शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

मुलांचे वर्ष वाचले… अभ्यासाच्या आकलनाची मात्र बोंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात नेमक्या कोणत्या विषयाचे किती प्रमाणात आकलन झाले, याची माहिती परीक्षेमध्ये पडलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात नेमक्या कोणत्या विषयाचे किती प्रमाणात आकलन झाले, याची माहिती परीक्षेमध्ये पडलेल्या गुणांतून लक्षात येते. परीक्षा उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण म्हणून नव्हे तर विद्यार्थ्याच्या एकूण आकलनाची पातळी समजून येण्यासाठी आवश्‍यक असते. नेमकं यंदा हेच होणार नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. मात्र, या निर्णयाचा दूरगामी परिणाम मुलांना सोसावा लागणार आहे. परीक्षांविना विद्यार्थी उत्तीर्ण करण्याच्या निर्णयाचं मोठ्या प्रमाणावर स्वागत होत असलं तरीही त्यामुळे मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान भरून न येणारं आहे. पुढील वर्गात गेल्यानंतर त्या अभ्यासक्रमात मागील वर्गांचे अनेक संदर्भ असतात. पहिल्या वर्गातील माहितीच कच्ची राहिली तर पुढच्या वर्गात त्याच्या आधारावर अभ्यास करणं कठीण जाणार आहे. वर्ग वाढतील, तशी ही काठिण्यपातळी विद्यार्थ्यांना त्रास देणारी ठरणार आहे.

वर्षभर शिकलेल्या अभ्यासाचे मूल्यांकन न करता सलग उत्तीर्ण करण्याने भविष्यात शैक्षणिक नुकसानही होऊ शकते. ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांना लिखाणाची गती हरवली आहे. त्यातच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला तर ही गती वाढविण्याकडेही मुलं दुर्लक्ष करणार ज्याचा परिणाम पुढील शैक्षणिक वर्षावर मोठ्या प्रमाणावर दिसून येईल.

हाही ठरू शकला असता पर्याय

शिक्षण विभागाने पूर्ण परीक्षा रद्द करून सरसकट मुलांना उत्तीर्ण करण्यापेक्षा कमी गुणांची ऑनलाईन परीक्षा घेतली असती तर मुलांना काय समजलं ते स्पष्ट झालं असतं. बहुपर्यायी प्रश्‍न उत्तरांच्या स्वरूपात ही परीक्षा घेतली गेली असती तर मुलांना अभ्यासक्रमाचा यानिमित्ताने उजाळा मिळाला असता. त्याबरोबरच ऑनलाईन शिक्षणात आपण किती आणि काय शिकलो, याचाही आढावा गुणांच्या निमित्ताने घेता आला असता.

कोट :

१.शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच आहे. मात्र, ज्याप्रमाणे वर्षभर आपण ऑनलाईन शिक्षण दिले आहे. त्याचप्रमाणे थोड्या फार प्रमाणात परीक्षा घेतली असती तर बरे झाले असते. मुलांना पण त्याचा आनंद वाटला असता की, आम्ही ऑनलाईन शिक्षण पण घेतले आणि परीक्षाही ऑनलाईन झाली.

– दत्ता माने, पालक, खडतरे वस्ती,

२. वर्षभर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिल्यानंतर त्यांच्या परीक्षाही ऑनलाईन घ्यायला काहीच हरकत नव्हती. या निमित्ताने ऑनलाईन अध्यापन मुलांच्या किती डोक्यात आणि डोक्यावर गेलं हे समजलं असतं. पण परीक्षा न घेण्याने विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासाचा सराव आणि समज या दोन्हींबाबत किती समजलं, हे वर्षभर समजूनही उपयोगच नाही.

- नेहा शिवदे, शिक्षिका, आयरन अकॅडमी, सातारा

३. शाळेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्यासाठी शिक्षक विद्यार्थी झाले. वर्षभर ऑनलाईन शिकविलेलं मुलांना समजलं का नाही, काही त्रुटी राहिल्या असतील तर परीक्षांच्या गुणांवरून समजेल, असं गृहीत धरून आम्ही प्रश्‍नपत्रिका तयारही केल्या होत्या. अचानक परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयाने धक्का बसला. याचा परिणाम मुलांच्या शैक्षणिक जीवनावर होईल, याची भीती वाटते.

- मिथीला गुजर, मुख्याध्यापिका, एसईएमएस