरस्ता आहे. या घाटरस्त्याची गत महिन्यात जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या घाटरस्त्याच्या एका वळणावरील मोरी पूल वाहून गेला आहे. याठिकाणी तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे असतानादेखील सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या एक महिन्यापासून संपूर्ण वाहतूक बंद असून, याचा नाहक त्रास मात्र स्थानिकांना सहन करावा लागत आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी याकामी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी चाफळ परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

गेल्या महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाने चाफळपासून दाढोलीमार्गे पाटणकडे जाणारा घाटरस्ता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. संपूर्ण घाटरस्त्याची दुरवस्था झाली आहे. सध्या या रस्त्याच्या दुरुस्तीच्या किरकोळ कामाला सुरुवात झाली असून, केवळ किरकोळ दुरुस्ती सुरू असली तरी तीही संथगतीने होत असल्याने वाहने घेऊन जाता येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या डोक्यावरून खते व बियाणे व घर खर्चासाठी लागणारे साहित्य घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. संपूर्ण घाटरस्ता जागोजागी खचला असून, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डोंगरातून वाहून आलेले लहान-मोठे दगड-गोटे व माती वाहून रस्त्यावर तशीच साचून राहिल्याने त्यावरून चालणेही अवघड झाले आहे.

चौकट..

घाटरस्ता वाहतुकीसाठी कधी सुरू होणार...

सध्या या रस्त्यावर साचलेले दगड व गोटे काढण्याचे काम व काही ठिकाणी घाटरस्त्याची किरकोळ दुरुस्ती सुरू असली तरी तेही काम संथगतीने करण्यात येत आहेत. हा घाटरस्ता बांधकाम विभाग नक्की वाहतुकीसाठी कधी सुरू करणार आहे, असा प्रश्न ग्रामस्थ विचारू लागले आहेत. संपूर्ण घाटरस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रयत्न करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.