शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीसाठी शेती औजारांच्या दुरूस्तीची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:28 IST

तळमावले : ‘मृगाची पेरणी, धनधान्य देई’ अशी म्हण आहे. दि. ११ जूनपासून मृग नक्षत्राचा प्रारंभ होत असून, खरीप हंगामाला ...

तळमावले : ‘मृगाची पेरणी, धनधान्य देई’ अशी म्हण आहे. दि. ११ जूनपासून मृग नक्षत्राचा प्रारंभ होत असून, खरीप हंगामाला खऱ्या अर्थाने याच दिवसापासून सुरुवात होते. मान्सूनचे आगमन काही दिवसातच होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेती अवजारांची दुरुस्ती करण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

तळमावले विभागातील शिवारात सध्या पेरणीची लगबग सुरु झाली असल्याचे चित्र दिसत आहे. या विभागात अजूनही पारंपरिक शेती अवजारांच्या माध्यमातून शेती केली जाते. नांगर, कुळव, पाटे, चारफणी, सहाफणी आदी औजारांच्या माध्यमातून पेरणी केली जाते. एकदा पेरणी झाली की शेतकरी ही अवजारे व्यवस्थित सुरक्षित जागी ठेवतात. पुन्हा पुढच्या पेरणीलाच ही अवजारे बाहेर काढली जातात. वर्षभर एका ठिकाणी असल्यामुळे काही अवजारांची मोडतोड होते. सध्या त्या अवजारांची दुरुस्ती करण्याचे काम गतीने सुरू आहे. सुतारकाम करणाऱ्या कारागिरांकडून प्रामुख्याने ही अवजारे दुरुस्त केली जातात. त्या बदल्यात त्यांना धान्य अथवा पैसे दिले जातात.

काळगाव विभागामध्ये धूळवाफेवरील पेरणीला प्राधान्य दिले जाते. यामध्ये भात, सोयाबीन, भुईमूग, मका आदी पिके घेतली जातात. सध्या या भागात पेरणीची धांदल सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण शिवार माणसांनी गजबजलेले दिसून येत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात वळिवाचा पाऊस म्हणावा तसा चांगला झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी मे महिना संपत आला तरी तसा निवांतच होता. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे २ ते ३ दिवस या भागाला वारा आणि पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीला सुरुवात केली आहे.

- चौकट

उन्हाळी नांगरटीमुळे निघालेली मोठमोठी ढेकळं पावसाने विरघळून गेली आहेत. त्यामुळे सर्वजण शेतीच्या कामात गुंतले आहेत. बांधाची जुळवाजुळव करणे, शेतीतील सड, पालापाचोळा काढून रान स्वच्छ करणे, खत विस्कटणे आदी कामे महिला करत आहे. शेतकऱ्यांकडून शेतीची अवजारे दुरुस्त करुन घेण्याची धांदल सुरु आहे. नांगर, फाळ, इडी, कासरे, कुळव, पास, जानावळे, चारफणी, सहाफणी, त्याला लागणारे नळ, चाडे आदी साहित्याची जुळवाजुळव करण्यात शेतकरी गुंतले आहेत.

- कोट

मी मुंबईला खोका मार्केटमध्ये कामाला होतो. त्यावेळी पेरणीच्या वेळी गावी यायला लागायचे. अशावेळी शेतीची अवजारे नसली तर अडचण निर्माण व्हायची. यामुळे कारागिरांकडे जाऊन मी शेती अवजारे बनवायला आणि दुरुस्त करायला शिकलो आहे. शेतकऱ्यांची अडचण दूर होते, याचे मनाला समाधान वाटते.

- राजाराम डाकवे

शेतकरी व कारागिर

फोटो : ३१केआरडी०२

कॅप्शन : पेरणीच्या औजारांची दुरुस्ती करण्यात ग्रामीण भागातील शेतकरी व्यस्त असून, पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील राजाराम डाकवे हे शेतकऱ्यांच्या औजारांची दुरूस्ती करून देत आहेत. (छाया : पोपट माने)