शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

पावसाचे वाहून जाणारे पाणी पाझर तलावात सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

आदर्की : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणे काटोकाठ भरली, पण जिल्ह्याच्या पूर्वेला फलटण तालुक्यात मोठ्या पावसाने ...

आदर्की : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणे काटोकाठ भरली, पण जिल्ह्याच्या पूर्वेला फलटण तालुक्यात मोठ्या पावसाने पाठ फिरविल्याने ओढे-नाले, शेकडो पाझर तलाव कोरडे ठणठणीत असल्याने, धोम-बलकवडी धरणातून नदीला सोडलेले पाणी खंडाळा-फलटण तालुक्यात सोडले आहे. त्या पाण्याने पाझर तलाव भरून देण्याची मागणी शेतकरी, ग्रामस्थांतून होत आहे.

सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, सातारा, पाटण, कऱ्हाड तालुक्यात गत आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू आहे, पण फलटण तालुक्यात रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील बाजरी व इतर पिके चांगली आहे.

मे महिन्यापासून फलटण तालुक्यात मोठा पाऊस झाला नाही, त्यामुळे फलटण तालुक्यातील शेकडो पाझर तलाव व छोटी धरणे, सिमेंट बंधारे नालाबांध, ओढे, नाले, कोरडे ठणठणीत पडले आहेत. त्यामुळे आगामी रब्बी हंगामात पाणीटंचाई भासणार आहे, तरी धोम-बलकवडी व धोम धरणातून पाणी नदीला सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात येतो, त्याऐवजी नदीला सोडलेले पाणी धोम-बलकवडीच्या उजव्या कालव्यातून फलटण खंडाळा तालुक्यातील ओढ्याला सोडून त्या पाण्यातून पाझर तलाव धरणे सिमेंट बंधारे नालाबांध भरून आगामी होणारी पाणीटंचाई दूर करण्याची गरज आहे. याचा विचार करून प्रशासनाने धोम-बलकवडी धरणातून पाणी उजव्या कालव्यात सोडलेल्या पाण्यातून पाझर तलाव भरून द्यावे, अशी मागणी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

प्रतिक्रिया

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडल्याने, धोम-बलकवडी धरण भरल्याने पाणी नदीला सोडले आहे. ते पाणी खंडाळा-फलटण तालुक्यात सोडले आहे. त्या पाण्याने पाझर तलाव भरून घ्यावेत व त्या पाण्याची पाणीपट्टी आकारू नये, कारण कोरोनामुळे शेतकऱ्याच्या मालाला दर नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

- अमोल रासकर, ग्रामपंचायत सदस्य, सासवड झणझणे, फलटण

चौकट

रब्बी हंगामात टंचाई भासणार...

गतवर्षी फलटण तालुक्यात चांगला पाऊस होता, पण या वर्षी मोठ्या पावसाने पाठ फिरविल्याने रब्बी हंगामात पाणीटंचाई भासणार आहे. पावसाळा संपत आला, तरी ओढे -नाले, पाझर तलाव, तांबवे, हिंगणगाव, मुळीकवाडी, कुरवली धरणात मृतसाठा आहे. तरी धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. आदर्की, बिबी, ढवळ, उपळवे, मिरढ, जावळी गावांपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही.

२३आदर्की

फोटो -फलटण पश्चिम भागात कोरडे पडलेले पाझर तलाव.