शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पावसाचे वाहून जाणारे पाणी पाझर तलावात सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

आदर्की : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणे काटोकाठ भरली, पण जिल्ह्याच्या पूर्वेला फलटण तालुक्यात मोठ्या पावसाने ...

आदर्की : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणे काटोकाठ भरली, पण जिल्ह्याच्या पूर्वेला फलटण तालुक्यात मोठ्या पावसाने पाठ फिरविल्याने ओढे-नाले, शेकडो पाझर तलाव कोरडे ठणठणीत असल्याने, धोम-बलकवडी धरणातून नदीला सोडलेले पाणी खंडाळा-फलटण तालुक्यात सोडले आहे. त्या पाण्याने पाझर तलाव भरून देण्याची मागणी शेतकरी, ग्रामस्थांतून होत आहे.

सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, सातारा, पाटण, कऱ्हाड तालुक्यात गत आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू आहे, पण फलटण तालुक्यात रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील बाजरी व इतर पिके चांगली आहे.

मे महिन्यापासून फलटण तालुक्यात मोठा पाऊस झाला नाही, त्यामुळे फलटण तालुक्यातील शेकडो पाझर तलाव व छोटी धरणे, सिमेंट बंधारे नालाबांध, ओढे, नाले, कोरडे ठणठणीत पडले आहेत. त्यामुळे आगामी रब्बी हंगामात पाणीटंचाई भासणार आहे, तरी धोम-बलकवडी व धोम धरणातून पाणी नदीला सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात येतो, त्याऐवजी नदीला सोडलेले पाणी धोम-बलकवडीच्या उजव्या कालव्यातून फलटण खंडाळा तालुक्यातील ओढ्याला सोडून त्या पाण्यातून पाझर तलाव धरणे सिमेंट बंधारे नालाबांध भरून आगामी होणारी पाणीटंचाई दूर करण्याची गरज आहे. याचा विचार करून प्रशासनाने धोम-बलकवडी धरणातून पाणी उजव्या कालव्यात सोडलेल्या पाण्यातून पाझर तलाव भरून द्यावे, अशी मागणी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

प्रतिक्रिया

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडल्याने, धोम-बलकवडी धरण भरल्याने पाणी नदीला सोडले आहे. ते पाणी खंडाळा-फलटण तालुक्यात सोडले आहे. त्या पाण्याने पाझर तलाव भरून घ्यावेत व त्या पाण्याची पाणीपट्टी आकारू नये, कारण कोरोनामुळे शेतकऱ्याच्या मालाला दर नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

- अमोल रासकर, ग्रामपंचायत सदस्य, सासवड झणझणे, फलटण

चौकट

रब्बी हंगामात टंचाई भासणार...

गतवर्षी फलटण तालुक्यात चांगला पाऊस होता, पण या वर्षी मोठ्या पावसाने पाठ फिरविल्याने रब्बी हंगामात पाणीटंचाई भासणार आहे. पावसाळा संपत आला, तरी ओढे -नाले, पाझर तलाव, तांबवे, हिंगणगाव, मुळीकवाडी, कुरवली धरणात मृतसाठा आहे. तरी धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. आदर्की, बिबी, ढवळ, उपळवे, मिरढ, जावळी गावांपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही.

२३आदर्की

फोटो -फलटण पश्चिम भागात कोरडे पडलेले पाझर तलाव.