शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

अपव्यय केल्यास पाणीपुरवठ्यात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:34 IST

सातारा : कास जलाशयामध्ये दोन महिने पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा आहे. गतवर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत पाण्याची सद्यपरिस्थिती अत्यंत ...

सातारा : कास जलाशयामध्ये दोन महिने पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा आहे. गतवर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत पाण्याची सद्यपरिस्थिती अत्यंत चांगली असली तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय करणे टाळावे, अन्यथा प्रशासनाला पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी दिला.

गतवर्षी एप्रिल महिन्यात कासची पाणीपातळी खालावल्यामुळे सातारा शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, कर्मचारी संदीप सावंत, पाटकरी जयराम किर्दत यांनी कास जलाशयाचा पाहणी दौरा करून सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याची माहिती घेतली. गतवर्षी याच दिवशी कास जलाशयामध्ये १०.५० फूट पाणी होते. जलाशयातील पाण्याचा मृतसाठा अधिक असल्यामुळे सातारा शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्याची वेळ पालिकेवर आली होती. सद्यपरिस्थितीत जलाशयात बारा फूट पाणी असून ते दोन महिने पुरेल इतके आहे. १५ जून पर्यंत सातारा शहरात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही, अशा पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी एप्रिल महिन्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ निर्माण होणार नाही.

कास जलाशयात मुबलक पाणी असले तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. नळ सुरू ठेवणे, घरगुती वापरासाठी आणलेल्या पाण्याच्या टाक्या ओसंडून वाहने असे प्रकार सातत्याने घडत आहेत. ज्या भागात पहाटेच्यावेळी पाणी सोडले जाते त्याठिकाणी दुचाकी, चारचाकी, रिक्षा आदी वाहने नळाच्या, पाईपच्या साह्याने धुतले जातात, अशा पद्धतीने पाण्याचा अपव्यय फार मोठ्या पद्धतीने केला जातो. हा अपव्यय असाच सुरू राहिल्यास नाईलाजास्तव पाणी कपात करण्याची कडक भूमिका प्रशासनाला घ्यावी लागेल, असा इशाराही सभापती हादगे यांनी दिला.

फोटो :

पाणीपुरवठा सभापती सीता राम हादगे, संदीप सावंत, जयराम किर्दत यांनी कास जलाशयातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला.