शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

दाढोलीमार्गे पाटण रस्ता दुरुस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST

चाफळ : चाफळ व्हाया दाढोलीमार्गे पाटणकडे जाणारा घाटरस्ता गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खचून वाहून गेल्याने मोठी दुरवस्था ...

चाफळ : चाफळ व्हाया दाढोलीमार्गे पाटणकडे जाणारा घाटरस्ता गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खचून वाहून गेल्याने मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या संथगतीने सुरू असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आजही येथील वाहतूक बंद असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना बी-बियाण्याची वाहतूक डोक्यावरून करावी लागत आहे. जलदगतीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

चाफळ विभागातून दाढोलीमार्गे पाटणला जोडणारा हा एकमेव घाटरस्ता आहे. या घाटरस्त्याची गत महिन्यात जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या घाटरस्त्याच्या एका वळणावरील मोरी पूल वाहून गेला आहे. याठिकाणी तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे असतानादेखील सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या एक महिन्यापासून संपूर्ण वाहतूक बंद असून, याचा नाहक त्रास मात्र स्थानिकांना सहन करावा लागत आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी याकामी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी चाफळ परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

गेल्या महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाने चाफळपासून दाढोलीमार्गे पाटणकडे जाणारा घाटरस्ता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. संपूर्ण घाटरस्त्याची दुरवस्था झाली आहे. सध्या या रस्त्याच्या दुरुस्तीच्या किरकोळ कामाला सुरुवात झाली असून, केवळ किरकोळ दुरुस्ती सुरू असली तरी तीही संथगतीने होत असल्याने वाहने घेऊन जाता येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या डोक्यावरून खते व बियाणे व घर खर्चासाठी लागणारे साहित्य घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. संपूर्ण घाटरस्ता जागोजागी खचला असून, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डोंगरातून वाहून आलेले लहान-मोठे दगड-गोटे व माती वाहून रस्त्यावर तशीच साचून राहिल्याने त्यावरून चालणेही अवघड झाले आहे.

चौकट..

घाटरस्ता वाहतुकीसाठी कधी सुरू होणार...

सध्या या रस्त्यावर साचलेले दगड व गोटे काढण्याचे काम व काही ठिकाणी घाटरस्त्याची किरकोळ दुरुस्ती सुरू असली तरी तेही काम संथगतीने करण्यात येत आहेत. हा घाटरस्ता बांधकाम विभाग नक्की वाहतुकीसाठी कधी सुरू करणार आहे, असा प्रश्न ग्रामस्थ विचारू लागले आहेत. संपूर्ण घाटरस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रयत्न करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.