शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

‘रयत’ने तंत्रकुशल पिढी भारताला दिली

By admin | Updated: September 28, 2015 23:45 IST

सी. विद्यासागर राव : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गौरवोद्गार

सातारा : रयत शिक्षण शिक्षण संस्थेचा देशाच्या उच्च शिक्षण क्षेत्रात सर्वात मोठा वाटा आहे. या संस्थेने ज्ञानदानाच्या पवित्र कार्याबरोबरच तंत्रकुशल पिढी देशाला दिली आहे, असे गौरवोदगार महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त संस्थेमध्ये सोमवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंंबाळकर अध्यक्षस्थानी होते. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, माजी चेअरमन डॉ. एन. डी. पाटील, संस्थेचे सचिव डॉ. गणेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.सी. विद्यासागर राव म्हणाले, ‘महाराष्ट्रामध्ये संतांनी भक्तीची चळवळ निर्माण केली तर महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे यांनी उभारलेली शिक्षणाची चळवळ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी नेटाने पुढे नेली. कर्मवीरांच्या चळवळीला लोकसहभाग मोठ्या प्रमाणावर मिळाला, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने युगपुरुष ठरले. त्यांच्यासारखा ध्येयवादी माणूस होणे नाही. १९२१ साली केवळ २१ टक्के लोक साक्षर होते, त्याच ठिकाणी २0१५ मध्ये ८३ टक्के लोक साक्षर आहेत. १९२१ साली केवळ २ टक्के महिला साक्षर होत्या, तेच प्रमाण वाढून आजच्या घडीला ७0 टक्के इतके झाले आहे. हे आकारास येण्यासाठी रयत चे योगदान मोठे आहे. दरम्यान, आपल्या मनोगताच्या सुरुवातीलाच राज्यपालांनी ‘मी मराठी शिकत आहे, मला चांगलं मराठी येत नाही,’ असं म्हणून प्रेक्षकांपुढे इंग्रजीत बोलण्याची अनुमती मागितली. कर्मवीरांच्या शिक्षणाचे महत्त्व विशद करताना त्यांनी ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस,’ असं मराठीतील संतांचे वचन मांडले. (प्रतिनिधी)सर्व्हे धक्कादायक.. --महाराष्ट्रातील ५0 अभियांत्रिकी महाविद्यालयांचा नुकताच सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये बहुसंख्ये २१ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे गणित व प्रश्न सोडविण्याची क्षमता १५ वर्षांच्या मुलांपेक्षाही कमी असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याचे राज्यपालांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले.