शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

‘रयत’चा लिलाव होऊ देणार नाही !

By admin | Updated: September 23, 2016 00:45 IST

विलासराव पाटील-उंडाळकर : संघर्ष माझ्या पाचवीलाच; डगमगत नसल्याचे सांगत बंडखोरांना फटकारले

उंडाळे : ‘रयत कारखाना म्हणजे या भागातील रयतेचा संसार आहे. संघर्ष माझ्या पाचवीलाच पूजला आहे. यापुढेही कितीही संघर्ष झाला तरी रयत कारखान्याचा मी कधीही लिलाव होऊ देणार नाही,’ असे प्रतिपादन रयत सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केले. राजकारणातला सुरुवातीपासून सुरू असणारा संघर्ष आजही सुरू असला तरी मी डगमगत नसल्याचे सांगत त्यांनी बंडखोरांना फटकारले.शेवाळवाडी-म्हासोली, ता. कऱ्हाड येथे रयत सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विलासराव पाटील-उंडाळकर बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय पाटील, उपाध्यक्ष आप्पासाहेब गरूड यांच्यासह संचालक, सभासद, अथणी शुगरचे संस्थापक पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.विलासराव पाटील-उंडाळकर म्हणाले, ‘डोंगरी भागातील लोकांचे जीवनमान सुधारावे, त्यांचा आर्थिक स्तर उंचवावा यासाठी रयत कारखान्याची उभारणी शेवाळवाडीच्या माळावर केली आहे. हा कारखाना उभा करण्यासाठी माझ्यासह या भागातील अनेक लोकांनी अथक परिश्रम घेतले आहेत. काहीनीं तर आपल्या माता-भगिनींचे दागिने गहाण ठेवून भागभांडवल दिले आहे. हे मी कधी विसरू शकणार नाही. राजकारणामध्ये मी खूप संघर्ष पाहिला आहे. मात्र, मी कधीही डगमगलो नाही. स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर यांनी आपली जमीन विकून समाजाची सेवा केली. त्याचप्रमाणे गेल्या चाळीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनात मीही लोकांची सेवा करीत आलो आहे. सत्तेसाठी कधीही कुणासमोर लाचार झालो नाही आणि यापुढच्या काळातही होणार नाही. माझ्या चारित्र्यावर कुठलाही डाग पडू दिलेला नाही.रयत कारखान्याच्या उभारणीत परिसरातील जनतेने मोलाचे योगदान दिले आहे. हे कधीही विसरू शकणार नाही. रयत कारखान्यावर ८१ कोटींचे कर्ज असून, अशा परिस्थितीतही अथणी शुगरने गतवर्षीपासून हा कारखाना चालवायला घेतला आहे. तो फक्त आपल्यावर असलेल्या विश्वासामुळेच त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कुणाचाही एक पैसा कारखाना बुडू देणार नाही.’अ‍ॅड. उदय पाटील म्हणाले, ‘अथणी शुगरसोबत रयत कारखान्याचा १९ वर्षांचा करार झाला आहे. या कारखान्यावर असलेले कर्ज फेडून भविष्यात सुमारे अडीचशे कोटींचा असणारा हा कारखाना सभासदांच्या मालकीचा होईल. निसर्ग आणि मानवनिर्मित्त अनेक अडचणींमुळे कारखाना चालविताना अडचणी येत आहे. मात्र, आता संचालक मंडळ सक्षम झाले आहे. कोणत्याही अडचणी आल्या तर त्या मोडून काढू, असे सांगत १२ हजार सभासदांपैकी फक्त साडेतीन हजार सभासदच कारखान्याकडे ऊस घालतात. इतर सभासदांनीही ऊस पिकाकडे लक्ष दिल्यास कारखान्याला बाहेरून ऊस आणावा लागणार नाही.’सभेला सभासदांची मोठी उपस्थिती होती. (वार्ताहर)जयसिंगराव पाटील अनुपस्थितउंडाळकर कुटुंबामध्ये कुटुंबातील संघर्ष गत आठवड्यात सर्वश्रूत झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत विलासराव पाटील-उंडाळकर काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. त्यावरूनच माजी अध्यक्ष जयसिंगराव पाटील उपस्थित राहणार का? याचीही उत्सुकता होती. मात्र, जयसिंगराव पाटील अनुपस्थित राहिल्याने त्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती.