शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी बस्त्यासाठी लाल कापडाला भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:19 IST

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : झिरो पेंडन्सीच्या कामामुळे कागदपत्रे ज्या कापडात बांधली जातात, त्या रुमालांना भलतीच मागणी वाढली आहे. हा नवा ‘सरकारी बस्ता’ बांधण्यासाठी गेल्या तीन महिन्यांत तब्बल तीन हजार ८१ रुमालांची मागणी शासकीय कार्यालयांनी टीसीपीसी (ट्रेनिंग कम प्रोडक्शन सेंटर फॉर एक्स सर्व्हिसमन) कडे केली आहे.शासनाच्या कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार व ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : झिरो पेंडन्सीच्या कामामुळे कागदपत्रे ज्या कापडात बांधली जातात, त्या रुमालांना भलतीच मागणी वाढली आहे. हा नवा ‘सरकारी बस्ता’ बांधण्यासाठी गेल्या तीन महिन्यांत तब्बल तीन हजार ८१ रुमालांची मागणी शासकीय कार्यालयांनी टीसीपीसी (ट्रेनिंग कम प्रोडक्शन सेंटर फॉर एक्स सर्व्हिसमन) कडे केली आहे.शासनाच्या कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार व इतर महत्त्वाची कागदपत्रे गठ्ठ्यांमध्ये बांधून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतात. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिलेल्या ‘झिरो पेंडन्सी’च्या आदेशामुळे या कागदपत्रांच्या गठ्ठ्यावरील धूळ झटकली गेली. तसेच कार्यालयांत इतरस्थ: पसरलेल्या कागदांना शिस्त लागली. ९ जूनला आयुक्तांनी आदेश काढले अन् जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये झिरो पेंडन्सीच्या कामाची एकच लगबग सुरू झाली. रात्री-अपरात्री जागून ही कामे सुरू करण्यात येत होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हाधिकारी, प्रांत अशा कार्यालयांमध्ये कर्मचाºयांचे एक टार्गेट झिरो पेंडन्सी पाहायला मिळत होते. दरवर्षीच्या नियोजनानुसार डिसेंबर महिन्यात सर्व शासकीय कार्यालये झिरो पेंडन्सीची कामे केली जातात. त्यामुळे वर्षाअखेरीस कार्यालयांमध्ये लगबग दिसते. मात्र, आयुक्तांच्या आदेशामुळे जून महिन्यातच शासकीय कार्यालयांमध्ये अभिलेख वर्गीकरणाचे काम वेगाने सुरू झाले होते. येथील टीसीपीसीकडे शासकीय कार्यालयांमार्फत अभिलेख बांधणीसाठी लागणाºया गठ्ठ्यांची आॅर्डर दिली जाते. टीसीपीसीमधून हे रुमाल व इतर साहित्य बनवून दिले जाते. आॅर्डरप्रमाणे कर्मचारी रुमाल बनवून देतात. १ जून ते २० आॅगस्ट या अडीच महिन्यांच्या काळात तब्बल ३ हजार ८१ रुमालांची आॅर्डर मिळाली. त्यापैकी १ हजार ५८१ रुमालांची आॅर्डर पूर्ण करण्यात आली तर उर्वरित १ हजार ५०० रुमालांची आॅर्डर पूर्ण करण्याचे काम सुरू असल्याची माहिती टीसीपीसीतून मिळाली. १९५९ पासून टीसीपीसीतर्फे हे काम केले जाते. १९६५ पर्यंत कागदपत्रे कपाटांवर रचली जात होती. अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी लखिना यांनी अभिलेख वर्गीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यानंतर ही कागदपत्रे रुमालांत बांधली जाऊ लागली.कागदपत्रे वेगळी, रुमाल वेगळाकायमस्वरूपी जतन करून ठेवायचे अभिलेखे लाल रुमालात, ३0 वर्षांपूर्वीची कागदपत्रे हिरव्या रुमालात, दहा वर्षांपूर्वीची कागदपत्रे पिवळ्या रुमालात तर एक वर्षानंतर नष्ट करावयाची कागदपत्रे पांढºया रुमालात बांधून ठेवली जातात. रुमालांच्या रंगावरुन त्यातील कागदपत्रे किती जुनी आहेत, त्याचा अंदाज बांधता येतो.