शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

रातराणी एस. टी. सुसाट... खासगी वाहने कोमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:09 IST

सातारा : कोरोनानंतर अडखळत सुरू झालेल्या एस. टी.ने काही दिवसात सर्व संकटे विसरुन प्रवासी सेवेसाठी धावण्यास सुरुवात केली आहे. ...

सातारा : कोरोनानंतर अडखळत सुरू झालेल्या एस. टी.ने काही दिवसात सर्व संकटे विसरुन प्रवासी सेवेसाठी धावण्यास सुरुवात केली आहे. रात्रभर प्रवास केल्यास पुणे, मुंबईत दुसऱ्या दिवशी दिवसभरात कामे करुन परत रात्री आपल्या गावी जाता येते. त्यामुळे अनेकांना दिवसापेक्षा रात्रीचा प्रवास सोयीचा वाटतो. ही गरजही एस. टी.ने पूर्ण केली आहे. त्यामुळे एस. टी.च्या रातराणी गाड्या सुसाट धावत आहेत.

साताऱ्यातील अनेक लहान-मोठे व्यापारी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला जात असतात. त्यांना रात्रभर प्रवास करुन सकाळी मुंबईत गेले तर दिवसभर खरेदीच्या कामानिमित्ताने फिरता येते, वेळ देता येतो. त्याचप्रमाणे काही नोकरदार, शिक्षणासाठी मुंबईत राहणारे सुटीला गावी येतात. तेव्हा तेही रात्रभर प्रवास करुन सकाळी घरी जाऊन त्यांना पुन्हा कामावर जाता येते. साहजिकच रातराणी गाडीला सातारकरांमधून चांगली मागणी होती. एस. टी.ने रातराणी गाड्या सुरू केलेल्या असल्याने तीही मागणी आता पूर्ण झाली आहे.

सातारा विभागातील सातारा - मुंबई सेट्रल ही मेगा हायवेवरुन धावणारी गाडी रात्री साडेदहाला आहे तर सांगली विभागाची जत - परेल ही गाडी मध्यरात्री साडेबारा वाजता सातारा मध्यवर्ती बसस्थानकात येते. त्यामुळे सातारकरांची चांगलीच सोय झाली आहे.

चौकट

एस. टी.च्या सुरू असलेल्या रातराणी

कोल्हापूर - बोईसर

मेढा - नाशिक

कलेढोण - परेल

वडूज - मुंबई

जत - परेल

सातारा - मुंबई

चौकट

कोल्हापूर - बोईसरला स्लिपर कोच

सातारा विभाग हे पुणे, कोल्हापूर या दोन महानगरांच्या मध्यवर्ती ठिकाणी येते. या ठिकाणाहून सर्वच ठिकाणे कमी अंतरात आहेत. त्यामुळे शयनयान गाड्यांची सातारकरांना फारशी गरज नसते. मात्र, कोणाला शयनयान गाडीतून प्रवास करायचाच असेल तर त्यांच्यासाठी कोल्हापूर - बोईसर या गाडीचा पर्याय आहे. ही गाडी कोल्हापूर विभागाची असली तरी या गाडीतून सातारकरांना आरामदायी प्रवास करता येतो.

चौकट

एस. टी.पेक्षा तिकीट जास्त

साताऱ्यातून मुंबईला जाण्यासाठी शिवशाही गाडीला केव्हाही प्रवास केला तरी ५४० रुपये तिकीट दर आहे. तर हिरकणीने गेल्यास रात्री साडेपाचशे रुपये तिकीट आकारले जाते. याउलट खासगी प्रवासी बसला साडेआठशे रुपये आकारले जातात. तसेच या गाड्यांसाठी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाटा, शिवराज पेट्रोल पंप याठिकाणी जावे लागते. रात्रीचा प्रवास असल्यास तेथेपर्यंत जाण्यास रिक्षा मिळत नाही किंवा मिळाल्या तरी अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते.