शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

‘रयत’चा ‘कुमुदा’शी संबंध नाही : पाटील

By admin | Updated: November 18, 2014 23:36 IST

नो कॉमेन्टस्--शेतकरी आता कुमुदालाच ऊस घालतो

कऱ्हाड : रयत सहकारी साखर कारखाना हा शासनाच्या परवानगीने व मान्यतेने कुमुदा शुगर अ‍ॅन्ड अ‍ॅग्रो प्रोडक्टस् लि. यांना १९ सप्टेंबर २०१३ रोजी चालविण्यास देण्यात आला आहे. जवळपास अठरा वर्षांचा हा करार आहे. त्यामुळे रयत कारखान्याने एफआरपीनुसार दर दिला नसल्याची माहिती पूर्णत: चुकीची असून ‘रयत’चा ‘कुमुदा’शी कसलाही संबंध नाही, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष जयसिंंगराव पाटील व अशोकराव थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. थोरात म्हणाले, यापूर्वी तीन वर्षे कोल्हापूरच्या शाहू कारखान्याशी रयतने करार केला होता. महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने १९६० चे कलम २० अ या सहकार कायद्यानुसार २०१३-१४ या गळीत हंगामापासून ‘कुमुदा’ला २०१३ पासून त्यांच्याबरोबर साखर आयुक्त यांच्यासमोर झालेल्या करारान्वये १८ वर्षांसाठी सहयोग तत्त्वावर चालविण्यास देण्यात आला आहे. त्यामुळे या करारानुसार कराराच्या कालावधीत उसाच्या पेमेंटसहित सर्व दैनंदिन कामकाजाची व व्यवहाराची पूर्णपणे जबाबदारी ही कुमुदा शुगरची आहे. या व्यवहाराबाबत रयत साखर कारखाना कुठल्याही प्रकारे जबाबदार नाही. रयत कारखाना कुमुदा शुगर हे चालवित असल्याने कामकाजाबाबतच्या प्रसिद्ध होणाऱ्या माहितीमध्ये रयतच्या नावाने चर्चा करणे चुकीचे आहे. (प्रतिनिधी)नो कॉमेन्टस्‘तुम्हाला रयत सहकारी साखर कारखाना चालवायला जमले नाही. म्हणून तुम्ही कुमुदा शुगर या प्रायव्हेट कंपनीला कारखाना चालवायला दिला आहे का,’ असे पत्रकारांनी छेडले असता अशोकराव थोरात यांनी याला ‘नो कॉमेन्टस्’ एवढेच उत्तर दिले. शेतकरी आता कुमुदालाच ऊस घालतो‘तुम्ही जरी कारखाना चालवायला दिला असला तरी शेतकरी अजूनही रयत या नावावर विश्वास ठेवून ऊस घालतो. त्यामुळे तुमची नैतिक जबाबदारी आहेच ना,’ असे विचारले असता शेतकरी आता कुमुदाला ऊस घालतो, रयतला नव्हे, असे अशोकराव थोरात यांनी सांगितले.