शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

सरकारी बस्त्यासाठी लाल कापडाला भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:19 IST

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : झिरो पेंडन्सीच्या कामामुळे कागदपत्रे ज्या कापडात बांधली जातात, त्या रुमालांना भलतीच मागणी वाढली आहे. हा नवा ‘सरकारी बस्ता’ बांधण्यासाठी गेल्या तीन महिन्यांत तब्बल तीन हजार ८१ रुमालांची मागणी शासकीय कार्यालयांनी टीसीपीसी (ट्रेनिंग कम प्रोडक्शन सेंटर फॉर एक्स सर्व्हिसमन) कडे केली आहे.शासनाच्या कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार व ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : झिरो पेंडन्सीच्या कामामुळे कागदपत्रे ज्या कापडात बांधली जातात, त्या रुमालांना भलतीच मागणी वाढली आहे. हा नवा ‘सरकारी बस्ता’ बांधण्यासाठी गेल्या तीन महिन्यांत तब्बल तीन हजार ८१ रुमालांची मागणी शासकीय कार्यालयांनी टीसीपीसी (ट्रेनिंग कम प्रोडक्शन सेंटर फॉर एक्स सर्व्हिसमन) कडे केली आहे.शासनाच्या कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार व इतर महत्त्वाची कागदपत्रे गठ्ठ्यांमध्ये बांधून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतात. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिलेल्या ‘झिरो पेंडन्सी’च्या आदेशामुळे या कागदपत्रांच्या गठ्ठ्यावरील धूळ झटकली गेली. तसेच कार्यालयांत इतरस्थ: पसरलेल्या कागदांना शिस्त लागली. ९ जूनला आयुक्तांनी आदेश काढले अन् जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये झिरो पेंडन्सीच्या कामाची एकच लगबग सुरू झाली. रात्री-अपरात्री जागून ही कामे सुरू करण्यात येत होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हाधिकारी, प्रांत अशा कार्यालयांमध्ये कर्मचाºयांचे एक टार्गेट झिरो पेंडन्सी पाहायला मिळत होते. दरवर्षीच्या नियोजनानुसार डिसेंबर महिन्यात सर्व शासकीय कार्यालये झिरो पेंडन्सीची कामे केली जातात. त्यामुळे वर्षाअखेरीस कार्यालयांमध्ये लगबग दिसते. मात्र, आयुक्तांच्या आदेशामुळे जून महिन्यातच शासकीय कार्यालयांमध्ये अभिलेख वर्गीकरणाचे काम वेगाने सुरू झाले होते. येथील टीसीपीसीकडे शासकीय कार्यालयांमार्फत अभिलेख बांधणीसाठी लागणाºया गठ्ठ्यांची आॅर्डर दिली जाते. टीसीपीसीमधून हे रुमाल व इतर साहित्य बनवून दिले जाते. आॅर्डरप्रमाणे कर्मचारी रुमाल बनवून देतात. १ जून ते २० आॅगस्ट या अडीच महिन्यांच्या काळात तब्बल ३ हजार ८१ रुमालांची आॅर्डर मिळाली. त्यापैकी १ हजार ५८१ रुमालांची आॅर्डर पूर्ण करण्यात आली तर उर्वरित १ हजार ५०० रुमालांची आॅर्डर पूर्ण करण्याचे काम सुरू असल्याची माहिती टीसीपीसीतून मिळाली. १९५९ पासून टीसीपीसीतर्फे हे काम केले जाते. १९६५ पर्यंत कागदपत्रे कपाटांवर रचली जात होती. अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी लखिना यांनी अभिलेख वर्गीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यानंतर ही कागदपत्रे रुमालांत बांधली जाऊ लागली.कागदपत्रे वेगळी, रुमाल वेगळाकायमस्वरूपी जतन करून ठेवायचे अभिलेखे लाल रुमालात, ३0 वर्षांपूर्वीची कागदपत्रे हिरव्या रुमालात, दहा वर्षांपूर्वीची कागदपत्रे पिवळ्या रुमालात तर एक वर्षानंतर नष्ट करावयाची कागदपत्रे पांढºया रुमालात बांधून ठेवली जातात. रुमालांच्या रंगावरुन त्यातील कागदपत्रे किती जुनी आहेत, त्याचा अंदाज बांधता येतो.