शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
3
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
4
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
5
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
6
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
7
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
8
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
9
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
10
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
11
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
12
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
13
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
14
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
15
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
16
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
17
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
18
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
19
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
20
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट

रिफाई्ंडमुळे वाढते चरबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:46 IST

स्टार : १०५६ लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : रिफाईंड तेलामुळे चरबी वाढते, हृदयावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक घाणा ...

स्टार : १०५६

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : रिफाईंड तेलामुळे चरबी वाढते, हृदयावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक घाणा तेलाला मागणी वाढत आहे. या तेलाचा अतिवापर शरीरासाठी घातक आहे. चरबी वाढण्यासह हृदयरोगाचाही धोका संभवतो. त्यामुळे शक्य तो घाण्याच्या तेलाचा वापर करावा, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

खाद्यतेल रिफाईंड करताना केमिकलचा वापर केला जातो. ही केमिकल्स आपल्या शरीरास सर्वाधिक हानी पोहोचवतात. या तेलाच्या अतिसेवनामुळे आपल्या शरीरात ब्लॉकेज तयार होण्याचा धोका असतो. हृदयविकारासारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. वात विकार असंतुलित राहतात असे तज्ज्ञ सांगतात. तेल रिफाईंड करताना प्रारंभी ३०० डिग्री सेल्सिअस आणि दुसऱ्यांदा ४६४ डिग्री सेल्सिअस इतक्या उच्च तापमानावर उकळले जाते. डबल आणि ट्रिपल रिफाईंड करताना तेल उकळल्याने त्यात अनावश्यक घटक समाविष्ट होतात. ते अपायकारक ठरतात, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

याउलट शुद्ध तेलाचे सेवन केल्यास शरीराला आवश्यक असलेल्या हायडेन्सिटी लिपोप्रोटिन हा घटक लिव्हरमध्ये तयार होतो. आहारात शुद्ध तेलाचाच समावेश असावा. शुद्ध तेल खालल्याने वात दोष संतुलित राहतो. हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, सांधेदुखी, अर्धांगवायू, मेंदूचे आजार, उच्च रक्तदाब अशा गंभीर आजारांवरही शुद्ध तेल गुणकारी आहे.

चौकट :

म्हणून वाढत आहेत हृदयरोगी

देशात हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. लठ्ठपणा आणि चुकीचा आहार ही त्यामागील महत्त्वाची कारणे आहेत. या दोन्ही गोष्टी टाळायच्या असतील तर आहारात शुद्ध तेलाचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे.

लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय

घाण्याचे तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते. तेल बियांवर जास्त दाब देऊन हे तेल काढले जाते. घाणा एका मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो. एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाहीत. रिफाईंड तेलाला पर्याय म्हणून घाण्याच्या तेलाचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

रिफाई्ंड तेल घातक का?

सध्या बहुतांश लोक रिफाईंड तेल वापरतात. अतिशय उच्च तापमानाला काही रसायन वापरून हे तेल काढले जाते. या प्रोसेसमध्ये तेलामध्ये नैसर्गिकरीत्या असलेली जवळपास सगळे चांगले गुणधर्म निघून जातात. त्यामुळे शरीरासाठी आणि त्यातही हृदयासाठी अतिशय घातक असे ठरतात. नैसर्गिक रंग, वास आणि चव काढून त्याला न्यूट्रल बनवण्यासाठी त्यामध्ये काही रसायन मिसळली जातात. त्यामुळे तेलाची गुणवत्ता खालावते.

आहारतज्ज्ञ काय म्हणतात?

रिफाई्ंड तेलापेक्षा घाण्यावरील नैसर्गिक तेल आरोग्यासाठी कायमच लाभदायक आहे. घाण्याचा तेलामुळे तेलातील नैसर्गिक तत्त्व आपल्या शरीराला भेटतात. त्यामुळे शरीरावर काही परिणाम होत नाही. रिफाई्ंड तेलामुळे विपरीत परिणाम होत असतात.

- अनघा तेंडोलकर, आहारतज्ज्ञ