शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘रयत’ने तंत्रकुशल पिढी भारताला दिली

By admin | Updated: September 28, 2015 23:45 IST

सी. विद्यासागर राव : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गौरवोद्गार

सातारा : रयत शिक्षण शिक्षण संस्थेचा देशाच्या उच्च शिक्षण क्षेत्रात सर्वात मोठा वाटा आहे. या संस्थेने ज्ञानदानाच्या पवित्र कार्याबरोबरच तंत्रकुशल पिढी देशाला दिली आहे, असे गौरवोदगार महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त संस्थेमध्ये सोमवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंंबाळकर अध्यक्षस्थानी होते. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, माजी चेअरमन डॉ. एन. डी. पाटील, संस्थेचे सचिव डॉ. गणेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.सी. विद्यासागर राव म्हणाले, ‘महाराष्ट्रामध्ये संतांनी भक्तीची चळवळ निर्माण केली तर महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे यांनी उभारलेली शिक्षणाची चळवळ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी नेटाने पुढे नेली. कर्मवीरांच्या चळवळीला लोकसहभाग मोठ्या प्रमाणावर मिळाला, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने युगपुरुष ठरले. त्यांच्यासारखा ध्येयवादी माणूस होणे नाही. १९२१ साली केवळ २१ टक्के लोक साक्षर होते, त्याच ठिकाणी २0१५ मध्ये ८३ टक्के लोक साक्षर आहेत. १९२१ साली केवळ २ टक्के महिला साक्षर होत्या, तेच प्रमाण वाढून आजच्या घडीला ७0 टक्के इतके झाले आहे. हे आकारास येण्यासाठी रयत चे योगदान मोठे आहे. दरम्यान, आपल्या मनोगताच्या सुरुवातीलाच राज्यपालांनी ‘मी मराठी शिकत आहे, मला चांगलं मराठी येत नाही,’ असं म्हणून प्रेक्षकांपुढे इंग्रजीत बोलण्याची अनुमती मागितली. कर्मवीरांच्या शिक्षणाचे महत्त्व विशद करताना त्यांनी ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस,’ असं मराठीतील संतांचे वचन मांडले. (प्रतिनिधी)सर्व्हे धक्कादायक.. --महाराष्ट्रातील ५0 अभियांत्रिकी महाविद्यालयांचा नुकताच सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये बहुसंख्ये २१ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे गणित व प्रश्न सोडविण्याची क्षमता १५ वर्षांच्या मुलांपेक्षाही कमी असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याचे राज्यपालांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले.