शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
7
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
8
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
9
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
10
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
11
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
12
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
13
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
14
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
15
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
16
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
17
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
18
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
19
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
20
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप

रेवंडे खूनप्रकरणी गावकरी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:42 IST

सातारा : छेडछाड केल्याचा जाब विचारायला गेलेल्या चुलत्याचा खून झाल्यानंतर काही गावकºयांनी बैठक घेऊन पंच कमिटीमध्ये हे प्रकरण परस्पर मिटविल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले. त्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेऊन ही घटना माहिती असलेल्या अधिकाºयाची कानउघडणी करून तत्काळ खुलासा करण्याबरोबरच संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल ...

सातारा : छेडछाड केल्याचा जाब विचारायला गेलेल्या चुलत्याचा खून झाल्यानंतर काही गावकºयांनी बैठक घेऊन पंच कमिटीमध्ये हे प्रकरण परस्पर मिटविल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले. त्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेऊन ही घटना माहिती असलेल्या अधिकाºयाची कानउघडणी करून तत्काळ खुलासा करण्याबरोबरच संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.‘खूनप्रकरणी गावात समांतर न्यायालय’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर परळी खोºयातील रेवंडे परिसरात घडलेल्या या अजब घटनेने समाजमन ढवळून निघाले. दरम्यान, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे ‘लोकमत’ने पंच कमिटीच्या निर्णयाची प्रत सादर केली. त्यावेळी तेही हा अजब न्यायनिवाडा पाहून चकीत झाले. तक्रारदार नसेल तरी पोलिसांनी या प्रकरणामध्ये ‘सुमोटो’ने तक्रार देणे गरजेचे होते, असे मत व्यक्त करतच त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव धरणे यांना धारेवर धरले. ‘तुम्हाला हे प्रकरण माहिती असताना तुम्ही तक्रारीची वाट कशी काय पाहू शकता, ‘सुमोटो’ने गुन्हा दाखल होऊ शकतो,’ असे त्यांना सुनावले.दरम्यान, या प्रकरणामध्ये दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत उपविभागीय अधिकारी खंडेराव धरणे आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याचे त्यावेळचे ठाणे अंमलदाराकडून खुलासा मागविण्याचे आदेशही अधीक्षक पाटील यांनी दिले आहेत.वास्तविक, माने नामक व्यक्तीचा मृत्यू होऊन तब्बल दहा दिवस झाले होते. त्या व्यक्तीच्या दशक्रिया विधीदिवशीच एका अधिकाºयाला एका जागृत नागरिकाने या भीषण घटनेची कल्पना दिली होती. त्यानंतर चवरे यांनी आपले काही सहकारी रेवंडे परिसरात पाठवून पीडित मुलीचा जबाब घेऊन केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. परंतु मूळ घटनेला पोलिसांनी बगल दिल्याचा आरोप काही नागरिकांकडून झाल्यानंतर ‘लोकमत’ने या प्रकरणाची सत्यता तपासली असता अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. मुलीची छेड काढल्याचा जाब विचारायला गेलेल्या माने नामक व्यक्तीचा मृतदेह दरडीमध्ये आढळून आल्यानंतर त्यांच्या भावाने माझ्या भावाचा घातपात झाल्याचा आरोप केला. त्यामुळे पंच कमिटीने ताडीची बैठक घेऊन झालं गेलं गंगेला मिळालं, असं समजून वाच्यता न करण्याचे फर्मान सोडले. एवढेच नव्हे तर एका कागदावर अकरा जणांच्या सह्या घेऊन संबंधित खुनाचा गुन्हा कबुल करून ‘ग्रामस्थ जो निर्णय देतील, तो आम्हाला मान्य आहे,’ असे लिहूनही दिले. असे असतानाही म्हणे पोलिसांना तक्रार हवी होती. गावच्या समांतर न्यायालयामध्ये हा न्यायनिवाडा झाला असताना पोलिसांना तक्रारदार कसा मिळेल? असाही प्रश्न उपस्थित होतो.अनेकांची चौकशी सुरू..पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या. बुधवारी दुपारी रेवंडे परिसरात जाऊन या प्रकरणातील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू होती.