शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

महाबळेश्वरमधील अनाधिकृत बांधकामे काढा, नाहीतर प्रशासन काढणार; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

By नितीन काळेल | Updated: November 3, 2023 19:51 IST

तरुण मतदार नोंदणी अन् मतदान वाढीसाठी महाविद्यालयाबरोबर करार

सातारा: महाबळेश्वरचे साैंदर्य अबाधित राहण्यासाठी अनाधिकृत बांधकामावर कारवाई होणारच आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत: अशी बांधकामे काढावीत अन्यथा प्रशासन ती काढेल. तसेच यापुढे अनाधिकृत बांधकामे होऊ देणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला. तसेच तरुण मतदार नोंदणी आणि मतदान वाढविण्यासाठी महाविद्यालयाबरोबर करार करण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

सातारा जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘२०२४ मध्ये लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेचीही निवडणूक होत आहे. याची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यासाठी पात्र मतदार महत्वाचे असून त्यांना मतदानकार्ड देणे आवश्यक आहे. याकरिता जनजागृतीही महत्वाची आहे. तसेच जिल्ह्यात आज २५ लाख ५० हजार मतदार आहेत. त्यातील १ लाख ५ हजार मतदार हे १८ ते १९ वयोगाटातील आहेत.

त्यांची मतदार नोंदणी आवश्यक आहे. तर एकूण २ लाख २५ हजार तरुण मतदार असून त्यांचीही नोंद करण्यात येणार असून ते प्रथमच मतदान करणार आहेत. यासाठी महाविद्यालयीन तरुणाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३३ महाविद्यालयाबरोबर करार झाला आहे. यामध्ये सहभागी महाविद्यालयीन तरुणांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल. याचा फायदा पुढील काळात शिक्षण तसेच इतरवेळीही होईल. तर मतदार नोंदणीसाठी चांगले काम करणाऱ्या महाविद्यालयाला राज्यस्तरावर गाैरविण्यात येणार आहे.

दरम्यान, या पत्रकार परिषदेतच पत्रकारांनी महाबळेश्वरमधील अनाधिकृत बांधकाम काढणे मोहीमचा प्रश्न उपस्थित केला. यावर जिल्हाधिकारी डुडी यांनी महाबळेश्वर इकाे सेन्सीटीव्ह झोनमध्ये आहे. येथेच वनस्पती, वन्यप्राणी, घाट, नद्या, डोंगर आहेत. तेथील डोंगरभागात बांधकाम करताना शासनाचे काही निकष आहेत. ते पाळत नसल्याचे प्रकार समोर आले. भविष्यात भूस्खलन, जादा पाऊस झाल्यास पूर अशा घटनांमुळे नुकसान होऊ शकते. अनाधिकृत बांधकाम थांबविणे आणि नवीन चुकीचे बांधकाम होऊ नये हे महत्वाचे आहे. त्यामुळे कारवाईची मोहीम सुरू केली आहे, असे सांगितले. तसेच दिवाळीमुळे १५ दिवसांची मुदत दिली असलीतरी नागरिकांनी स्वत: अनाधिकृत बांधकामे काढून घ्यावीत. नाहीतर प्रशासन ती काढणारच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तर जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर न होण्याला महसूल विभाग कारणीभूत असल्याचा आरोप राजकीय नेते करत आहेत, असा प्रश्न केल्यावर त्यांनी दुष्काळाबाबत महसूलची माहिती अजिबात दिली जात नाही. याचा डेटा सॅटेलाईटद्वारे काढण्यात येत असतो असे सांगतले. तर दुष्काळी तालुक्यात पाऊस कमी आहे. त्यामुळे चारा डेपोसह अन्य विषयांवर नियोजन सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यादी तयार; गुन्हे दाखल करणार...महाबळेश्वरमध्ये अनाधिकृत बांधकामेच होणार नाहीत यादृष्टीने प्रशासन पावले टाकत आहे. अनाधिकृत काम झाले तर कारवाई ही १०० टक्के होणारच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही तसेच निर्देश आहेत. त्यामुळे लोकांनी नियम पाळावेत. अनाधिकृत बांधकाम निघणारच आहे. तसेच याबाबत यादीही तयार असून काहीवेळा गुन्हेही दाखल करावे लागतील.- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

 

 

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानsatara-pcसातारा