शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

रिफाई्ंडमुळे वाढते चरबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:46 IST

स्टार : १०५६ लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : रिफाईंड तेलामुळे चरबी वाढते, हृदयावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक घाणा ...

स्टार : १०५६

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : रिफाईंड तेलामुळे चरबी वाढते, हृदयावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक घाणा तेलाला मागणी वाढत आहे. या तेलाचा अतिवापर शरीरासाठी घातक आहे. चरबी वाढण्यासह हृदयरोगाचाही धोका संभवतो. त्यामुळे शक्य तो घाण्याच्या तेलाचा वापर करावा, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

खाद्यतेल रिफाईंड करताना केमिकलचा वापर केला जातो. ही केमिकल्स आपल्या शरीरास सर्वाधिक हानी पोहोचवतात. या तेलाच्या अतिसेवनामुळे आपल्या शरीरात ब्लॉकेज तयार होण्याचा धोका असतो. हृदयविकारासारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. वात विकार असंतुलित राहतात असे तज्ज्ञ सांगतात. तेल रिफाईंड करताना प्रारंभी ३०० डिग्री सेल्सिअस आणि दुसऱ्यांदा ४६४ डिग्री सेल्सिअस इतक्या उच्च तापमानावर उकळले जाते. डबल आणि ट्रिपल रिफाईंड करताना तेल उकळल्याने त्यात अनावश्यक घटक समाविष्ट होतात. ते अपायकारक ठरतात, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

याउलट शुद्ध तेलाचे सेवन केल्यास शरीराला आवश्यक असलेल्या हायडेन्सिटी लिपोप्रोटिन हा घटक लिव्हरमध्ये तयार होतो. आहारात शुद्ध तेलाचाच समावेश असावा. शुद्ध तेल खालल्याने वात दोष संतुलित राहतो. हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, सांधेदुखी, अर्धांगवायू, मेंदूचे आजार, उच्च रक्तदाब अशा गंभीर आजारांवरही शुद्ध तेल गुणकारी आहे.

चौकट :

म्हणून वाढत आहेत हृदयरोगी

देशात हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. लठ्ठपणा आणि चुकीचा आहार ही त्यामागील महत्त्वाची कारणे आहेत. या दोन्ही गोष्टी टाळायच्या असतील तर आहारात शुद्ध तेलाचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे.

लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय

घाण्याचे तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते. तेल बियांवर जास्त दाब देऊन हे तेल काढले जाते. घाणा एका मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो. एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाहीत. रिफाईंड तेलाला पर्याय म्हणून घाण्याच्या तेलाचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

रिफाई्ंड तेल घातक का?

सध्या बहुतांश लोक रिफाईंड तेल वापरतात. अतिशय उच्च तापमानाला काही रसायन वापरून हे तेल काढले जाते. या प्रोसेसमध्ये तेलामध्ये नैसर्गिकरीत्या असलेली जवळपास सगळे चांगले गुणधर्म निघून जातात. त्यामुळे शरीरासाठी आणि त्यातही हृदयासाठी अतिशय घातक असे ठरतात. नैसर्गिक रंग, वास आणि चव काढून त्याला न्यूट्रल बनवण्यासाठी त्यामध्ये काही रसायन मिसळली जातात. त्यामुळे तेलाची गुणवत्ता खालावते.

आहारतज्ज्ञ काय म्हणतात?

रिफाई्ंड तेलापेक्षा घाण्यावरील नैसर्गिक तेल आरोग्यासाठी कायमच लाभदायक आहे. घाण्याचा तेलामुळे तेलातील नैसर्गिक तत्त्व आपल्या शरीराला भेटतात. त्यामुळे शरीरावर काही परिणाम होत नाही. रिफाई्ंड तेलामुळे विपरीत परिणाम होत असतात.

- अनघा तेंडोलकर, आहारतज्ज्ञ