शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
3
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
4
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
5
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
6
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
7
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
8
Suicide Blast: पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
9
नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
10
'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार
11
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
12
१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा
13
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
14
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
15
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
16
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
17
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
18
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
19
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
20
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट

जलस्त्रोतांसाठी पडीक विहिरीचे पुनरुज्जीवन

By admin | Updated: July 8, 2016 01:06 IST

कातरखटाव : चौदाव्या वित्त आयोगातून गाळ काढून खोलीकरण

कातरखटाव : ‘जसे कर्म तसे फळ, या म्हणीप्रमाणे गावकारभाऱ्याने विकास करायची दूरदृष्टी चांगली ठेवली तर निधी कमी पडणार नाही. चौदाव्या वित्त आयोगातून कातरखटाव ग्रामपंचायतीने ‘जलस्रोताचा विकास करण्यासाठी तसेच बौद्ध व मातंग वस्तीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटावा, यासाठी ओढ्यावरील जुन्या विहिरीचा गाळ काढून खोलीकरण करण्यासाठी दोन लाखांचा उपलब्ध निधी वापरण्यात आला आहे.उन्हाळ्यात पाणी-पाणी करणाऱ्या गावच्या जनतेच्या समस्या डोळ्यासमोर ठेवून पन्नास ते साठ वर्षांच्या जुन्या विहिरीचे खोलीकरण करण्यात आले आहे. गाळ व दगड काढून पस्तीस फूट खोल खोलीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे खोलीकरण करताच पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. दुष्काळी व टंचाई परिस्थितीमध्ये विहिरीला पाणी पाहून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. जलस्रोताचा विकास होत असल्यामुळे गावातील दलित व मातंग वस्तीच्या लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही. दलित बांधवांना अतिरिक्त पाणी शेतीसाठी वापरता येईल. हे काम यशस्वी होण्यासाठी सरपंच तानाजी बागल व उपसरपंच संतोष बागल यांनी परिश्रम घेतले. तसेच सदस्य मुबारक मुल्ला यांनी स्वमालकीचा ट्रॅक्टर माल वाहतुकीला देऊन सहकार्य केले. (वार्ताहर)नागरिकांची वणवण थांबणार..!येरळवाडी धरणातून करण्यात येणाऱ्या नियोजित नळ पाणीपुरवठा योजनेसाठी मोठ्या साठ्याची विहीर उपलब्ध झाल्याने समाधान वाटते. शासनाचा आलेला निधी विकास कामासाठीच वापरला जाईल. कोणालाही एक रुपया खाऊ देणार नाही आणि खाणारही नाही. जिथे निधी कमी पडेल तिथे पदरमोड करणार.- तानाजी बागल, सरपंच, कातरखटाव