शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

रेवंडे खूनप्रकरणी गावकरी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:42 IST

सातारा : छेडछाड केल्याचा जाब विचारायला गेलेल्या चुलत्याचा खून झाल्यानंतर काही गावकºयांनी बैठक घेऊन पंच कमिटीमध्ये हे प्रकरण परस्पर मिटविल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले. त्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेऊन ही घटना माहिती असलेल्या अधिकाºयाची कानउघडणी करून तत्काळ खुलासा करण्याबरोबरच संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल ...

सातारा : छेडछाड केल्याचा जाब विचारायला गेलेल्या चुलत्याचा खून झाल्यानंतर काही गावकºयांनी बैठक घेऊन पंच कमिटीमध्ये हे प्रकरण परस्पर मिटविल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले. त्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेऊन ही घटना माहिती असलेल्या अधिकाºयाची कानउघडणी करून तत्काळ खुलासा करण्याबरोबरच संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.‘खूनप्रकरणी गावात समांतर न्यायालय’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर परळी खोºयातील रेवंडे परिसरात घडलेल्या या अजब घटनेने समाजमन ढवळून निघाले. दरम्यान, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे ‘लोकमत’ने पंच कमिटीच्या निर्णयाची प्रत सादर केली. त्यावेळी तेही हा अजब न्यायनिवाडा पाहून चकीत झाले. तक्रारदार नसेल तरी पोलिसांनी या प्रकरणामध्ये ‘सुमोटो’ने तक्रार देणे गरजेचे होते, असे मत व्यक्त करतच त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव धरणे यांना धारेवर धरले. ‘तुम्हाला हे प्रकरण माहिती असताना तुम्ही तक्रारीची वाट कशी काय पाहू शकता, ‘सुमोटो’ने गुन्हा दाखल होऊ शकतो,’ असे त्यांना सुनावले.दरम्यान, या प्रकरणामध्ये दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत उपविभागीय अधिकारी खंडेराव धरणे आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याचे त्यावेळचे ठाणे अंमलदाराकडून खुलासा मागविण्याचे आदेशही अधीक्षक पाटील यांनी दिले आहेत.वास्तविक, माने नामक व्यक्तीचा मृत्यू होऊन तब्बल दहा दिवस झाले होते. त्या व्यक्तीच्या दशक्रिया विधीदिवशीच एका अधिकाºयाला एका जागृत नागरिकाने या भीषण घटनेची कल्पना दिली होती. त्यानंतर चवरे यांनी आपले काही सहकारी रेवंडे परिसरात पाठवून पीडित मुलीचा जबाब घेऊन केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. परंतु मूळ घटनेला पोलिसांनी बगल दिल्याचा आरोप काही नागरिकांकडून झाल्यानंतर ‘लोकमत’ने या प्रकरणाची सत्यता तपासली असता अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. मुलीची छेड काढल्याचा जाब विचारायला गेलेल्या माने नामक व्यक्तीचा मृतदेह दरडीमध्ये आढळून आल्यानंतर त्यांच्या भावाने माझ्या भावाचा घातपात झाल्याचा आरोप केला. त्यामुळे पंच कमिटीने ताडीची बैठक घेऊन झालं गेलं गंगेला मिळालं, असं समजून वाच्यता न करण्याचे फर्मान सोडले. एवढेच नव्हे तर एका कागदावर अकरा जणांच्या सह्या घेऊन संबंधित खुनाचा गुन्हा कबुल करून ‘ग्रामस्थ जो निर्णय देतील, तो आम्हाला मान्य आहे,’ असे लिहूनही दिले. असे असतानाही म्हणे पोलिसांना तक्रार हवी होती. गावच्या समांतर न्यायालयामध्ये हा न्यायनिवाडा झाला असताना पोलिसांना तक्रारदार कसा मिळेल? असाही प्रश्न उपस्थित होतो.अनेकांची चौकशी सुरू..पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या. बुधवारी दुपारी रेवंडे परिसरात जाऊन या प्रकरणातील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू होती.