शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

दाढोलीमार्गे पाटण रस्ता दुरुस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST

चाफळ : चाफळ व्हाया दाढोलीमार्गे पाटणकडे जाणारा घाटरस्ता गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खचून वाहून गेल्याने मोठी दुरवस्था ...

चाफळ : चाफळ व्हाया दाढोलीमार्गे पाटणकडे जाणारा घाटरस्ता गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खचून वाहून गेल्याने मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या संथगतीने सुरू असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आजही येथील वाहतूक बंद असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना बी-बियाण्याची वाहतूक डोक्यावरून करावी लागत आहे. जलदगतीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

चाफळ विभागातून दाढोलीमार्गे पाटणला जोडणारा हा एकमेव घाटरस्ता आहे. या घाटरस्त्याची गत महिन्यात जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या घाटरस्त्याच्या एका वळणावरील मोरी पूल वाहून गेला आहे. याठिकाणी तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे असतानादेखील सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या एक महिन्यापासून संपूर्ण वाहतूक बंद असून, याचा नाहक त्रास मात्र स्थानिकांना सहन करावा लागत आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी याकामी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी चाफळ परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

गेल्या महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाने चाफळपासून दाढोलीमार्गे पाटणकडे जाणारा घाटरस्ता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. संपूर्ण घाटरस्त्याची दुरवस्था झाली आहे. सध्या या रस्त्याच्या दुरुस्तीच्या किरकोळ कामाला सुरुवात झाली असून, केवळ किरकोळ दुरुस्ती सुरू असली तरी तीही संथगतीने होत असल्याने वाहने घेऊन जाता येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या डोक्यावरून खते व बियाणे व घर खर्चासाठी लागणारे साहित्य घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. संपूर्ण घाटरस्ता जागोजागी खचला असून, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डोंगरातून वाहून आलेले लहान-मोठे दगड-गोटे व माती वाहून रस्त्यावर तशीच साचून राहिल्याने त्यावरून चालणेही अवघड झाले आहे.

चौकट..

घाटरस्ता वाहतुकीसाठी कधी सुरू होणार...

सध्या या रस्त्यावर साचलेले दगड व गोटे काढण्याचे काम व काही ठिकाणी घाटरस्त्याची किरकोळ दुरुस्ती सुरू असली तरी तेही काम संथगतीने करण्यात येत आहेत. हा घाटरस्ता बांधकाम विभाग नक्की वाहतुकीसाठी कधी सुरू करणार आहे, असा प्रश्न ग्रामस्थ विचारू लागले आहेत. संपूर्ण घाटरस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रयत्न करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.