शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

सरकारी बस्त्यासाठी लाल कापडाला भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:19 IST

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : झिरो पेंडन्सीच्या कामामुळे कागदपत्रे ज्या कापडात बांधली जातात, त्या रुमालांना भलतीच मागणी वाढली आहे. हा नवा ‘सरकारी बस्ता’ बांधण्यासाठी गेल्या तीन महिन्यांत तब्बल तीन हजार ८१ रुमालांची मागणी शासकीय कार्यालयांनी टीसीपीसी (ट्रेनिंग कम प्रोडक्शन सेंटर फॉर एक्स सर्व्हिसमन) कडे केली आहे.शासनाच्या कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार व ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : झिरो पेंडन्सीच्या कामामुळे कागदपत्रे ज्या कापडात बांधली जातात, त्या रुमालांना भलतीच मागणी वाढली आहे. हा नवा ‘सरकारी बस्ता’ बांधण्यासाठी गेल्या तीन महिन्यांत तब्बल तीन हजार ८१ रुमालांची मागणी शासकीय कार्यालयांनी टीसीपीसी (ट्रेनिंग कम प्रोडक्शन सेंटर फॉर एक्स सर्व्हिसमन) कडे केली आहे.शासनाच्या कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार व इतर महत्त्वाची कागदपत्रे गठ्ठ्यांमध्ये बांधून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतात. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिलेल्या ‘झिरो पेंडन्सी’च्या आदेशामुळे या कागदपत्रांच्या गठ्ठ्यावरील धूळ झटकली गेली. तसेच कार्यालयांत इतरस्थ: पसरलेल्या कागदांना शिस्त लागली. ९ जूनला आयुक्तांनी आदेश काढले अन् जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये झिरो पेंडन्सीच्या कामाची एकच लगबग सुरू झाली. रात्री-अपरात्री जागून ही कामे सुरू करण्यात येत होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हाधिकारी, प्रांत अशा कार्यालयांमध्ये कर्मचाºयांचे एक टार्गेट झिरो पेंडन्सी पाहायला मिळत होते. दरवर्षीच्या नियोजनानुसार डिसेंबर महिन्यात सर्व शासकीय कार्यालये झिरो पेंडन्सीची कामे केली जातात. त्यामुळे वर्षाअखेरीस कार्यालयांमध्ये लगबग दिसते. मात्र, आयुक्तांच्या आदेशामुळे जून महिन्यातच शासकीय कार्यालयांमध्ये अभिलेख वर्गीकरणाचे काम वेगाने सुरू झाले होते. येथील टीसीपीसीकडे शासकीय कार्यालयांमार्फत अभिलेख बांधणीसाठी लागणाºया गठ्ठ्यांची आॅर्डर दिली जाते. टीसीपीसीमधून हे रुमाल व इतर साहित्य बनवून दिले जाते. आॅर्डरप्रमाणे कर्मचारी रुमाल बनवून देतात. १ जून ते २० आॅगस्ट या अडीच महिन्यांच्या काळात तब्बल ३ हजार ८१ रुमालांची आॅर्डर मिळाली. त्यापैकी १ हजार ५८१ रुमालांची आॅर्डर पूर्ण करण्यात आली तर उर्वरित १ हजार ५०० रुमालांची आॅर्डर पूर्ण करण्याचे काम सुरू असल्याची माहिती टीसीपीसीतून मिळाली. १९५९ पासून टीसीपीसीतर्फे हे काम केले जाते. १९६५ पर्यंत कागदपत्रे कपाटांवर रचली जात होती. अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी लखिना यांनी अभिलेख वर्गीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यानंतर ही कागदपत्रे रुमालांत बांधली जाऊ लागली.कागदपत्रे वेगळी, रुमाल वेगळाकायमस्वरूपी जतन करून ठेवायचे अभिलेखे लाल रुमालात, ३0 वर्षांपूर्वीची कागदपत्रे हिरव्या रुमालात, दहा वर्षांपूर्वीची कागदपत्रे पिवळ्या रुमालात तर एक वर्षानंतर नष्ट करावयाची कागदपत्रे पांढºया रुमालात बांधून ठेवली जातात. रुमालांच्या रंगावरुन त्यातील कागदपत्रे किती जुनी आहेत, त्याचा अंदाज बांधता येतो.