शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे वाहून जाणारे पाणी पाझर तलावात सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

आदर्की : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणे काटोकाठ भरली, पण जिल्ह्याच्या पूर्वेला फलटण तालुक्यात मोठ्या पावसाने ...

आदर्की : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणे काटोकाठ भरली, पण जिल्ह्याच्या पूर्वेला फलटण तालुक्यात मोठ्या पावसाने पाठ फिरविल्याने ओढे-नाले, शेकडो पाझर तलाव कोरडे ठणठणीत असल्याने, धोम-बलकवडी धरणातून नदीला सोडलेले पाणी खंडाळा-फलटण तालुक्यात सोडले आहे. त्या पाण्याने पाझर तलाव भरून देण्याची मागणी शेतकरी, ग्रामस्थांतून होत आहे.

सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, सातारा, पाटण, कऱ्हाड तालुक्यात गत आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू आहे, पण फलटण तालुक्यात रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील बाजरी व इतर पिके चांगली आहे.

मे महिन्यापासून फलटण तालुक्यात मोठा पाऊस झाला नाही, त्यामुळे फलटण तालुक्यातील शेकडो पाझर तलाव व छोटी धरणे, सिमेंट बंधारे नालाबांध, ओढे, नाले, कोरडे ठणठणीत पडले आहेत. त्यामुळे आगामी रब्बी हंगामात पाणीटंचाई भासणार आहे, तरी धोम-बलकवडी व धोम धरणातून पाणी नदीला सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात येतो, त्याऐवजी नदीला सोडलेले पाणी धोम-बलकवडीच्या उजव्या कालव्यातून फलटण खंडाळा तालुक्यातील ओढ्याला सोडून त्या पाण्यातून पाझर तलाव धरणे सिमेंट बंधारे नालाबांध भरून आगामी होणारी पाणीटंचाई दूर करण्याची गरज आहे. याचा विचार करून प्रशासनाने धोम-बलकवडी धरणातून पाणी उजव्या कालव्यात सोडलेल्या पाण्यातून पाझर तलाव भरून द्यावे, अशी मागणी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

प्रतिक्रिया

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडल्याने, धोम-बलकवडी धरण भरल्याने पाणी नदीला सोडले आहे. ते पाणी खंडाळा-फलटण तालुक्यात सोडले आहे. त्या पाण्याने पाझर तलाव भरून घ्यावेत व त्या पाण्याची पाणीपट्टी आकारू नये, कारण कोरोनामुळे शेतकऱ्याच्या मालाला दर नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

- अमोल रासकर, ग्रामपंचायत सदस्य, सासवड झणझणे, फलटण

चौकट

रब्बी हंगामात टंचाई भासणार...

गतवर्षी फलटण तालुक्यात चांगला पाऊस होता, पण या वर्षी मोठ्या पावसाने पाठ फिरविल्याने रब्बी हंगामात पाणीटंचाई भासणार आहे. पावसाळा संपत आला, तरी ओढे -नाले, पाझर तलाव, तांबवे, हिंगणगाव, मुळीकवाडी, कुरवली धरणात मृतसाठा आहे. तरी धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. आदर्की, बिबी, ढवळ, उपळवे, मिरढ, जावळी गावांपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही.

२३आदर्की

फोटो -फलटण पश्चिम भागात कोरडे पडलेले पाझर तलाव.